शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

पशुधनाच्या माध्यमातून समृद्धी आणा

By admin | Updated: October 14, 2015 02:57 IST

शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे.

पालकमंत्री : मत्स्य व्यवसायालाही अधिकाऱ्यांनी चालना देण्याचे आवाहन यवतमाळ : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने या व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे. पशू विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या व्यवसायाची जोड कशी देता येईल आणि त्या माध्यमातून त्यांच्यात आर्थिक समृद्धी कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. विश्रामभवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी पशुधन विकासाचा स्वतंत्र आढावा घेतला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. के. एस. कुमरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. बी. सोनकुसळे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. राजीव बरडे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी बदकल, पशुधन अधिकारी डॉ. जी. के. चव्हाण, डॉ. सु. द. इंगळे, डॉ. जे. डी. राऊत आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यास शासन अनुकूल आहे. पशुपालन हा शेतकऱ्यांशी संबंधित अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. त्यामुळे काही वेगळे उपक्रम राबविता येईल. याची शहानिशा करून तसे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांना अनुदानावर जनावरांचा पुरवठा केला जातो. परंतु शेतकऱ्यांना विशिष्ट रक्कम भरावी लागत असल्याने आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी असल्याने यातून शेतकऱ्यांना सूट देता येईल का, या दृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जनावरांचे अनुदानावर वाटप करताना त्यात सुशिक्षित बेरोजगार, अल्प व अत्यल्प भूधारक यांचाही प्राधान्याने विचार होण्यासाठी वाटपाच्या निकषात बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा. आपण त्याचा पाठपुरावा करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. शासनाच्या वतीने केले जाणारे वाटप अतिशय अल्प आहे. विशेष बाब म्हणून जनावरे वाटपांचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी वाढवून घेऊ. शासन १४ जिल्ह्यांसाठी पशुधन विकासाचा विशेष कार्यक्रम राबवीत आहे. या कार्यक्रमांतर्गत या जिल्ह्यांना समान तत्वावर १०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यास यातील जास्तीत जास्त रक्कम उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या वाढीलाही प्रचंड संधी आहे. त्यादृष्टीने सकारात्मक नियोजन करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी अमरावती येथील मत्स्यव्यवसायच्या विभागीय अधिकाऱ्यांना यवतमाळ येथे बोलावून त्यांच्याशी विश्रामभवन येथे सविस्तर चर्चा केली. मोर्शीजवळील अप्पर वर्धा धरण येथे सहकारी तत्वावर चांगल्या प्रकारे मत्स्यमारीचे काम होत आहे. त्याच धर्तीवर यवतमाळ येथे चालना देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यातील होतकरू मत्स्यव्यवसाय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना अप्पर वर्धा येथील प्रयोग दाखविण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी मत्स्यव्यवसायच्या प्रादेशिक उपायुक्त ऋतुजा दीक्षित, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी मोहन फडतडे, सहायक आयुक्त पसारकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)