शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

राळेगाव पंचायत समिती व तहसीलमध्ये शिस्तीची ‘वाट’

By admin | Updated: February 20, 2016 00:17 IST

येथील पंचायत समिती कार्यालय आणि याच परिसरात नव्याने आलेल्या तहसील कार्यालय परिसरात मागील दोन महिन्यांपासून प्रचंड अव्यवस्था माजली आहे.

व्यवस्थेकडे दुर्लक्ष : नागरिकांना द्यावे लागते अडचणींना तोंडराळेगाव : येथील पंचायत समिती कार्यालय आणि याच परिसरात नव्याने आलेल्या तहसील कार्यालय परिसरात मागील दोन महिन्यांपासून प्रचंड अव्यवस्था माजली आहे. यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे शासकीय कार्यालय परिसरात कोणतीच शिस्त नसल्याचेही दिसून येत आहे. या सर्वांची जबाबदारी असणारा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यात कधी लक्ष घालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या परिसरात शासकीय अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची वाहने शिस्तीत लावण्यासाठी कोणतीच निश्चित जागा ठरविण्यात आलेली नाही. वाहने कोठेही उभी केली जात आहे. तोच प्रकार नागरिकांच्या वाहनांच्या बाबतीतही आहे. अगदी तहसीलदारांच्या कक्षासमोरच लहान मोठी वाहने दिवसभर येत-जात असतात व उभी केली जातात. अशीच स्थिती पंचायत समिती सभागृहासमोर निर्माण होते. या परिसराला असलेले दोनही दरवाजे कंडम झाल्याने कुचकामी ठरले आहे. तारेचे कूंपन अनेक ठिकाणी तुटलेले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या दुकानांमध्ये तुटलेल्या कुंपनातून मार्ग काढला आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिसरातील या दोनही इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. दररोज विकतच्या पाण्यावर तहान भागविली जात आहे. नागरिकांसाठी तर हॉटेल व चहा टपरीचाच आधार आहे. गौण खनिज चोरीतील वाहनेही याच परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली जातात. निश्चित जागा व सुरक्षा नसल्याने ही वाहने केव्हाही उचलून नेण्याचा धोका नेहमी राहत असतो. तहसील कार्यालय व पंचायत समितीचे इतर विविध विभाग वेगवेगळ्या ठिकाणी दूरवर झाले आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना नेमक्या ठिकाणी जावून आपले काम करून घेणे वेळोवेळी कठीण होते. त्यांच्या माहितीसाठी सुयोग्य मार्गदर्शक फलक नाही. या महत्त्वपूर्ण विभागाची सुरक्षाही सुरक्षा भिंतीअभावी धोक्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागासह इतर संबंधितांनी यासंदर्भात आवश्यक ती पावले उचलावी, अशी अपेक्षा नागरिकांसह अधिकाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रारपंचायत समिती कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली. याठिकाणी विद्युत कंपनीनेही संबंधितांना वीज पुरवठा केला आहे. या सर्व बाबींमुळे तहसील व पंचायत समिती विभागाला मोठ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.