शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

निवडणुकीत नेत्यांनी राखली गावात प्रतिष्ठा

By admin | Updated: May 6, 2015 01:59 IST

तालुक्यातील पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी आपआपल्या गावात...

दारव्हा : तालुक्यातील पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी आपआपल्या गावात विजय मिळवून आपली पत ंराखली. सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक अद्याप व्हायची आहे. परंतु निवडून आलेल्या सदस्य संख्येवरून अनेक ठिकाणी चित्र स्पष्ट झाले आहे.पहिल्या टप्प्यात ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सर्वच गावात निवडणूक अटीतटीची झाली. तरी राजकीय नेत्यांच्या गावात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोठी ग्रामपंचायत असलेल्या तळेगाव येथे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य संगीता इंगोले, माजी पंचायत समिती सदस्य माधव राठोड, सिंधू राठोड आदींनी बाजी मारली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, पंचायत समिती सदस्य माणिक राठोड यांचे गाव असलेल्या फुबगाव येथे शिवसेनेने यश प्राप्त केले.युवा सेनेचे तालुका प्रमुख शैलेश डहाके यांनी चिखली येथे स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांच्या मदतीने गावात आपले वर्चस्व निर्माण केले. त्याच बरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवसेनेचे अजय गाडगे यांनी सांगवी ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळविले. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा बऱ्यापैकी यश संपादन केले आहे. आपसी मतभेद असतानासुद्धा परिस्थिती ओळखून या पक्षाच्या गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी एकत्र येवून अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतल्या.भांडेगाव येथे उत्तमराव गोमासे, रमेश वानखडे, बाबूसेठ इसाणी, सुनील तडके, जगदीश अघम आदींनी पुढाकार घेवून विजयश्री मिळविला. पाथ्रडदेवी येथील निवडणुकीत लंकेश्वर जाधव, लिंबासिंग पवार यांनी संयुक्तरित्या विजय प्राप्त केला. हातगावात या दोन्ही पक्षाने एकत्र येवून निवडणूक जिंकली. या ठिकाणी डी.डी. गिरी, किशोर चारोळे यांनी नेतृत्व केले. देऊळगाव (वळसा) येथील निवडणुकीत राजकुामर राठोड, धीरज राठोड यांनी स्थानिकांच्या मदतीने आपला झेंडा फडकाविला. तरी काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढत पक्षाला विजय मिळवून दिला. हरू येथील निवडणुकीत किशोर नरवडे, निरज नरवडे यांनी विरोधकांना धूळ चारली. कारजगाव येथे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ जाधव, लक्ष्मण चव्हाण यांनी पक्षाचा झेंडा फडकाविला. दूधगाव येथे मुस्ताक पटेल यांनी पॅनल निवडून आणले. त्याचप्रमाणे नायगावात काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शेलकर, नाना पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या निवडणुकीत बाजी मारून आपली प्रतिष्ठा राखली. मोठमोठ्या पक्षांनी किमान गावात तरी आपली प्रतिष्ठा राखल्याने त्यांच्या पक्षाकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी निवडणुकीत मोठ्या नेत्यांचाही सहभाग चर्चेचा ठरला. (तालुका प्रतिनिधी)