शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

आरक्षण महिलांचे, गर्दी पुरुषांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हाभरातील महिला सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत ठेवण्यात आली होती. हे आरक्षण जाणून घेण्यासाठी महिलांची उपस्थिती क्रमप्राप्त होती. असे असले तरी महिला आरक्षण जाणून घेण्यासाठी केवळ चार सरपंच महिला आणि इतर सर्व पुरुष पुढारी असे चित्र सभागृहात होते.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीत उडाला गोंधळ : वीज गुल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २०२५ पर्यंत महिला आरक्षणाची स्थिती काय असेल यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षणाची सोडत ठेवण्यात आली होती. या सोडतीसाठी महिला नव्हे तर चक्क पुरुषच आले होते. यामुळे महिला आरक्षणावरच पुरुषांचे राजकारण अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले.गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हाभरातील महिला सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत ठेवण्यात आली होती. हे आरक्षण जाणून घेण्यासाठी महिलांची उपस्थिती क्रमप्राप्त होती. असे असले तरी महिला आरक्षण जाणून घेण्यासाठी केवळ चार सरपंच महिला आणि इतर सर्व पुरुष पुढारी असे चित्र सभागृहात होते. विशेष म्हणजे आरक्षण जाहीर करताना कुठलेही नियोजन नसल्याची बाब यावेळी दिसून आली.महागाव तालुक्यातील आरक्षण जाहीर झाल्यानंतर वीज गेली, त्याला पर्याय म्हणून ईन्व्हर्टरची व्यवस्था असणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तशी कुठलीच व्यवस्था सोडतीच्या ठिकाणी नव्हती. यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय आरक्षण जाहीर केले जात होते. याचा कुठलाही आवाज शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नव्हता. अशाच स्थितीत चार तालुक्याचे आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण घोषित करताना प्रचंड गोंधळ पहायला मिळाला. कुणालाही स्पष्टपणे ऐकायला येत नव्हते. जाहीर करणारे तहसीलदार अतिशय वेगाने गावांची नावे वाचून दाखवित होते. त्यात स्पीकर नसल्याने कुणाला गावांची नावे ऐकूच येत नव्हती. हा गोंधळ वाढल्याने गावकऱ्यांनी टेबल भोवती घोळका धरला होता. यातून स्थिती अधिकच बिकट झाली. या सर्व गोंधळात आरक्षण जाहीर होणारे तालुके पुढे जात होते. रात्री ८ पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कुठलीही व्यवस्था नव्हती. या सर्व स्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात होता.प्रवर्गनिहाय राखीव झालेल्या जागागुरुवारी अनुसूचित जातीच्या ६२ जागा महिला सरपंचासाठी आरक्षित करण्यात आल्या. अनुसूचित जमातीच्या ८५ जागा महिला सरपंच पदासाठी आरक्षित राहिल्या. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील १४१ जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. सर्वसामान्य गटातील २३५ जागा महिला सरपंचासाठी आरक्षित राहिल्या.यासोबतच पेसा ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला आरक्षणही यावेळी जाहीर करण्यात आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक