शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

पुनर्वसित शिरपूर आठ वर्षांपासून अंधारात

By admin | Updated: September 11, 2014 23:51 IST

शीप नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्वसित शिरपूरमधील नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गावात वीजच पोहोचली नाही.

महागाव : शीप नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्वसित शिरपूरमधील नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गावात वीजच पोहोचली नाही. रस्ता आणि पाण्याचीही समस्या कायम आहे. त्यामुळे पुनर्वसित गावातील नागरिक अनंत यातना भोगत आहे. महागाव तालुक्यातील शिरपूर हे शीप नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे. २००६ साली अतिवृष्टी झाली. त्यात शीप नदीला महापूर आला. संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला. अनेक घरे पुरात वाहून गेली. नदी काठावर असलेल्या घरांचे पुनर्वसन केल्याशिवाय पर्याय नव्हता. तत्कालीन जिल्हाधिकारी हर्षदीप कांबळे यांनी तीन दिवसात येथील पूरग्रस्तांना जमेल तेवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच पुनर्वसनाचा प्रस्तावही तयार केला. त्यानंतर नदी तीरावरील १०० घरांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र नागरी सुविधा देण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. गेल्या आठ वर्षांपासून या वस्तीत वीजच पोहोचली नाही. रस्ता आणि पाण्याचीही समस्या कायम आहे. या गावात शीप नदी ओलांडून प्रवेश करावा लागतो. नदीला पाणी असल्यास नागरिकांचे हाल होतात. १०० पक्की घरे बांधली असली तरी त्यांचे रितसर वाटप झाले नसल्याची माहिती आहे. डॉ. अरुण पाटील यांनी पुनर्वसित गावच्या नागरी सुविधा आणि मूलभूत सुविधा तत्काळ देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी आणि खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनासुद्धा निवेदन दिले. मात्र गेल्या आठ वर्षात या गावातील समस्या सुटायला तयार नाही. नागरिक विविध समस्यांचा सामना करताना दिसतात. पावसाळ्याच्या दिवसात अंधारात चिखल तुडवित जावे लागते. सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे लहान मुले आणि महिला तर घराच्या बाहेरही पडत नाही. निसर्गाने उद्ध्वस्त केले. मात्र प्रशासनाने आहे त्या स्थितीत सोडून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. (शहर प्रतिनिधी)