शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

जलाशयांमध्ये १९ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:06 IST

पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे.

ठळक मुद्देनिळोणात १२ टक्केच पाणी : २५0 तलाव कोरडेच, तीव्र पाणीटंचाईचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळा सुरु होऊन आता दीड महिना उलटला. मात्र अद्यापही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. नदी, नाले कोरडे आहेत. जलाशयही ठण्ण आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशयात आता केवळ १९ टक्के पाणीसाठा उरला आहे. पाऊस आणखी लांबल्यास जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.सर्वाधिक पाऊस बरसणारा महिना कोरडा गेला. जूनमध्ये पावसाने दगा दिला. रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्र कोरडे गेले. नंतरच्या आर्दाने थोडा दिलासा दिला. तथापि अद्यापही दमदार पाऊस झालाच नाही. परिणामी जलाशयातील पाणी कमी होत आहे. विशेष म्हणजे यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या धरणात केवळ ०.८ दलघमी पाणी शिल्लक आहे. यामुळे यवतमाळकरांना पाणी कपातीसह भविष्यात पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात एकूण छोटे-मोठे १०७ जलप्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ५९३ दशलक्ष घनमिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा १९ टक्केच्या घरात आहे. अनेक लघु प्रकल्प भर पावसाळ्यात कोरडे पडले आहे. पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये तर जेमतेम पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील २५० तलाव कोरडे पडले आहेत. अनेक प्रकल्पात नावालाच पाणीसाठा शिल्लक आहे. यातून गाव शिवारात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.पावसाअभावी जिल्ह्यातील ५३४ गावांतील ७६ हजार १०४ नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हे टँकर दरदिवसाला ८७ फेºया मारत आहेत. पाणी भरण्यासाठी ५३४ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहे. या ठिकाणावरून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यावरून पाण्याचे भीषण दुर्भिक्ष लक्षात येत आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकरची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. मात्र पाऊस आणखी लांबल्यास अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.यवतमाळ शहरावर पाण्याचे संकटयवतमाळातील तब्बल तीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. यामुळे पुढील काळात शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचे संकेत आहे. निळोणा जलाशयात आजच्या घडीला केवळ १२.१२ टक्के, तर चापडोहमध्ये ३०.२९ दशलक्ष घनमिटर पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :Nilona Damनिळोणा धरणwater shortageपाणीकपात