शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पांढरकवड्यात रेशनचे धान्य खुल्या बाजारात, तांदूळ दहा रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:49 IST

पांढरकवडा : शासन दारिद्र्य रेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्नपुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री करीत ...

पांढरकवडा : शासन दारिद्र्य रेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्नपुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री करीत असतात. काही लाभार्थी तांदूळ, तर काही लोक गहू विक्री करीत असतात. पांढरकवडा तालुक्यालगत तेलंगणा राज्य आहे. तेथील लोकांचा भात हा मुख्य आहार आहे. येथे रेशनचा तांदूळ जमा करून तेलंगणात जादा दराने विकला जातो. पोळीशिवाय राहणारे लाेक तांदळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे गहू शेजाऱ्या-पाजाऱ्यांना १० ते १५ रुपये किलोने विक्री करीत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.

शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लोक तांदळाचा वापर करतात त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते; परंतु गहू मिळत असल्याने गव्हाचा वापर करीत नाहीत. गव्हाच्या ठिकाणी ते तांदळाचाच वापर करतात. त्यामुळे रेशन दुकानातून मिळालेले २ रुपये किलोचा गहू १० ते १५ रुपये किलोने खुल्या बाजारातही विकला जातो. याशिवाय ओळखीच्या व्यक्तींनाही त्याची विक्री केली जाते. काही लोक गव्हाचा वापर करतात; परंतु ते तांदूळ दुसऱ्या लोकांना विक्री करतात. तांदूळ १० रुपये किलोने विकून मिळालेल्या पैशातून गहू खरेदी करतात. अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांना महिन्याकाठी ३५ किलो रेशन मिळते. २५ किलो तांदूळ व १० किलो गहू मिळत असते. तांदूळ तीन रुपये, तर गहू दोन रुपये किलोने रेशन दुकानातून मिळत असतो. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मोफत धान्याचे वाटप केले जाते. लाभार्थ्यांना धान्य वाटप केल्यानंतर त्याचे ते काय करतात, हे कुणालाही सांगता येत नाही. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे बरोबर वितरण होते किंवा नाही, याची चाचपणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करणे गरजचे असून, ते होताना दिसत नाही.

बॉक्स : रेशनचे तांदूळ गोळा करणारी टोळी सक्रिय

गरीब व गरजू लाभार्थ्यांना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले जातात. यात तांदूळ लाभार्थ्यांकडून खरेदी करणारी टोळी तुमसर तालुक्यात व शहरात सक्रिय झाली आहे. ही टोळी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन तांदूळ १० ते १५ रुपये किलोप्रमाणे खरेदी करीत आहे. अनेक लाभार्थ्यांना तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून विनामूल्य मिळत आहे, तर काही लाभार्थ्यांना नाममात्र शुल्कात तांदूळ मिळतो. असा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. लाभार्थ्यांकडून शहर व गावात तांदूळ जमा करणारी टोळी ही ठोक भावाने विक्री करीत असल्याचे समजते. एका टोळीत दोन ते तीन लोक असून, ते १५० ते २०० किलोग्रॅम तांदूळ लाभार्थ्यांकडून गोळा करतात. त्यांना प्रति किलोग्रॅमवर तीन ते चार रुपये मिळतात. पुढे हा तांदूळ ठोक भावाने विक्री केला जातो; परंतु हा तांदूळ खरेदी करणारे कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे.

कोट : यासंदर्भात आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. यापूर्वी रेशनचे धान्य विकणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र असा प्रकार कुठे उघडकीस आला नाही. असा प्रकार कुठे सुरू असेल, तर संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाईल.

-भारती सोनट्टके, पुरवठा निरीक्षण अधिकारी, पांढरकवडा