शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नोंद ७०० गाड्यांची खरेदी केवळ १५ गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. आता मात्र कापसाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे.

ठळक मुद्देकापसाची करुण कहाणी : सीसीआयच्या दिरंगाईने मानसिक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेतकऱ्याला कापसाचे उत्पादन घेण्यासाठी जितके परिश्रम घ्यावे लागले नाही त्यापेक्षा अधिक घाम तो कापूस विकण्यासाठी गाळवा लागत आहे. त्यातही कापसाचा मोबदला कधी मिळेल याचा नेम नाही. कापूस खरेदी केंद्रावर ७०० गाड्यांची नोंद आहे. मात्र दिवसाला केवळ १५ गाड्या मोजल्या जातात. अशी करुण कहाणी पांढऱ्या कापसाची आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. आता मात्र कापसाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. हा घरात साठवलेला कापूस पावसाळा तोंडावर आला असूनही बाजारात विकण्याची सोय नाही. खासगी खरेदीदार अतिशय पडेल दरात कापूस मागत आहे. शासनाने सीसीआयच्या माध्यमातून सुरू केलेली कापूस खरेदी मंद गतीने सुरू आहे. अशा स्थितीत शेतकरी या कापसाचे करायचे काय, या विवंचनेत अडकला आहे. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्या तुलनेत कापसाचे मोजमाप होताना दिसत नाही. दिवसाला १० ते १५ गाड्या कापूस मोजला जातो. या गतीने कापूस खरेदी सुरू राहिल्यास पुढचा खरीप हंगाम संपला तरी मागच्या खरिपाच्या कापसाची खरेदी संपणार नाही, अशी अवस्था आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले जात आहे. स्थानिक पातळीवरून सीसीआय व पणनच्या यंत्रणेला सूचनाही दिल्या जातात. मात्र या सूचनांची कोणतीच दखल ही यंत्रणा घेताना दिसत नाही. इतकेच काय, ज्या शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला त्याच्या मोबदल्याचीही रक्कम अडकून पडली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज आहे. हंगाम सुरू असूनही बी-बियाणे, खत घेण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.नेर बाजार समितीत तूर, चना, सोयाबीन विक्रीसाठी तीन हजार २१२ नोंदी झाल्या आहेत. मात्र आतापर्यंत नाफेडने एक हजार १५० शेतकºयांनाच खरेदीसाठी बोलाविले. अजूनही दोन हजार ६२ शेतकरी धान्य विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकºयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे.राष्ट्रवादीचे नेर तहसीलदारांना निवेदनशेतकऱ्यांचा शेतमाल कापूस व इतर धान्य वेळेत खरेदी करून मोबदला द्यावा यासाठी प्रशासनाने तत्काळ नियोजन करावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांनी बाजार समिती सभापती भाऊराव ढवळे यांना दिले. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांनाही निवेदन दिले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी