शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

तुरीचे दर घसरले शेतकरी हादरला

By admin | Updated: February 24, 2016 02:43 IST

दुष्काळी परिस्थितीने तुरीचे उत्पादन घटले. यातून तुरीचे दर यावर्षी पुन्हा वधारणार होते. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेत केंद्र शासनाने यावर्षी तूरडाळ आयात करण्याचा निर्णय घेतला.

आयातीचा परिणाम : भावात पाच हजारांची घट यवतमाळ : दुष्काळी परिस्थितीने तुरीचे उत्पादन घटले. यातून तुरीचे दर यावर्षी पुन्हा वधारणार होते. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेत केंद्र शासनाने यावर्षी तूरडाळ आयात करण्याचा निर्णय घेतला. आयात करण्यात आलेली डाळ देशात दाखल होण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. याचा परिणाम थेट स्थानिक बाजारपेठेवर झाला आहे. तुरीचे दर घसरले आहेत. तीन महिन्यात तुरीच्या दरात क्विंटलमागे पाच हजार रूपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे.देशभरात ४० लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक तूरडाळ आयात करण्याचे टेंडर खुले करण्यात आले होते. फेबु्रवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही तूरडाळ टप्प्या टप्प्याने दाखल होणार आहे. स्थानिक डाळीच्या तुुलनेत या तूर डाळेचे दर स्वस्त आहेत. यामुळे बाजारात स्थानिक तूर डाळीची मागणी घटण्यास सुरवात झाली आहे.खुल्या बाजारात तुरीची मागणी असली तरी स्थानिक डाळीच्या तुुलनेत स्वस्त दराने सध्या विदेशी डाळ वाढण्याची शक्यता वाढली आहे. या स्पर्धेचा थेट फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. बाजारात विक्रीसाठी आलेली तूर विदेशी बाजाराच्या तुलनेत महाग पडत असल्याने तुरीचे दर घसरले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात तुरीचे हे दर ७५०० रूपये क्विंटलपर्यंत खाली आहेत. तर हिंगणघाटला हे दर ५५५५ रूपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. तुरीच्या सतत घसरणाऱ्या किमतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, अशा अडचणीच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संरक्षण देणारी यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे. (शहर वार्ताहर)