शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

पुनर्वसित शिरपूर आठ वर्षांपासून अंधारात

By admin | Updated: September 11, 2014 23:51 IST

शीप नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्वसित शिरपूरमधील नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गावात वीजच पोहोचली नाही.

महागाव : शीप नदीच्या महापुरात उद्ध्वस्त झाल्यानंतर पुनर्वसित शिरपूरमधील नागरिकांना अनंत समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गावात वीजच पोहोचली नाही. रस्ता आणि पाण्याचीही समस्या कायम आहे. त्यामुळे पुनर्वसित गावातील नागरिक अनंत यातना भोगत आहे. महागाव तालुक्यातील शिरपूर हे शीप नदीच्या तीरावर वसलेले गाव आहे. २००६ साली अतिवृष्टी झाली. त्यात शीप नदीला महापूर आला. संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला. अनेक घरे पुरात वाहून गेली. नदी काठावर असलेल्या घरांचे पुनर्वसन केल्याशिवाय पर्याय नव्हता. तत्कालीन जिल्हाधिकारी हर्षदीप कांबळे यांनी तीन दिवसात येथील पूरग्रस्तांना जमेल तेवढ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच पुनर्वसनाचा प्रस्तावही तयार केला. त्यानंतर नदी तीरावरील १०० घरांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र नागरी सुविधा देण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. गेल्या आठ वर्षांपासून या वस्तीत वीजच पोहोचली नाही. रस्ता आणि पाण्याचीही समस्या कायम आहे. या गावात शीप नदी ओलांडून प्रवेश करावा लागतो. नदीला पाणी असल्यास नागरिकांचे हाल होतात. १०० पक्की घरे बांधली असली तरी त्यांचे रितसर वाटप झाले नसल्याची माहिती आहे. डॉ. अरुण पाटील यांनी पुनर्वसित गावच्या नागरी सुविधा आणि मूलभूत सुविधा तत्काळ देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी आणि खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनासुद्धा निवेदन दिले. मात्र गेल्या आठ वर्षात या गावातील समस्या सुटायला तयार नाही. नागरिक विविध समस्यांचा सामना करताना दिसतात. पावसाळ्याच्या दिवसात अंधारात चिखल तुडवित जावे लागते. सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे लहान मुले आणि महिला तर घराच्या बाहेरही पडत नाही. निसर्गाने उद्ध्वस्त केले. मात्र प्रशासनाने आहे त्या स्थितीत सोडून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. (शहर प्रतिनिधी)