शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त आदिवासी शिक्षकांचे निवेदन

By admin | Updated: December 17, 2015 02:33 IST

जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आदिवासी शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या आदिवासी शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यानिवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहे. जिल्हा परिषदेत १९७२ नंतर आणि १९८६ पूर्वी रुजू झालेले आदिवासी शिक्षक ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. सेवा कालावधीत त्यांनी डीएडची परीक्षा दिली. मात्र यात ते यशस्वी होवू शकले नाही. वेगवेगळे शैक्षणिक शिबिर आणि अनुभवाच्या आधारे त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत विद्यादान केले. जिल्हा परिषदेनेही त्यांच्याकडून काम करून घेतले. वेतनश्रेणीही लागू केली. मात्र ‘डीम ट्रेन’ या नावाखाली त्यांना पेन्शन लागू करण्यात आली नाही. १९७२ नंतर आणि जून १९८६ पूर्वी लागलेल्या एसएससी परंतु डीएड नसलेल्या शिक्षकांची माहिती शासनाने ‘डीम ट्रेन’ प्रशिक्षित शिक्षक समजण्यासंबंधी २००२ मध्ये मागविली होती. जिल्हा परिषदेने मात्र ही माहिती पाठविण्यात चालढकल केली. आता या सेवानिवृत्त आदिवासी शिक्षकांना पेन्शनअभावी हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. या शिक्षकांना जिल्हा परिषदेने पेन्शन त्वरित लागू करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदन देताना बाबाराव मडावी, एम.के. कोडापे, प्रा. वसंत कनाके, पांडुरंग व्यवहारे, डॉ. उरकुडे, कनाके, लक्ष्मणराव भिवनकर, श्रावण पाडसेनेकुन, तुकाराम मेश्राम, किशोर नागभिडकर, गजानन उईके, नरोटे, सोनवणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)