शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

खरंच तुम्ही, शुद्ध पाणी पिता ?

By admin | Updated: April 25, 2015 01:57 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळाला येणारे पाणी शुद्ध आहे, हा केवळ आपला भ्रम आहे.

विलास गावंडे यवतमाळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नळाला येणारे पाणी शुद्ध आहे, हा केवळ आपला भ्रम आहे. वितरण व्यवस्थेतील दोषामुळे किंवा एखाद्या ठिकाणी लिकेज असेल तर अशुद्ध पाणी येत असेल एवढ्यापर्यंतच आपली कल्पना. पण, वास्तव अतिशय वेगळे आहे. चक्क मलमूत्राच्या गटाराचे पाणी नळाद्वारे येवू शकते यावर विश्वास बसणार नाही, पण ते सत्य आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य टाकीभोवती असलेले वॉल गटाराच्या विळख्यात आहे. प्राधिकरणाकडून शुद्ध पाणी पुरवठ्याचा दावा केला जातो. मात्र नळातून अशुद्धच नव्हे तर दूषित पाणी आपल्या घरापर्यंत पोहोचत आहे. यवतमाळ शहराला सुमारे ३० हजार नळ जोडण्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. चार लाखांवर नागरिक या पाण्याचा वापर करतात. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी गोदणी रोडवरील टाकीजवळ वेगवेगळ्या ठिकाणी पाच वॉल आहेत. सदर वॉल उघडताच टप्प्या टप्प्याने विविध भागात पाणी पोहोचते. मात्र ज्या ठिकाणी हे वॉल आहेत, तो संपूर्ण भाग घाण पाण्याने व्यापलेला आहे. एवढेच काय तर काही वॉल असलेले टाके पूर्णपणे भरलेले आहे. नागरी ग्रामीण योजनेच्या इमारतीत असलेल्या प्रसाधनगृहाचे पाईप फुटलेले आहेत. यातील सर्व घाण पाणी वॉल असलेल्या ठिकाणी जमा होत आहे. जवळपास दोन हजार चौरस फुटाचा परिसर मलमूत्राच्या पाण्याने व्यापून टाकला आहे. ही परिस्थिती गेली काही महिन्यांपासून निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर प्राधिकरणाचे कर्मचारी नाकाला रूमाल लावून कार्यालयात काम करतात. नाक दाबल्यानंतर तोंड उघडले जाते असे म्हणतात, मात्र या कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तोंड नाक दाबूनही उघडत नाही. काही कर्मचाऱ्यांनी हे गंभीर वास्तव अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मात्र मिनरल वॉटर सेवन करणाऱ्या या अधिकाऱ्यांना लोकांच्या आरोग्याविषयी कधी काळजी घेण्याची गरज वाटली नाही. प्राधिकरण तसा ‘मुर्दाड’ विभाग म्हणून नावारूपास आला आहे. लोकांच्या तक्रारींची काहीएक देणे-घेणे नाही. अधिकारी आपल्या तोऱ्यात वागतात. मुख्यालयी राहणे त्यांच्या पचनीच पडत नाही. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर तीन लाख लोकांच्या ‘जीवनाचा’ प्रश्न रेटला जात आहे. मुख्य पाण्याची टाकी, दर्डानगर, वाघापूर नाका, पिंपळगाव या भागात असलेल्या पाण्याच्या टाक्या कधी स्वच्छ केल्या जात नाही. फिल्टरवरून आलेले पाणी टाकीत घेवून सोडणे एवढेच आपले काम असल्याचे ते मानतात. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात गाळ साचला आहे. प्रयास संस्था लोकसहभागातून गाळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्यासाठी नागरिक प्रयत्न करीत असताना दुसरीकडे जीवन प्राधिकरण मात्र शुद्ध पाण्यासाठीही प्रयत्न करताना दिसत नाही.