शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जिल्हा बँकेची आचारसंहिता शिथिल करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २६ मार्च रोजी होऊ घातली होती. परंतु त्यापूर्वी दोन दिवस आधीच ही निवडणूक थांबविली गेली. सध्या बँकेत व्यवस्थापनाच्या देखरेखीत कारभार सुरू आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करायचे आहे. याशिवाय कर्जमाफी, व्याजमाफी व इतरही काही महत्वाचे विषय आहे. त्यावर संचालक मंडळाला चर्चा करायची आहे.

ठळक मुद्देनिवडणूक प्राधिकरण : संचालक मंडळाची ८ मे रोजी बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप पीक कर्ज वाटपासह अनेक महत्वाचे विषय चर्चेला असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला लागू असलेली निवडणूक आचारसंहिता शिथिल करावी, अशी विनंती बँकेने केली होती. मात्र प्राधिकरणाने ही विनंती फेटाळून लावली. परंतु बँकेच्या संचालक मंडळाची सभा घेण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक २६ मार्च रोजी होऊ घातली होती. परंतु त्यापूर्वी दोन दिवस आधीच ही निवडणूक थांबविली गेली. सध्या बँकेत व्यवस्थापनाच्या देखरेखीत कारभार सुरू आहे. जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप करायचे आहे. याशिवाय कर्जमाफी, व्याजमाफी व इतरही काही महत्वाचे विषय आहे. त्यावर संचालक मंडळाला चर्चा करायची आहे. त्याकरिता बँकेला लागू असलेली निवडणूक आचारसंहिता शिथिल करावी, अशी विनंती २० एप्रिल रोजी बँकेने अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे केली होती. मात्र आचारसंहिता शिथिल करता येणार नाही असे पत्र ३० एप्रिल रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी पाठविले.त्याचवेळी बँकेचे संचालक मंडळ व विविध समित्यांच्या बैठका घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. केवळ मतदारांवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडेल असे निर्णय घेऊ नये याचे बंधन घातले गेले आहे.त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची ८ मे रोजी दुपारी १ वाजता बैठक बोलविण्यात आली आहे. मासिक खर्चास मंजुरी, ताळेबंद, ठेवींचा आढावा, लॉकडाऊन काळात बँकेने घेतलेल्या निर्णयांची नोंद, ओटीएस धोरणास मुदतवाढ, नव्या सभासदांना पीक कर्ज वाटपाचा दर ठरविणे, शाखानिहाय ठेवींचे उद्दीष्ट निश्चित करणे, बँकेच्या ठेवींवरील व्याज दरात बदल करणे, नाबार्ड तपासणी अहवालावर चर्चा व नोंद, सुरक्षा व्यवस्थेच्या नव्या करारावर चर्चा अशा विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मात्र कोणताही ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यास प्राधिकरणाने बँकेला मनाई केली आहे.लॉकडाऊननंतर निवडणुका कोणत्याही क्षणीजिल्ह्यात नियंत्रणात येत असलेली कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता १७ मे नंतर लॉकडाऊनची मुदत वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यानंतर पुढील काही दिवसात जिल्हा बँकेच्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता संचालकांकडून व्यक्त केली जात आहे. कारण पूर्वीच्या नियोजित कार्यक्रमानुसार मतदानासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असताना निवडणुकीची ही प्रक्रिया थांबविली गेली होती. आता प्रत्यक्ष मतदान घेण्यापूर्वी किमान आठवड्याची मुदत प्रचारासाठी मिळावी, अशी अपेक्षाही संचालकांमधून व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :bankबँक