शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

मारेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:46 IST

तालुक्याचे वैभव ठरू शकतील, असे चार धार्मिक स्थळे तालुक्यात आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधीही पुरेसे लक्ष देत नसल्याने या धार्मिक स्थळांची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासनासह लोकप्रतिनिधींचीही उदासीनता : ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा केवळ नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्याचे वैभव ठरू शकतील, असे चार धार्मिक स्थळे तालुक्यात आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधीही पुरेसे लक्ष देत नसल्याने या धार्मिक स्थळांची दुरवस्था झाली आहे. अनेक मंदिरे मोडकळीस आली असून काही वर्षात ही धार्मिकस्थळे नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे.भौगोलिकदृष्ट्या मारेगाव तालुका हा वनराईने नटलेला आहे. पुरातन काळापासून तालुक्यात काही धार्मिक स्थळे असून तालुक्यातील नागरिकांसह लांबवरून भाविक या धार्मिकस्थळांना वर्षभर भेटी देत असतात. श्रद्धेने पूजापाठ व धार्मिक विधी उरकवतात. वणी-यवतमाळ मार्गावरील जळका येथे हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे. पांडव अज्ञातवासात असताना ते काही काळ या मंदिरात थांबल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे मंदिर खूप प्राचीन असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. या मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असून निसर्गरम्य वनराईने हा परिसर सजला आहे.शासनाने १० वर्षापूर्वी या मंदिराच्या विकासासाठी निधी दिला होता. परंतु मंदिराचा विकास होण्यापेक्षा मंदिर भकास अवस्थेत गेले आहे. मंदिराचा बराचसा भाग जीर्ण अवस्थेत असून मंदिर मोडकळीस आले आहे. पुरातत्व विभागाने मंदिराच्या देखभालीकडे लक्ष न दिल्यास मंदिर जमिनदोस्त होण्याची भिती भाविकांमध्ये आहे. असेच हेमाडपंथी पुरातन देविचे मंदिर मच्छिंद्रा येथे आहे. राजकीय पुढारी व भाविक या देवीला नवस बोलतात. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख पंचक्रोशीत आहे.नैसर्गीक थंड व गरम पाण्याचेही तेथे झरे आहेत, हे विशेष. परंतु हे मंदिरही आता मोडकळीस आले आहे. तालुक्यातील बोरी गदाजी येथे धुलीवंदनाला खेळली जाणारी गोटमार यात्रा महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेला राज्याबाहेरील भाविकही उपस्थित राहतात. संत गदाजी महाराजांचे मंदिर हे नदीतिरावर आहे. इतके प्रसिद्ध मंदिर असतानाही मात्र मंदिराचा कोणताही विकास झाला नाही.नवरगाव येथील तुळसा माता मंदिरालाही ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा आहे. मात्र हे मंदिरही विकासापासून वंचित आहे. या मंदिरातही दरवर्षीच यात्रेचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे तालुक्यातील या चारही धार्मिक स्थळांचा शासनाने विकास करावा, अशी तालुक्यातील भाविकांची अपेक्षा आहे.