शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

नोंद ७०० गाड्यांची खरेदी केवळ १५ गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. आता मात्र कापसाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे.

ठळक मुद्देकापसाची करुण कहाणी : सीसीआयच्या दिरंगाईने मानसिक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शेतकऱ्याला कापसाचे उत्पादन घेण्यासाठी जितके परिश्रम घ्यावे लागले नाही त्यापेक्षा अधिक घाम तो कापूस विकण्यासाठी गाळवा लागत आहे. त्यातही कापसाचा मोबदला कधी मिळेल याचा नेम नाही. कापूस खरेदी केंद्रावर ७०० गाड्यांची नोंद आहे. मात्र दिवसाला केवळ १५ गाड्या मोजल्या जातात. अशी करुण कहाणी पांढऱ्या कापसाची आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. आता मात्र कापसाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. हा घरात साठवलेला कापूस पावसाळा तोंडावर आला असूनही बाजारात विकण्याची सोय नाही. खासगी खरेदीदार अतिशय पडेल दरात कापूस मागत आहे. शासनाने सीसीआयच्या माध्यमातून सुरू केलेली कापूस खरेदी मंद गतीने सुरू आहे. अशा स्थितीत शेतकरी या कापसाचे करायचे काय, या विवंचनेत अडकला आहे. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्या तुलनेत कापसाचे मोजमाप होताना दिसत नाही. दिवसाला १० ते १५ गाड्या कापूस मोजला जातो. या गतीने कापूस खरेदी सुरू राहिल्यास पुढचा खरीप हंगाम संपला तरी मागच्या खरिपाच्या कापसाची खरेदी संपणार नाही, अशी अवस्था आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले जात आहे. स्थानिक पातळीवरून सीसीआय व पणनच्या यंत्रणेला सूचनाही दिल्या जातात. मात्र या सूचनांची कोणतीच दखल ही यंत्रणा घेताना दिसत नाही. इतकेच काय, ज्या शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला त्याच्या मोबदल्याचीही रक्कम अडकून पडली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज आहे. हंगाम सुरू असूनही बी-बियाणे, खत घेण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.नेर बाजार समितीत तूर, चना, सोयाबीन विक्रीसाठी तीन हजार २१२ नोंदी झाल्या आहेत. मात्र आतापर्यंत नाफेडने एक हजार १५० शेतकºयांनाच खरेदीसाठी बोलाविले. अजूनही दोन हजार ६२ शेतकरी धान्य विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकºयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे.राष्ट्रवादीचे नेर तहसीलदारांना निवेदनशेतकऱ्यांचा शेतमाल कापूस व इतर धान्य वेळेत खरेदी करून मोबदला द्यावा यासाठी प्रशासनाने तत्काळ नियोजन करावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांनी बाजार समिती सभापती भाऊराव ढवळे यांना दिले. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांनाही निवेदन दिले.

 

टॅग्स :Farmerशेतकरी