शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

रावांनी नाही ते गावाने केलं

By admin | Updated: October 20, 2016 01:38 IST

मनं आणि माणसे जोडली गेली. वाद संपून संवाद वाढला. सर्व जाती-धर्माची माणसं एकत्र आली.

यवतमाळ : मनं आणि माणसे जोडली गेली. वाद संपून संवाद वाढला. सर्व जाती-धर्माची माणसं एकत्र आली. गावातून व्यसनं हद्दपार झाली. पाहता काय राव जामडोह या गावाने आदर्श गाव होण्याची किमया साधली. या गावाला विकास कधीही शिवला नव्हता. आता मात्र इतर गावांच्या विकासासाठी या गावाचे उदाहरण समोर ठेवले जाते. पांढरकवडा मार्गावर यवतमाळपासून केवळ १० किमी अंतरावर जामडोह हे गाव आहे. जिल्हा मुख्यालयापासून जवळ असलेतरी विकासापासून कोसो दूर होते. खानगाव आणि जामडोह मिळून गटग्रामपंचायत तयार झाली आहे. जामडोहकडे मात्र सतत दुर्लक्ष झाले होते. जामडोहला जाण्यासाठी रस्ताही नव्हता. डोंगर खोऱ्यात वास्तव्याचा अनुभव या ठिकाणची मंडळी घेत होती. गावाची निवडणूक झाली आणि महिला सरपंच येताच गावाचा कायापालट झाला. सरपंच लिना संतोष गदई यांनी संपूर्ण गावाला विकासाकरिता एकत्र आणले. पूर्वी गाव आदिवासी, प्रधान आणि सरोदी समाजात विखुरले होते. गट, भांडण, तंटे होत होते. यामुळेच गावाचा विकास होत नसल्याची बाब गावकऱ्यांना पटवून देण्यात आली. तेव्हापासून सर्व प्रश्न एकत्र येऊन सोडविण्याचा निर्णय झाला. आज ग्रामसभेला संपूर्ण गाव एकत्र येते. गाव विकासाचा मॅपही जामडोहने तयार केला आहे. त्या दृष्टीने गाव कामाला लागले आहे. जामडोहमध्ये दारू, सिगारेट, बिडी आणि तंबाखू बंदी आहे. हे व्यसनमुक्त गाव आहे. या गावाचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी, जोडधंदा म्हणून बहुतांश कुटुंबाकडे दुधाळ जनावरे आहेत. गावातून दररोज गोळा होणारे ३०० लिटर दूध शहराकडे जाते. (शहर वार्ताहर)पाण्यासाठीची दमछाक थांबलीपाण्यासाठीची भटकंती जामडोहवासीयांच्या पाचविलाच पुजलेली. या गावात मुलगी देतांनाही पालक विचारच करीत होते. यावर मात करण्यासाठी बोअर घेण्यात आली. त्याला मुबलक पाणी लागले आहे. यावरून गावाला पाणीपुरवठा होता. यामुळे मैलोंमैल होणारी पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे. रस्ता नसल्याने पाचवीनंतर गावाबाहेर शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींची संख्या कमी होती. रस्ता खडतर असल्याने घरातल्या एका व्यक्तीला रस्त्यापर्यंत सोबत जावे लागत होते. आता रस्ता झाल्याने गावात गाडी पोहोचते. यामुळे सगळेच बिनधास्त झाले आहे. यातून मुलींच्या शिक्षणाचा अडसर दूर झाला आहे.