शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जिल्ह्याचा निकाल केवळ ६६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:28 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल केवळ ६६.२० टक्के लागला असून शिक्षण विभागातील उदासीन यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे.

ठळक मुद्देदहावी परीक्षेत शिक्षण विभाग ‘वरपास’ । दिग्रसची रेणू भगत ९९.४० टक्के गुणांसह जिल्ह्यात अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल केवळ ६६.२० टक्के लागला असून शिक्षण विभागातील उदासीन यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. केवळ ६०.१९ टक्के मुले उत्तीर्ण होऊ शकली. तर या पडझडीतही मुलींनी मात्र बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७२.८६ आहे. दिग्रस येथील रेणू संजय भगत ही विद्यार्थिनी ९९.४० गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल तर यवतमाळ येथील तनय संजय वानखडे हा विद्यार्थी ९९.२० टक्के गुण घेत जिल्ह्यात दुसरा ठरला आहे.यंदा दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ३८ हजार ३२५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २५ हजार ३७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या २० हजार १५३ मुलांपैकी १२ हजार १३१ मुले पास झाली आहे. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६०.१९ आहे. त्याचवेळी १८ हजार १७२ मुलींनी यंदा दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार २४० म्हणजे ७२.८६ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुले आणि मुलींच्या यशाचे टक्केवारीमध्ये तब्बल १२ टक्क्यांची तफावत आहे. जिल्ह्यातून तीन हजार ७९४ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली आहे. तर नऊ हजार ४०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. याशिवाय दहा हजार १५ विद्यार्थी द्वितीय आणि दोन हजार १०१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण होऊ शकले. जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या रेणू संजय भगत हिला ५०० पैकी ४९० गुण मिळाले असून कला, क्रीडाचे सात अतिरिक्त गुण मिळाले आहे. तर तनय संजय वानखडे याला ४८६ गुण मिळाले असून कला, क्रीडाचे दहा अतिरिक्त गुण मिळाले आहे. तर जायन्टस् इंग्लिश मीडियम स्कूलची समीक्षा ज्ञानेश्वर खेरडे हिने ९८.२० टक्के गुण मिळविले. तिला संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण आहे.रेणूला व्हायचेय आयटी इंजिनिअरयवतमाळ : इयत्ता दहावीच्या परीक्षेत दिग्रस येथील रेणू संजय भगत ही विद्यार्थिनी ९९.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. तिला ४९० गुण मिळाले आहे. दिग्रस येथील मोहनाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे. यापुढे आयटी इंजिनिअर होण्याचे आपले स्वप्न आहे, असे रेणूने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या रेणू जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी हैदराबाद येथे आहे. दहावीचा निकाल येताच आईवडिलांनी फोन करून तिचे अभिनंदन केले. रेणूचे वडील संजय भगत हे जोगलदरी येथील जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आई शारदा गृहिणी आहे. भगत कुटुंब दिग्रस तालुक्यातील तिवरी या खेड्यातील मूळ रहिवासी आहे. रेणू अभ्यासासोबतच अनेक गोष्टींमध्ये रुची बाळगते. व्हॉलिबॉल खेळणे तिला आवडते. सांस्कृतिक कार्यक्रमातही हिरीरीने भाग घेणारी रेणू ‘आॅलराउंडर’ असल्याचे वडील संजय भगत म्हणाले. मात्र दहावीत येताच तिने इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून अभ्यासावर फोकस केला होता. ‘सेल्फ स्टडी’वरच तिचा भर राहिला. ती आधीपासूनच शाळेत टॉपर राहिली. आता जिल्ह्यातही टॉपर ठरली आहे.जिल्ह्याचा निकाल १८ टक्क्यांनी घटलादहावीच्या परीक्षेत यंदा जिल्ह्याचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३.९९ टक्के एवढा लागला होता. परंतु शनिवारी जाहीर झालेल्या शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या निकालाची टक्केवारी अवघी ६६.२० एवढी नोंदविली गेली. वर्षभरात दहावीचा निकाल सुमारे १८ टक्क्यांनी घटला. यावर्षी गणित आणि विज्ञान हे दोन विषय वगळता इतर विषयांचे प्रात्यक्षिकाचे गुण बंद करण्यात आल्यामुळे जिल्ह्याचा निकाल तब्बल १८ टक्क्यांनी घसरल्याचे शिक्षण विभागातून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सरावाकडे दुर्लक्ष केल्यामुळे निकाल घसरल्याची माहिती शिक्षण विभागातीलच एका अधिकाऱ्याने सांगितली. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल