शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
7
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
8
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
9
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
10
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
11
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
12
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
13
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
14
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
15
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
16
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
17
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
18
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
19
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
20
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 

मारेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:46 IST

तालुक्याचे वैभव ठरू शकतील, असे चार धार्मिक स्थळे तालुक्यात आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधीही पुरेसे लक्ष देत नसल्याने या धार्मिक स्थळांची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनासह लोकप्रतिनिधींचीही उदासीनता : ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा केवळ नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्याचे वैभव ठरू शकतील, असे चार धार्मिक स्थळे तालुक्यात आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधीही पुरेसे लक्ष देत नसल्याने या धार्मिक स्थळांची दुरवस्था झाली आहे. अनेक मंदिरे मोडकळीस आली असून काही वर्षात ही धार्मिकस्थळे नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे.भौगोलिकदृष्ट्या मारेगाव तालुका हा वनराईने नटलेला आहे. पुरातन काळापासून तालुक्यात काही धार्मिक स्थळे असून तालुक्यातील नागरिकांसह लांबवरून भाविक या धार्मिकस्थळांना वर्षभर भेटी देत असतात. श्रद्धेने पूजापाठ व धार्मिक विधी उरकवतात. वणी-यवतमाळ मार्गावरील जळका येथे हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे. पांडव अज्ञातवासात असताना ते काही काळ या मंदिरात थांबल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे मंदिर खूप प्राचीन असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. या मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असून निसर्गरम्य वनराईने हा परिसर सजला आहे.शासनाने १० वर्षापूर्वी या मंदिराच्या विकासासाठी निधी दिला होता. परंतु मंदिराचा विकास होण्यापेक्षा मंदिर भकास अवस्थेत गेले आहे. मंदिराचा बराचसा भाग जीर्ण अवस्थेत असून मंदिर मोडकळीस आले आहे. पुरातत्व विभागाने मंदिराच्या देखभालीकडे लक्ष न दिल्यास मंदिर जमिनदोस्त होण्याची भिती भाविकांमध्ये आहे. असेच हेमाडपंथी पुरातन देविचे मंदिर मच्छिंद्रा येथे आहे. राजकीय पुढारी व भाविक या देवीला नवस बोलतात. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख पंचक्रोशीत आहे.नैसर्गीक थंड व गरम पाण्याचेही तेथे झरे आहेत, हे विशेष. परंतु हे मंदिरही आता मोडकळीस आले आहे. तालुक्यातील बोरी गदाजी येथे धुलीवंदनाला खेळली जाणारी गोटमार यात्रा महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेला राज्याबाहेरील भाविकही उपस्थित राहतात. संत गदाजी महाराजांचे मंदिर हे नदीतिरावर आहे. इतके प्रसिद्ध मंदिर असतानाही मात्र मंदिराचा कोणताही विकास झाला नाही.नवरगाव येथील तुळसा माता मंदिरालाही ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा आहे. मात्र हे मंदिरही विकासापासून वंचित आहे. या मंदिरातही दरवर्षीच यात्रेचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे तालुक्यातील या चारही धार्मिक स्थळांचा शासनाने विकास करावा, अशी तालुक्यातील भाविकांची अपेक्षा आहे.