शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महागावात राजीनामा नाट्याने मानापमान

By admin | Updated: May 21, 2017 00:34 IST

येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला.

पाणीपुरवठा सभापती : विरोधक म्हणतात, नागरिकांची दिशाभूल लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला. मात्र ही नाट्यमय घडामोड म्हणजे महागावकरांची दिशाभूल असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा चवरे यांनी शुक्रवारी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच विश्वासात घेत नसल्याचा ठपका ठेऊन सभापती पदाचा राजीनामा दिला. परिवर्तन विकास आघाडीचे नगरपंचायतीत बहुमत असतानाही त्यांच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याने हे राजीनामा नाट्य घडल्याची चर्चा आहे. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात १७ बोअर मंजूर आहे. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. याचे नेमके कारण काय हेसुद्धा नागरिकांना कळले नाही. गेल्या वर्षी पाणी समस्येबाबत गटनेता शैलेष कोपरकर यांच्या नेतृत्वात घागर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचीसुद्धा नगरपंचायतीने दखल घेतली नाही. अखेर लोकवर्गणीतून प्रभाग क्र. १० मध्ये बोअर खोदण्यात आली. मात्र सदर बोअर अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन बंद करण्यात आल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. विद्यमान पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा हा नाट्यमय घडामोडींचा व महागावकरांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप विरोधी पक्ष गटनेता शैलेष कोपरकर यांनी केला. यापूर्वीच्या पाणीपुरवठा सभापती छाया वाघमारे यांनीही राजीनामा दिला होता. तो नामंजूर करण्यात आला होता. आताही तिच स्थिती उद्भवण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. विकासात्मक कामांसाठी सत्ताधाऱ्यांकडे वेळ नसल्याचा आरोपही कोपरकर यांनी केला. नियोजनच नाही काँग्रेस शहराध्यक्ष आरिफ सुरैया यांनी सत्ताधारी व प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप केला. कार्यालयाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. १४ व्या वित्त आयोगातून ७६ लाखांचा निधी मिळाला होता. तोसुद्धा नगरपंचायत खर्च करू शकली नाही. आता सभापतींनी राजीनामा दिल्याने पाणीटंचाई कशी निकाली काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.