शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित धारकान्हा विकासापासून कोसो दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:54 IST

तालुक्यातील धारकान्हा गाव गत ३६ वर्षांपासून विविध समस्यांच्या चक्रव्यूहात सापडले आहे.

नागरिकांचे निवेदन : गावकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष विश्वनाथ महामुने । लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : तालुक्यातील धारकान्हा गाव गत ३६ वर्षांपासून विविध समस्यांच्या चक्रव्यूहात सापडले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने येथे वीज, रस्ता, पाणी, आरोग्य आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. धारकान्हा हे पुनर्वसित गाव आहे. १९८१ साली गावाचे पुनर्वसन झाले. तेव्हापासून गावात कोणत्याही सुविधा निर्माण केल्या नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. सर्वत्र चिखल पसरला आहे. त्यातच वीजपुरवठा नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. सरपटणारे विषारी प्राणी दिवसा आणि रात्रीही दिसतात. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी कुणीही गावाबाहेर पडण्याची हिमत करीत नाही. गावात जीवनावश्यक वस्त धान्य दुकान आणि रॉकेल विक्रेता नाही. दुसऱ्या गावात जावून रॉकेल आणावे लागते. पिण्याच्या पाण्याची सोय नसून नागरिकांना अशुद्ध पाण्यावर तहान भागवावी लागते. रस्त्याचा प्रश्न एवढा बिकट आहे की, दिवसाही जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. गावचा परिसर पुसद बाजारपेठेशी जोडला आहे. रुग्णांना रात्री-अपरात्री नेणे त्रासाचे होत आहे. समस्यांबाबत गावकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने दिली. परंतु कुणीही दखल घेतली नाही. गावकरी धडकले तहसीलवर गत ३६ वर्षांपासून विकास म्हणजे काय असते, याचे दर्शन न झालेल्या धारकान्हाच्या नागरिकांनी महागाव तहसीलवर धडक दिली. गावातील समस्यांचा पाढा वाचून निवेदन दिले. यावेळी यादव मोरे, पंजाब गादेकर, बाजीराव ढोले, किसन उघडे, शालिग्राम मोरे, वाघाजी इंगळे, गजानन डोंगरे, तानाजी खरात, अंबादास पारस्कर, निसार बेग, सुभाष ढगे, माधव कांबळे, संजय उघडे, रमेश कांबळे, सुरेश जोगदंडे, गजानन कांबळे, लक्ष्मण देवारे, दत्ता भडंगे, अंबादास उघडे, सुभाष मदने, अशोक ढोले, शिवाजी खरात, नामदेव जोगदंडे, संघशील जोगदंडे, राहूल कांबळे, खंडू कांबळे, सीताराम भालेराव, दीपक भालेराव, संजय भिसे, दादाराव मोरे आदी उपस्थित होते.