शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

महागावात राजीनामा नाट्याने मानापमान

By admin | Updated: May 21, 2017 00:34 IST

येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला.

पाणीपुरवठा सभापती : विरोधक म्हणतात, नागरिकांची दिशाभूल लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा विष्णू चवरे यांनी तडकाफडकी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपविला. मात्र ही नाट्यमय घडामोड म्हणजे महागावकरांची दिशाभूल असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती अरुणा चवरे यांनी शुक्रवारी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच विश्वासात घेत नसल्याचा ठपका ठेऊन सभापती पदाचा राजीनामा दिला. परिवर्तन विकास आघाडीचे नगरपंचायतीत बहुमत असतानाही त्यांच्या सदस्यांमध्ये एकमत नसल्याने हे राजीनामा नाट्य घडल्याची चर्चा आहे. नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरात १७ बोअर मंजूर आहे. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. याचे नेमके कारण काय हेसुद्धा नागरिकांना कळले नाही. गेल्या वर्षी पाणी समस्येबाबत गटनेता शैलेष कोपरकर यांच्या नेतृत्वात घागर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचीसुद्धा नगरपंचायतीने दखल घेतली नाही. अखेर लोकवर्गणीतून प्रभाग क्र. १० मध्ये बोअर खोदण्यात आली. मात्र सदर बोअर अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन बंद करण्यात आल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. विद्यमान पाणीपुरवठा सभापतींचा राजीनामा हा नाट्यमय घडामोडींचा व महागावकरांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप विरोधी पक्ष गटनेता शैलेष कोपरकर यांनी केला. यापूर्वीच्या पाणीपुरवठा सभापती छाया वाघमारे यांनीही राजीनामा दिला होता. तो नामंजूर करण्यात आला होता. आताही तिच स्थिती उद्भवण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. विकासात्मक कामांसाठी सत्ताधाऱ्यांकडे वेळ नसल्याचा आरोपही कोपरकर यांनी केला. नियोजनच नाही काँग्रेस शहराध्यक्ष आरिफ सुरैया यांनी सत्ताधारी व प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव असल्याचा आरोप केला. कार्यालयाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात असून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. १४ व्या वित्त आयोगातून ७६ लाखांचा निधी मिळाला होता. तोसुद्धा नगरपंचायत खर्च करू शकली नाही. आता सभापतींनी राजीनामा दिल्याने पाणीटंचाई कशी निकाली काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.