शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

‘रेड झोन’ गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 13, 2014 22:49 IST

पैनगंगा नदीच्या पुराचा वर्षानुवर्ष सामना करणाऱ्या रेड झोनमधील गावांची अद्यापही पुनर्वसनाची प्रतीक्षा संपली नाही. गत १० वर्षांपासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे आहे.

नवीन सरकारकडून आशा : १० वर्षांपासून प्रशासन उदासीनअविनाश खंदारे - उमरखेड(कुपटी)पैनगंगा नदीच्या पुराचा वर्षानुवर्ष सामना करणाऱ्या रेड झोनमधील गावांची अद्यापही पुनर्वसनाची प्रतीक्षा संपली नाही. गत १० वर्षांपासून प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे आहे. आता राज्यात नवीन सरकार आरूढ झाले असून या सरकारकडून पूरग्रस्तांना मोठी आशा आहे.उमरखेड तालुक्यातून विशाल पात्र असलेली पैनगंगा वाहते. या नदीच्या तिरावर अनेक गावे आहेत. त्यातील पळशी, संगम चिंचोली, मार्लेगाव, गाडीबोरी, चातारी, देवसरी, बंदी टाकळी यासह अनेक गावांना पुराचा फटका बसतो. पावसाळ्यात गावकरी मृत्यूच्या दाढेत अडकतात. महापूर आला की मुख्यमंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच भेटी देतात. आश्वासनांची खैरात वाटतात. मात्र महापूर ओसरला की आश्वासनेही पुरात वाहून जातात. उमरखेड तालुक्यातील पळशी गावाला २००६ मध्ये महापूराला सामोरे जावे लागले होते. महापुरानंतर पुनर्वसनाच्या आश्वासनाचा पोटतिडकीने पाठपुरावा करण्यात आला. १९५८ आणि २००६ च्या महापुराने सर्वाधिक नुकसान झाले. पैनगंगेच्या वेढ्यात हजारो नागरिक अडकून पडले होते. तेव्हापासून पुनर्वसनाची प्रक्रिया लाल फितीत अडकून आहे. २००६ च्या महापुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००७ च्या पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. पाऊस व इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने महापूर नित्याचीच बाब झाला आहे. पळशी येथील नागरिक पुनर्वसनासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेतात. निवेदने देतात. उपोषण करतात, परंतु राजकीय पाठबळ मिळत नाही. प्रशासन त्याची दखल घेत नाही. या गावासोबत नदीतिरावरील अनेक गावे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यात संगम चिंचोली, देवसरी, पळशी या गावांचा समावेश आहे. उमरखेड तहसीलदारांकडून पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव पुनर्वसनमंत्र्यांकडे पाठविला आहे. मुंबई येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी बैठक झाली होती. त्यावेळी आवश्यक ती जागा उपलब्ध करून तत्काळ पळशी, देवसरी, चिंचोली संगम या गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरले. त्यावेळी पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, उमरखेडचे तत्कालीन आमदार विजय खडसे, अमरावती महसूल आयुक्त, यवतमाळ जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन सचिव उपस्थित होते. पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे ठरले होते. त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही या भागाचा दौरा केला. एवढे सर्व होऊनही पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. आता नवीन सरकार सत्तारूढ झाले आहे. या सरकारकडून जनतेच्या आशा आहेत.