शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अपहारातील निधीची वसुली करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा

By admin | Updated: June 2, 2015 23:58 IST

शासनाच्या विविध विकास कामात अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांकडून अपहाराची रक्कम वसूल..

सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा, विकास कामांतील भ्रष्टाचारयवतमाळ : शासनाच्या विविध विकास कामात अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांकडून अपहाराची रक्कम वसूल करून सोबतच गुन्हेही दाखल करा, अशा सुचना जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या सभेत दिली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र्र काटपल्लीवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जातात. या कामांमध्ये कंत्राटदारांसह शासकीय व्यक्तीही अपहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक हेही अपहारात सहभागी असतात. शासनाची विकास कामे गुणवत्तापुर्वक आणि ठरल्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. अशी कामे झाली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांकडून व्याजासह अपहारातील सर्व रक्कम वसूल करा. बरेचदा रक्कम वसूल झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे टाळल्या जाते. आता थेट संबधीतावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. बैठकीत भ्रष्टाचाराची एकूण आठ प्रकरणे चर्चेला आली. त्यातील पहिले प्रकरण दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथील रोहयोअंतर्गत सिमेंट बंधारा, पुरसंरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्ते, वृक्ष लागवड, नाला सरळीकरणाच्या कामातील भ्रष्टाचाराचे होते. सदर भ्रष्टाचार चौकशीनंतर सिध्द झाल्याने गावातील तत्कालीन ग्रामसेवक व सरपंचावर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. आर्णी तालुक्यातील नालासरळीकरण व बोगस मजूर दाखवून केलेल्या भ्रष्टाचारात सरपंच व ग्रामसेविकेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले असून तत्कालीन बिडीओ व शाखा अभियंत्यास स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.उमरखेड तालुक्यातील दराटी येथील राष्ट्रीय ग्रामिण पेयजलच्या नळयोजना, घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील हरियाली योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणातही तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. उमरखेड तालुक्यातील आठमुर्डी व एकबुर्जी येथील सिमेंट नाला व शेततळ्याच्या कामाची चौकशी जलसंपदा विभागाकडून करण्याच्या सुचना केल्या आहेत. (कार्यालय प्रतिनिधी) भ्रष्टाचार आढळल्यास पुराव्यानिशी तक्रार नोंदवाजिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे सुरु आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी पुराव्यानिशी तक्रारी लोकशाही दिनात दहा दिवसापुर्वी अर्ज सादर करून दाखल कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.