शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पोडावरच्या पोरांसाठी सुरू होणार निवासी शाळा; केंद्राने मागविली माहिती

By अविनाश साबापुरे | Updated: January 1, 2024 18:04 IST

लोकसंख्या आणि शाळांच्या अंतराची ‘एमपीएसपी’कडून पडताळणी

अविनाश साबापुरे, यवतमाळ: दुर्गम वाडी, वस्ती, पोडावर राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लवकरच जिल्हा परिषदांच्या माध्यमातून निवासी शाळा सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यातील अशा वस्त्यांची पडताळणी करून माहिती मागविली आहे. पुढील शैक्षणिक सत्रात या शाळा सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

पीएम-जनमन योजनेतून या शाळा केल्या जाणार असून याबाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारने प्रस्ताव मागविले आहेत. त्याकरिता जिल्हा परिषदांनी आपापल्या क्षेत्रातील दुर्गम वाड्या, वस्त्या आणि पोडांवरील लोकसंख्या आणि शिक्षणविषयक परिस्थितीची पडताळणी करून ‘एमपीएसपी’कडे नुकतेच प्रस्ताव दाखल केले आहेत. आरटीई कायद्यानुसार मुलांना एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शिक्षण, ३ किलोमीटरच्या आत उच्च प्राथमिक शिक्षण आणि ५ किलोमीटरच्या आत माध्यमिक शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे; परंतु आदिवासी समुदायातील अनेक गट आजही दुर्गम पोड, तांडे आणि वस्त्यांमध्ये राहात आहेत.

अशा ठिकाणच्या मुलांना लगतच्याच परिसरात निवासी स्वरूपाचे शिक्षण मिळावे, यासाठी पीएम-जनमन योजनेतून शाळा बांधकाम करून दिले जाणार आहे. अशा प्रकारच्या वस्त्यांची यादी केंद्राकडून ‘एमपीएसपी’ला व तेथून जिल्हास्तरावर पाठवून या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. जेथील मुलांना नजीकच्या परिसरात शिक्षणाची सोय उपलब्ध नाही, अशा ठिकाणी निवासी शाळा, वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला आहे. त्याकरिता आवश्यक जागा आणि संभाव्य विद्यार्थी संख्याही मागविण्यात आली आहे. असे प्रस्ताव परिषदेकडे जिल्ह्यांनी पाठविले असून पुढील सत्रात या शाळांची निश्चिती होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय आहे पीएम-जनमन योजना?

देशातील आदिवासी समुदायातील मागास घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी २४ हजार कोटींच्या बजेटला मंजुरीही दिली. आता त्यातून आदिवासी वाड्या, वस्त्या, पोडांवर शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, आहार, पक्के रस्ते आदी विकासकामे केली जाणार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रस्ताव

महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांसह देशातील १८ राज्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. तूर्त पहिल्या टप्प्यात यवतमाळ, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून प्रस्ताव मागविले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अशा दुर्गम वाडी, वस्त्या आणि पोडांची संख्या १५९ इतकी आहे. त्यापैकी मारेगाव तालुक्यात ३१ आणि झरी तालुक्यात ४० वस्त्या आहेत. तेथील विद्यार्थ्यांसाठी साखरा (मारेगाव) येथे एक आणि मुकुटबन (झरी) येथे एक अशा दोन निवासी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी एकंदर सहाशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होऊ शकणार आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ