शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राळेगाव पंचायत समिती व तहसीलमध्ये शिस्तीची ‘वाट’

By admin | Updated: February 20, 2016 00:17 IST

येथील पंचायत समिती कार्यालय आणि याच परिसरात नव्याने आलेल्या तहसील कार्यालय परिसरात मागील दोन महिन्यांपासून प्रचंड अव्यवस्था माजली आहे.

व्यवस्थेकडे दुर्लक्ष : नागरिकांना द्यावे लागते अडचणींना तोंडराळेगाव : येथील पंचायत समिती कार्यालय आणि याच परिसरात नव्याने आलेल्या तहसील कार्यालय परिसरात मागील दोन महिन्यांपासून प्रचंड अव्यवस्था माजली आहे. यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे शासकीय कार्यालय परिसरात कोणतीच शिस्त नसल्याचेही दिसून येत आहे. या सर्वांची जबाबदारी असणारा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यात कधी लक्ष घालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिसरात शासकीय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची वाहने शिस्तीत लावण्यासाठी कोणतीच निश्चित जागा ठरविण्यात आलेली नाही. वाहने कोठेही उभी केली जात आहे. तोच प्रकार नागरिकांच्या वाहनांच्या बाबतीतही आहे. अगदी तहसीलदारांच्या कक्षासमोरच लहान मोठी वाहने दिवसभर येत-जात असतात व उभी केली जातात. अशीच स्थिती पंचायत समिती सभागृहासमोर निर्माण होते. या परिसराला असलेले दोनही दरवाजे कंडम झाल्याने कुचकामी ठरले आहे. तारेचे कूंपन अनेक ठिकाणी तुटलेले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या दुकानांमध्ये तुटलेल्या कुंपनातून मार्ग काढला आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिसरातील या दोनही इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. दररोज विकतच्या पाण्यावर तहान भागविली जात आहे. नागरिकांसाठी तर हॉटेल व चहा टपरीचाच आधार आहे. गौण खनिज चोरीतील वाहनेही याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली जातात. निश्चित जागा व सुरक्षा नसल्याने ही वाहने केव्हाही उचलून नेण्याचा धोका नेहमी राहत असतो. तहसील कार्यालय व पंचायत समितीचे इतर विविध विभाग वेगवेगळ्या ठिकाणी दूरवर झाले आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना नेमक्या ठिकाणी जावून आपले काम करून घेणे वेळोवेळी कठीण होते. त्यांच्या माहितीसाठी सुयोग्य मार्गदर्शक फलक नाही. या महत्त्वपूर्ण विभागाची सुरक्षाही सुरक्षा भिंतीअभावी धोक्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह इतर संबंधितांनी यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलावी, अशी अपेक्षा नागरिकांसह अधिकाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रारपंचायत समिती कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली. याठिकाणी विद्युत कंपनीनेही संबंधितांना वीज पुरवठा केला आहे. या सर्व बाबींमुळे तहसील व पंचायत समिती विभागाला मोठ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.