शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे अखेर पुनर्गठण

By admin | Updated: August 27, 2015 00:15 IST

३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणावर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

जिल्हा बँकेचा निर्णय : हेक्टरी १० हजार देणार यवतमाळ : ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणावर अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. शासनाने जिल्हा बँकेला त्यांचा निधी उपलब्ध करून न दिल्याने जिल्ह्यातील तब्बल ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण रखडले होते. या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची खास बैठक बोलाविली गेली होती. त्यात पुनर्गठणावर सविस्तर चर्चा झाली. बँकेला शासनासह संंबंधित एजंसीजकडून ११३ कोटी रुपयांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ७० ते ८० कोटी एवढीच रक्कम मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून सुमारे १८ कोटी हवे असताना केवळ १६ कोटी रुपये मंजूर केले गेले. मात्र त्यानंतरही ३० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. कर्जाच्या रकमेत मात्र कपात करण्यात आली. शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये या दराने कर्ज दिले जाणार आहे. पेरणीचा संपलेला वेळ आणि लवकरच हाती येणारे सोयाबीनचे पीक ही कारणे यासाठी दिली गेली आहे. (प्रतिनिधी)