शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

राजूरचे पाणी निर्गुडा नदीत सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 22:30 IST

हो.. नाही म्हणत अखेर राजूर खाणीतील पाणी वणीच्या निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला.

ठळक मुद्देवणी नगरपरिषदेचा निर्णय : पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : हो.. नाही म्हणत अखेर राजूर खाणीतील पाणी वणीच्या निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला.गेल्या १५ दिवसांपासून वणी शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा ठप्प आहे. नवरगाव धरणातही पाण्याचा अल्पसाठा असल्याने तेथूनही आवश्यक पाणी सोडले जात नसल्याने वणीतील पाण्याची स्थिती भयावय आहे. नागरिकांचे पाण्यासाठी अक्षरश: हाल सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन काही नगरसेवकांनी राजूर खाणीतील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याची मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे केली होती. वर्धा नदीवरून पाणी पुरवठा योजना सुरू होईस्तोवर राजूर खाणीतील पाण्याचा वणीकरांना मोठा आधार होईल, असे या नगरसेवकांचे म्हणणे होते. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या निवेदनाची तातडीने दखल घेत बुधवारी चिखलगाव परिसरात साठलेल्या राजूर खाणीतील पाण्याची पाहणी करून हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची चाचपणी करण्याच्या सूचना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना केल्या. मात्र या पाण्यात क्षार व आर्यन मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता लक्षात घेऊन नगराध्यक्ष बोर्डे यांनी हे पाणी नदीत सोडण्यास सुरूवातीला नकार दिला होता. मात्र तपासणीअंती गुरुवारी रात्री या पाण्याचा अहवाल प्राप्त झाला. सदर पाणी केवळ वापरण्यायोग्य नाही तर पिण्यायोग्यदेखील असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर सदर पाणी निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.लिकेज बंद केल्यास तीन दिवसांत पाणी पोहचणारसन २००४ मध्ये वणी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी वणी नगरपालिकेच्या तत्कालिन सत्ताधाºयांनी राजूर खाणीतील पाणी पाईपलाईन टाकून वणीतून वाहणाऱ्या निर्गुडा नदीत सोडले होते. मात्र एक महिन्यानंतर पाणी टंचाई संपली. त्यामुळे ही पाईपलाईन निकामी पडून होती. परिणामी या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेजस आहे. हे लिकेजसची दुरूस्ती तातडीने झाल्यास तीन दिवसांत खाणीचे पाणी नदीत पोहचणार आहे.

टॅग्स :Waterपाणी