शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित शिरपूर आठ वर्षांपासून अंधारात

By admin | Updated: September 11, 2014 23:51 IST

शीप नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्वसित शिरपूरमधील नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गावात वीजच पोहोचली नाही.

महागाव : शीप नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्वसित शिरपूरमधील नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गावात वीजच पोहोचली नाही. रस्ता आणि पाण्याचीही समस्या कायम आहे. त्यामुळे पुनर्वसित गावातील नागरिक अनंत यातना भोगत आहे. महागाव तालुक्यातील शिरपूर हे शीप नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे. २००६ साली अतिवृष्टी झाली. त्यात शीप नदीला महापूर आला. संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला. अनेक घरे पुरात वाहून गेली. नदी काठावर असलेल्या घरांचे पुनर्वसन केल्याशिवाय पर्याय नव्हता. तत्कालीन जिल्हाधिकारी हर्षदीप कांबळे यांनी तीन दिवसात येथील पूरग्रस्तांना जमेल तेवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच पुनर्वसनाचा प्रस्तावही तयार केला. त्यानंतर नदी तीरावरील १०० घरांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र नागरी सुविधा देण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. गेल्या आठ वर्षांपासून या वस्तीत वीजच पोहोचली नाही. रस्ता आणि पाण्याचीही समस्या कायम आहे. या गावात शीप नदी ओलांडून प्रवेश करावा लागतो. नदीला पाणी असल्यास नागरिकांचे हाल होतात. १०० पक्की घरे बांधली असली तरी त्यांचे रितसर वाटप झाले नसल्याची माहिती आहे. डॉ. अरुण पाटील यांनी पुनर्वसित गावच्या नागरी सुविधा आणि मूलभूत सुविधा तत्काळ देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी आणि खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनासुद्धा निवेदन दिले. मात्र गेल्या आठ वर्षात या गावातील समस्या सुटायला तयार नाही. नागरिक विविध समस्यांचा सामना करताना दिसतात. पावसाळ्याच्या दिवसात अंधारात चिखल तुडवित जावे लागते. सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे लहान मुले आणि महिला तर घराच्या बाहेरही पडत नाही. निसर्गाने उद्ध्वस्त केले. मात्र प्रशासनाने आहे त्या स्थितीत सोडून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. (शहर प्रतिनिधी)