शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीत परतीच्या पावसाचा कहर

By admin | Updated: October 9, 2016 00:15 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. शुक्रवारी वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यात ५०० हेक्टरचे नुकसान झाले.

५०० हेक्टरचे नुकसान : सोयाबीन, कापूस, तुर आडवीयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. शुक्रवारी वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यात ५०० हेक्टरचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. या मागणीसाठी पाच गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यासह जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.सततच्या पावसाने संपूर्ण जिल्हातील पीक धोक्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घाटंजी तालुक्यात पावसाचा कहर झाला. पारवा सर्कलमध्ये याचा फटका बसला. अचानक आलेल्या वादळी पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. याचा फटका मंगी, सगदा, भिमकुंड, सावंगी आणि ठाणेगावला बसला.कापूस, सोयाबीन, तुर हे पीक या पावसात आडवे झाले. कपाशीचे बोंड गळाले. तर सोयाबीनचे झाड जमीनदोस्त झाले. तुरीच्या पिकालाही याचा फटका बसला आहे. ५०० हेक्टरवर लाखोचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.यासंदर्भात शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि जिल्हा प्रशासनकाडे निवेदन सादर केले. यावेळी घाटंजीचे माजी सभापती रूपेश कल्यमवार, सावंगीचे सरपंच अजय रेड्डी येल्टीवार, किरण कुमरे, पोचारेड्डी जिड्डेवार, गंगया बदीवार, चिनया जडगिलवार, शाम पेंटावार, अनिल मोहूर्ले, गंगया आकमवार यांच्यासह अनेकजन उपस्थित होते. (शहर वार्ताहर)