शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

घाटंजीत परतीच्या पावसाचा कहर

By admin | Updated: October 9, 2016 00:15 IST

परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. शुक्रवारी वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यात ५०० हेक्टरचे नुकसान झाले.

५०० हेक्टरचे नुकसान : सोयाबीन, कापूस, तुर आडवीयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे. शुक्रवारी वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यात ५०० हेक्टरचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. या मागणीसाठी पाच गावातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यासह जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.सततच्या पावसाने संपूर्ण जिल्हातील पीक धोक्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घाटंजी तालुक्यात पावसाचा कहर झाला. पारवा सर्कलमध्ये याचा फटका बसला. अचानक आलेल्या वादळी पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. याचा फटका मंगी, सगदा, भिमकुंड, सावंगी आणि ठाणेगावला बसला.कापूस, सोयाबीन, तुर हे पीक या पावसात आडवे झाले. कपाशीचे बोंड गळाले. तर सोयाबीनचे झाड जमीनदोस्त झाले. तुरीच्या पिकालाही याचा फटका बसला आहे. ५०० हेक्टरवर लाखोचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.यासंदर्भात शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि जिल्हा प्रशासनकाडे निवेदन सादर केले. यावेळी घाटंजीचे माजी सभापती रूपेश कल्यमवार, सावंगीचे सरपंच अजय रेड्डी येल्टीवार, किरण कुमरे, पोचारेड्डी जिड्डेवार, गंगया बदीवार, चिनया जडगिलवार, शाम पेंटावार, अनिल मोहूर्ले, गंगया आकमवार यांच्यासह अनेकजन उपस्थित होते. (शहर वार्ताहर)