शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

जलाशयांमध्ये १९ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:06 IST

पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे.

ठळक मुद्देनिळोणात १२ टक्केच पाणी : २५0 तलाव कोरडेच, तीव्र पाणीटंचाईचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे. पाऊस आणखी लांबल्यास जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.सर्वाधिक पाऊस बरसणारा महिना कोरडा गेला. जूनमध्ये पावसाने दगा दिला. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र कोरडे गेले. नंतरच्या आर्दाने थोडा दिलासा दिला. तथापि अद्यापही दमदार पाऊस झालाच नाही. परिणामी जलाशयातील पाणी कमी होत आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या धरणात केवळ ०.८ दलघमी पाणी शिल्लक आहे. यामुळे यवतमाळकरांना पाणी कपातीसह भविष्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात एकूण छोटे-मोठे १०७ जलप्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ५९३ दशलक्ष घनमिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा १९ टक्केच्या घरात आहे. अनेक लघु प्रकल्प भर पावसाळ्यात कोरडे पडले आहे. पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये तर जेमतेम पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील २५० तलाव कोरडे पडले आहेत. अनेक प्रकल्पात नावालाच पाणीसाठा शिल्लक आहे. यातून गाव शिवारात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.पावसाअभावी जिल्ह्यातील ५३४ गावांतील ७६ हजार १०४ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हे टँकर दरदिवसाला ८७ फेºया मारत आहेत. पाणी भरण्यासाठी ५३४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. या ठिकाणावरून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावरून पाण्याचे भीषण दुर्भिक्ष लक्षात येत आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. मात्र पाऊस आणखी लांबल्यास अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.यवतमाळ शहरावर पाण्याचे संकटयवतमाळातील तब्बल तीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. यामुळे पुढील काळात शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचे संकेत आहे. निळोणा जलाशयात आजच्या घडीला केवळ १२.१२ टक्के, तर चापडोहमध्ये ३०.२९ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :Nilona Damनिळोणा धरणwater shortageपाणीकपात