शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये ३४ सोसायट्यांची जबाबदारी तीन गटसचिवांवर

By admin | Updated: May 23, 2015 23:56 IST

सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांची नाळ वर्षानुवर्षांपासून जुळली आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज देऊन वसुलीसाठी सहकारी ....

शेतकऱ्यांना त्रास : सेवानिवृत्त सचिवांकडेही सोपविली जबाबदारीनेर : सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांची नाळ वर्षानुवर्षांपासून जुळली आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज देऊन वसुलीसाठी सहकारी संस्थेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. मात्र तालुक्यात असलेल्या ३४ सोसायट्यांचा कारभार केवळ तीन गटसचिवांवर आहे. सहा ठिकाणी सेवानिवृत्त झालेल्या सचिवांना काम करावे लागत आहे. सचिवांवर कामाचा ताण वाढल्याने शेतकऱ्यांना टोलविले जाते. या प्रकारात ते कमालीचे त्रस्त झाले आहेत. गटसचिव जे.एन. पठाण यांच्याकडे नेर-नबाबपूर, पाथ्रडगोळे, लोणी, धनज, चिखली (कान्होबा), टाकळी (सलामी), सिंदखेड, पिंपळगाव (डु), पिंपळगाव (काळे), इंद्रठाणा, चिचगाव या ११ गावांची जबाबदारी आहे. व्ही.एन. गोळे यांच्याकडे वटफळी, पिपरी (कलगा), दगडधानोरा, शहापूर, सारंगपूर, मालखेड (खु), मालखेड (बु), बोरगाव (लिंगा), उत्तरवाढोणा, कोलुरा, बाणगाव ही ११ गावे आहे. तिसरे सचिव एस.व्ही. बांडे हे ब्राह्मणवाडा (प), खरडगाव, दोनद, सावरगाव, मोझर, आजंती, रत्नापूर, चिकणी (डो), घारेफळ, सातेफळ, अडगाव, कारखेडा या १२ गावांची जबाबदारी सांभाळत आहे.सहकारी संस्थेतून निवृत्त झालेले सहा सचिव प्रतिसोसायटी तीन हजार रुपयांप्रमाणे काम करत आहे. यात व्ही.सी. राठोड, सी.डी. घरडे, व्ही.बी. देशमुख, एस.जी. कावगे, पी.पी. जिमकर, एम.बी. श्रुंगारे यांचा समावेश आहे. प्रत्येक सचिवाकडे चार ते पाच सोसायट्यांची जबाबदारी आहे. यातील काही सचिव शेतकऱ्यांना अतोनात त्रास देतात. काहींनी सावकारी सुरू केली आहे. तर काहीचे काम दलालाच्या भरोशावर सुरू आहे. या प्रकारात शेतकरी त्रस्त झाला आहे. सकाळी शेतीची कामे सोडून पीककर्ज मंजुरीसाठी शेतकरी येतात. सचिवांकडून त्यांना उद्धट वागणूक दिली जाते. कर्जमंजुरीसाठी येरझारा माराव्या लागतात. दलालांशी संपर्क केल्याशिवाय कधीही काम होत नाही. हा प्रकार कधी थांबणार, असा त्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)कर्जासाठी शेतकऱ्यांना हेलपाटेनेर तालुक्यातील अनेक सोसायट्यांनी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले आहे. मात्र पाथ्रड (गोळे) येथील सचिव पठाण यांच्या दिरंगाईमुळे अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित आहे. सदर सचिव वैयक्तिक व्यवसायात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शेतमजूर-शेतकरी संघटनेचे सचिव पंजाबराव खोडके यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली आहे. या संस्थेचे ५० शेतकरी सभासद आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला. परंतु त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून दिलेले नाही. वैयक्तिक कामातच ते व्यस्त राहात असल्याचा आरोप आहे. सदर तलाठ्यावर कारवाई करावी, अशी मागणी पंजाबराव खोडके यांच्यासह या सोसायटीअंतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.