शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आनंदनगरातील अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य सुरू; हेलिकाॅप्टरला योग्य जागा मिळेना  

By विशाल सोनटक्के | Updated: July 22, 2023 18:25 IST

गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पूस नदीच्या पुरात अडकून पडले.

महागाव (यवतमाळ) : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पूस नदीच्या पुरात अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी छत्तीसगडवरून हेलिकाॅप्टर मागविण्यात आले. मात्र हेलिकाॅप्टर उतरविण्यासाठी ऐनवेळी योग्य जागाच मिळाली नाही. त्यामुळे हेलिकाॅप्टर खडका गावात उतरविण्यात आले. तर आनंदनगरातील नागरिकांना ऐनवेळी बोटीद्वारे बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील अनंतवाडी गटग्रामपंचायतीमधील आनंदनगर ही छोटीशी वस्ती पूस नदीच्या विस्तीर्ण पात्रातील एका छोट्या टेकडीवर वसली आहे. तेथील नागरिकांना नदीपात्रातूनच येण्याजाण्याचा मार्ग शोधावा लागतो. परंतु सध्या सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे या वस्तीला भयंकर पुराचा वेढा पडल्याने सर्व नागरिक अडकून पडले आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांनी मदतीची याचना सुरू केली. जिल्हा प्रशासनाने या नागरिकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी थेट छत्तीसगडवरून हेलिकाॅप्टर मागविले. शनिवारी दुपारी साधारण ४.३० वाजताच्या सुमारास हेलिकाॅप्टर महागाव तालुक्यात दाखल झाले.

 परंतु तालुक्यात कुठेच हेलिपॅड नसल्यामुळे लॅन्डींगचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय हेलिकाॅप्टरला उतरविण्यासाठी अनंतवाडीनजीक जागाच नव्हती. त्यामुळे हेलिकाॅप्टर खडका गावात उतरविण्यात आले. यादरम्यानच्या काळात आनंदनगरातील नागरिकांना बचाव पथकाने बोटीद्वारे नदीकाठावर आणणे सुरू केले. त्याचवेळी हेलिकाॅप्टरही नदीपात्राच्या जवळपास पोहोचले. आता बोट आणि हेलिकाॅप्टर अशा दोन्ही माध्यमातून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळRainपाऊस