शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

राजूरचे पाणी निर्गुडा नदीत सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:30 IST

हो.. नाही म्हणत अखेर राजूर खाणीतील पाणी वणीच्या निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला.

ठळक मुद्देवणी नगरपरिषदेचा निर्णय : पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : हो.. नाही म्हणत अखेर राजूर खाणीतील पाणी वणीच्या निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला.गेल्या १५ दिवसांपासून वणी शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा ठप्प आहे. नवरगाव धरणातही पाण्याचा अल्पसाठा असल्याने तेथूनही आवश्यक पाणी सोडले जात नसल्याने वणीतील पाण्याची स्थिती भयावय आहे. नागरिकांचे पाण्यासाठी अक्षरश: हाल सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन काही नगरसेवकांनी राजूर खाणीतील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याची मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे केली होती. वर्धा नदीवरून पाणी पुरवठा योजना सुरू होईस्तोवर राजूर खाणीतील पाण्याचा वणीकरांना मोठा आधार होईल, असे या नगरसेवकांचे म्हणणे होते. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या निवेदनाची तातडीने दखल घेत बुधवारी चिखलगाव परिसरात साठलेल्या राजूर खाणीतील पाण्याची पाहणी करून हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची चाचपणी करण्याच्या सूचना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना केल्या. मात्र या पाण्यात क्षार व आर्यन मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता लक्षात घेऊन नगराध्यक्ष बोर्डे यांनी हे पाणी नदीत सोडण्यास सुरूवातीला नकार दिला होता. मात्र तपासणीअंती गुरुवारी रात्री या पाण्याचा अहवाल प्राप्त झाला. सदर पाणी केवळ वापरण्यायोग्य नाही तर पिण्यायोग्यदेखील असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर सदर पाणी निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.लिकेज बंद केल्यास तीन दिवसांत पाणी पोहचणारसन २००४ मध्ये वणी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी वणी नगरपालिकेच्या तत्कालिन सत्ताधाºयांनी राजूर खाणीतील पाणी पाईपलाईन टाकून वणीतून वाहणाऱ्या निर्गुडा नदीत सोडले होते. मात्र एक महिन्यानंतर पाणी टंचाई संपली. त्यामुळे ही पाईपलाईन निकामी पडून होती. परिणामी या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेजस आहे. हे लिकेजसची दुरूस्ती तातडीने झाल्यास तीन दिवसांत खाणीचे पाणी नदीत पोहचणार आहे.

टॅग्स :Waterपाणी