शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राळेगाव पंचायत समिती व तहसीलमध्ये शिस्तीची ‘वाट’

By admin | Updated: February 20, 2016 00:17 IST

येथील पंचायत समिती कार्यालय आणि याच परिसरात नव्याने आलेल्या तहसील कार्यालय परिसरात मागील दोन महिन्यांपासून प्रचंड अव्यवस्था माजली आहे.

व्यवस्थेकडे दुर्लक्ष : नागरिकांना द्यावे लागते अडचणींना तोंडराळेगाव : येथील पंचायत समिती कार्यालय आणि याच परिसरात नव्याने आलेल्या तहसील कार्यालय परिसरात मागील दोन महिन्यांपासून प्रचंड अव्यवस्था माजली आहे. यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे शासकीय कार्यालय परिसरात कोणतीच शिस्त नसल्याचेही दिसून येत आहे. या सर्वांची जबाबदारी असणारा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यात कधी लक्ष घालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिसरात शासकीय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची वाहने शिस्तीत लावण्यासाठी कोणतीच निश्चित जागा ठरविण्यात आलेली नाही. वाहने कोठेही उभी केली जात आहे. तोच प्रकार नागरिकांच्या वाहनांच्या बाबतीतही आहे. अगदी तहसीलदारांच्या कक्षासमोरच लहान मोठी वाहने दिवसभर येत-जात असतात व उभी केली जातात. अशीच स्थिती पंचायत समिती सभागृहासमोर निर्माण होते. या परिसराला असलेले दोनही दरवाजे कंडम झाल्याने कुचकामी ठरले आहे. तारेचे कूंपन अनेक ठिकाणी तुटलेले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या दुकानांमध्ये तुटलेल्या कुंपनातून मार्ग काढला आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिसरातील या दोनही इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. दररोज विकतच्या पाण्यावर तहान भागविली जात आहे. नागरिकांसाठी तर हॉटेल व चहा टपरीचाच आधार आहे. गौण खनिज चोरीतील वाहनेही याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली जातात. निश्चित जागा व सुरक्षा नसल्याने ही वाहने केव्हाही उचलून नेण्याचा धोका नेहमी राहत असतो. तहसील कार्यालय व पंचायत समितीचे इतर विविध विभाग वेगवेगळ्या ठिकाणी दूरवर झाले आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना नेमक्या ठिकाणी जावून आपले काम करून घेणे वेळोवेळी कठीण होते. त्यांच्या माहितीसाठी सुयोग्य मार्गदर्शक फलक नाही. या महत्त्वपूर्ण विभागाची सुरक्षाही सुरक्षा भिंतीअभावी धोक्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह इतर संबंधितांनी यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलावी, अशी अपेक्षा नागरिकांसह अधिकाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रारपंचायत समिती कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली. याठिकाणी विद्युत कंपनीनेही संबंधितांना वीज पुरवठा केला आहे. या सर्व बाबींमुळे तहसील व पंचायत समिती विभागाला मोठ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.