शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावचे आमदार ठोकणार गावात मुक्काम

By admin | Updated: May 18, 2016 02:47 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या प्रगतीसाठी नियोजित दौरे व रात्रीचा मुक्काम करावा,

डोंगरखर्डातून सुरुवात : दौरे व मुक्कामाची अधिकाऱ्यांना अ‍ॅलर्जी, शासनाचे निर्देश तुडविले पायदळीगजानन अक्कलवार कळंबजिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या प्रगतीसाठी नियोजित दौरे व रात्रीचा मुक्काम करावा, असे शासनाचे निर्देश आहे़ परंतु या आदेशाचे सर्रास उल्लघंण होत आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अनेक गावात मुक्काम करून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आता आमदार डॉ.अशोक उईके यांनीही गावात मुक्काम करून विकासाचा आराखडा तयार करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १९ मे रोजी ते डोंगरखर्डा येथे मुक्कामी राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकाऱ्यांना विकासात्मक कामाची प्रगती पाहण्याचे आदेश आहे़ एवढेच नाही तर, जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या, तक्रारी, मते जाणून घेण्यासाठी संबंधित गावात अधिकाऱ्यांनी मुक्काम करावा, असेही शासनास अभिप्रेत आहे़ परंतु या आदेशाची कुठलीच अंमलबजावणी होत नाही. आमदार डॉ.अशोक उईके हे गावात मुक्काम करून सर्वस्तरातील नागरिकांशी हितगुज साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर विकासाचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे. नजीकच्या काळात आमदाराचा गावात मुक्काम ही संकल्पना पहिल्यादाच पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सीईओ डॉ.कलशेट्टी हे स्वत: गावात जाऊन मुक्कामी राहायचे. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायचे. समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश द्यायचे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून क्षुल्लक कारणासाठी प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागायचे. त्यांच्या मुक्कामाचा प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांवर दबाव असायचा. आमदार डॉ.उईके यांच्या मुक्कामामुळेही असाच दबाव आता इतर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. विकासाच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी व जनतेचा सहयोग मिळण्यासाठी गावात मुक्कामी राहणे आवश्यक आहे. दौऱ्यावर जाताना किंवा दौऱ्यावर जाण्यापूर्वी कार्यालयाचे दौरा/हलचल पंजीमध्ये नोंद करून जाण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे़ असे असतानाही अधिकारी वर्ग आदेशाला केराची टोपली दाखवितात़ याकडेही डॉ. अशोक उईके यांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. गाव विकासाच्यादृष्टीने या बाबी अधिक गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.अहवाल सार्वजनिक करण्याची गरजअधिकारी, कर्मचाऱ्यांनी करावयाचे दौरे आणि रात्रीचा मुक्काम याबाबत वारंवार आढावा घेणे गरजेचे आहे़ त्यानुसार रात्रीचे दौरे व मुक्कामाची संख्या निश्चित करण्यात आली़ शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी व प्रगतीसाठी आपला सविस्तर अहवाल पाठविण्याचे निर्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे़ हा अहवाल सार्वजनिक केल्यास अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा उघड पडू शकतो. परिणामी अनेक अधिकारी कागदावर मुक्काम करण्याऐवजी गावात मुक्काम करतील, असे मत नागरिकातून व्यक्त होत आहे.