शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

जलाशयांमध्ये १९ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:06 IST

पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे.

ठळक मुद्देनिळोणात १२ टक्केच पाणी : २५0 तलाव कोरडेच, तीव्र पाणीटंचाईचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे. पाऊस आणखी लांबल्यास जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.सर्वाधिक पाऊस बरसणारा महिना कोरडा गेला. जूनमध्ये पावसाने दगा दिला. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र कोरडे गेले. नंतरच्या आर्दाने थोडा दिलासा दिला. तथापि अद्यापही दमदार पाऊस झालाच नाही. परिणामी जलाशयातील पाणी कमी होत आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या धरणात केवळ ०.८ दलघमी पाणी शिल्लक आहे. यामुळे यवतमाळकरांना पाणी कपातीसह भविष्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात एकूण छोटे-मोठे १०७ जलप्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ५९३ दशलक्ष घनमिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा १९ टक्केच्या घरात आहे. अनेक लघु प्रकल्प भर पावसाळ्यात कोरडे पडले आहे. पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये तर जेमतेम पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील २५० तलाव कोरडे पडले आहेत. अनेक प्रकल्पात नावालाच पाणीसाठा शिल्लक आहे. यातून गाव शिवारात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.पावसाअभावी जिल्ह्यातील ५३४ गावांतील ७६ हजार १०४ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हे टँकर दरदिवसाला ८७ फेºया मारत आहेत. पाणी भरण्यासाठी ५३४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. या ठिकाणावरून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावरून पाण्याचे भीषण दुर्भिक्ष लक्षात येत आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. मात्र पाऊस आणखी लांबल्यास अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.यवतमाळ शहरावर पाण्याचे संकटयवतमाळातील तब्बल तीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. यामुळे पुढील काळात शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचे संकेत आहे. निळोणा जलाशयात आजच्या घडीला केवळ १२.१२ टक्के, तर चापडोहमध्ये ३०.२९ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :Nilona Damनिळोणा धरणwater shortageपाणीकपात