शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनाच्या माध्यमातून समृद्धी आणा

By admin | Updated: October 14, 2015 02:57 IST

शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे.

पालकमंत्री : मत्स्य व्यवसायालाही अधिकाऱ्यांनी चालना देण्याचे आवाहन यवतमाळ : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे. पशू विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या व्यवसायाची जोड कशी देता येईल आणि त्या माध्यमातून त्यांच्यात आर्थिक समृद्धी कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. विश्रामभवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी पशुधन विकासाचा स्वतंत्र आढावा घेतला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. के. एस. कुमरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. बी. सोनकुसळे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. राजीव बरडे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी बदकल, पशुधन अधिकारी डॉ. जी. के. चव्हाण, डॉ. सु. द. इंगळे, डॉ. जे. डी. राऊत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यास शासन अनुकूल आहे. पशुपालन हा शेतकऱ्यांशी संबंधित अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळे काही वेगळे उपक्रम राबविता येईल. याची शहानिशा करून तसे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांना अनुदानावर जनावरांचा पुरवठा केला जातो. परंतु शेतकऱ्यांना विशिष्ट रक्कम भरावी लागत असल्याने आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी असल्याने यातून शेतकऱ्यांना सूट देता येईल का, या दृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जनावरांचे अनुदानावर वाटप करताना त्यात सुशिक्षित बेरोजगार, अल्प व अत्यल्प भूधारक यांचाही प्राधान्याने विचार होण्यासाठी वाटपाच्या निकषात बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा. आपण त्याचा पाठपुरावा करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. शासनाच्या वतीने केले जाणारे वाटप अतिशय अल्प आहे. विशेष बाब म्हणून जनावरे वाटपांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी वाढवून घेऊ. शासन १४ जिल्ह्यांसाठी पशुधन विकासाचा विशेष कार्यक्रम राबवीत आहे. या कार्यक्रमांतर्गत या जिल्ह्यांना समान तत्वावर १०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यास यातील जास्तीत जास्त रक्कम उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या वाढीलाही प्रचंड संधी आहे. त्यादृष्टीने सकारात्मक नियोजन करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी अमरावती येथील मत्स्यव्यवसायच्या विभागीय अधिकाऱ्यांना यवतमाळ येथे बोलावून त्यांच्याशी विश्रामभवन येथे सविस्तर चर्चा केली. मोर्शीजवळील अप्पर वर्धा धरण येथे सहकारी तत्वावर चांगल्या प्रकारे मत्स्यमारीचे काम होत आहे. त्याच धर्तीवर यवतमाळ येथे चालना देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील होतकरू मत्स्यव्यवसाय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना अप्पर वर्धा येथील प्रयोग दाखविण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी मत्स्यव्यवसायच्या प्रादेशिक उपायुक्त ऋतुजा दीक्षित, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी मोहन फडतडे, सहायक आयुक्त पसारकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)