शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महागावात राजीनामा नाट्याने मानापमान

By admin | Updated: May 21, 2017 00:34 IST

येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला.

पाणीपुरवठा सभापती : विरोधक म्हणतात, नागरिकांची दिशाभूल लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला. मात्र ही नाट्यमय घडामोड म्हणजे महागावकरांची दिशाभूल असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा चवरे यांनी शुक्रवारी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच विश्वासात घेत नसल्याचा ठपका ठेऊन सभापती पदाचा राजीनामा दिला. परिवर्तन विकास आघाडीचे नगरपंचायतीत बहुमत असतानाही त्यांच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याने हे राजीनामा नाट्य घडल्याची चर्चा आहे. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात १७ बोअर मंजूर आहे. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. याचे नेमके कारण काय हेसुद्धा नागरिकांना कळले नाही. गेल्या वर्षी पाणी समस्येबाबत गटनेता शैलेष कोपरकर यांच्या नेतृत्वात घागर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचीसुद्धा नगरपंचायतीने दखल घेतली नाही. अखेर लोकवर्गणीतून प्रभाग क्र. १० मध्ये बोअर खोदण्यात आली. मात्र सदर बोअर अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन बंद करण्यात आल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. विद्यमान पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा हा नाट्यमय घडामोडींचा व महागावकरांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप विरोधी पक्ष गटनेता शैलेष कोपरकर यांनी केला. यापूर्वीच्या पाणीपुरवठा सभापती छाया वाघमारे यांनीही राजीनामा दिला होता. तो नामंजूर करण्यात आला होता. आताही तिच स्थिती उद्भवण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. विकासात्मक कामांसाठी सत्ताधाऱ्यांकडे वेळ नसल्याचा आरोपही कोपरकर यांनी केला. नियोजनच नाही काँग्रेस शहराध्यक्ष आरिफ सुरैया यांनी सत्ताधारी व प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप केला. कार्यालयाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. १४ व्या वित्त आयोगातून ७६ लाखांचा निधी मिळाला होता. तोसुद्धा नगरपंचायत खर्च करू शकली नाही. आता सभापतींनी राजीनामा दिल्याने पाणीटंचाई कशी निकाली काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.