शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पोडावरच्या पोरांसाठी सुरू होणार निवासी शाळा; केंद्राने मागविली माहिती

By अविनाश साबापुरे | Updated: January 1, 2024 18:04 IST

लोकसंख्या आणि शाळांच्या अंतराची ‘एमपीएसपी’कडून पडताळणी

अविनाश साबापुरे, यवतमाळ: दुर्गम वाडी, वस्ती, पोडावर राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लवकरच जिल्हा परिषदांच्या माध्यमातून निवासी शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यातील अशा वस्त्यांची पडताळणी करून माहिती मागविली आहे. पुढील शैक्षणिक सत्रात या शाळा सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

पीएम-जनमन योजनेतून या शाळा केल्या जाणार असून याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारने प्रस्ताव मागविले आहेत. त्याकरिता जिल्हा परिषदांनी आपापल्या क्षेत्रातील दुर्गम वाड्या, वस्त्या आणि पोडांवरील लोकसंख्या आणि शिक्षणविषयक परिस्थितीची पडताळणी करून ‘एमपीएसपी’कडे नुकतेच प्रस्ताव दाखल केले आहेत. आरटीई कायद्यानुसार मुलांना एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शिक्षण, ३ किलोमीटरच्या आत उच्च प्राथमिक शिक्षण आणि ५ किलोमीटरच्या आत माध्यमिक शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे; परंतु आदिवासी समुदायातील अनेक गट आजही दुर्गम पोड, तांडे आणि वस्त्यांमध्ये राहात आहेत.

अशा ठिकाणच्या मुलांना लगतच्याच परिसरात निवासी स्वरूपाचे शिक्षण मिळावे, यासाठी पीएम-जनमन योजनेतून शाळा बांधकाम करून दिले जाणार आहे. अशा प्रकारच्या वस्त्यांची यादी केंद्राकडून ‘एमपीएसपी’ला व तेथून जिल्हास्तरावर पाठवून या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. जेथील मुलांना नजीकच्या परिसरात शिक्षणाची सोय उपलब्ध नाही, अशा ठिकाणी निवासी शाळा, वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे. त्याकरिता आवश्यक जागा आणि संभाव्य विद्यार्थी संख्याही मागविण्यात आली आहे. असे प्रस्ताव परिषदेकडे जिल्ह्यांनी पाठविले असून पुढील सत्रात या शाळांची निश्चिती होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय आहे पीएम-जनमन योजना?

देशातील आदिवासी समुदायातील मागास घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी २४ हजार कोटींच्या बजेटला मंजुरीही दिली. आता त्यातून आदिवासी वाड्या, वस्त्या, पोडांवर शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, आहार, पक्के रस्ते आदी विकासकामे केली जाणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रस्ताव

महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांसह देशातील १८ राज्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. तूर्त पहिल्या टप्प्यात यवतमाळ, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून प्रस्ताव मागविले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अशा दुर्गम वाडी, वस्त्या आणि पोडांची संख्या १५९ इतकी आहे. त्यापैकी मारेगाव तालुक्यात ३१ आणि झरी तालुक्यात ४० वस्त्या आहेत. तेथील विद्यार्थ्यांसाठी साखरा (मारेगाव) येथे एक आणि मुकुटबन (झरी) येथे एक अशा दोन निवासी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी एकंदर सहाशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होऊ शकणार आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ