शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

टंचाईत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:33 IST

घरबांधणीची परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेला आता कडव्या टंचाईने ठिकाणावर आणले आहे. प्यायला पाणी पुरविणे अशक्यप्राय झालेले असताना प्रशासनाने घरोघरच्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची शनिवारपासून झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देघरोघरी वृक्ष गणना : भीषण पाणीटंचाईने नगर परिषदेला आणले ताळ्यावर

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरबांधणीची परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेला आता कडव्या टंचाईने ठिकाणावर आणले आहे. प्यायला पाणी पुरविणे अशक्यप्राय झालेले असताना प्रशासनाने घरोघरच्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची शनिवारपासून झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार आताच नेमका कशासाठी, असा प्रश्न पडला आहे.विशेष म्हणजे, तापमान ४४ अंशांच्या पलिकडे गेल्यावर नगरपालिकेला यवतमाळातील झाडांची संख्या मोजण्याचेही शहाणपण सुचले आहे. पाणीटंचाई जीवघेणी बनल्यावर आणि मे महिना तापल्यावर शुक्रवारी नगरपालिकेत यासंदर्भात बैठक घेण्यात आली. शहरात पावसाचे पाणी थांबवायचे असेल तर, झाडांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. अडीच लाख लोकसंख्या असताना किमान अडीच तीन लाख मोठी झाडे असणे गरजेचे आहे. पण त्यादृष्टीने कधीच प्रयत्न होत नाही. वास्तविक, शहरातील झाडांबाबत १९७५ सालच्या महाराष्ट्र वृक्षजतन कायद्याचे काटेकोर पालन केल्यास दर पाच वर्षांनी वृक्षगणना करणे बंधनकारक आहे. पण नागरिक आणि प्रशासन त्याकडे आजवर दुर्लक्ष करीत आलेले आहे. आता पाण्याविना प्राण कंठाशी आल्यावर प्रशासनाला या कायद्याची अचानक आठवण झालेली आहे. शनिवारपासून भर उन्हात फिरून पालिकेचे कर्मचारी दरडोई किती झाडे आहेत, याचा सर्वे करणार आहेत. यात १५ फुटावरील आणि खालील झाडे किती, झाडांची गोलाई किती, त्रिज्या किती अशी माहिती गोळा केली जाणार आहे.त्याचवेळी किती घरांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करून पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जाते, याचीही झाडाझडती घेतली जाणार आहे. प्रत्यक्षात घर बांधकामाची परवानगी देतानाच नगरपालिकेकडून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची अट घातली जाते. पण क्षुल्लक पैसे वाचविण्यासाठी नागरिक ही अट टाळतात आणि नगरपालिकेचे प्रशासनही त्याकडे कानाडोळा करत आलेले आहे. यवतमाळातील प्रत्येक घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेली असती, तर आज टंचाईची तीव्रता बºयाच प्रमाणात कमी असती, असा साक्षात्कार आता प्रशासनाला झालेला आहे. अर्ध्याअधिक घरांमध्ये असे हार्वेस्टिंग न आढळण्याचीच शक्यता अधिक आहे.तीन दिवसात उरकणार का सर्वे?विशेष म्हणजे, अडीच लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात केवळ तीन दिवसात हे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी नगरपालिकेच्या कर्मचाºयांवर सोपविण्यात आली आहे. आरोग्य विभाग, कर विभाग आणि शिक्षकांची शुक्रवारी बैठक घेऊन त्यांना सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. यात सफाई कर्मचारी आणि प्रामुख्याने शिक्षकांना जुंपण्यात येणार आहे. शहरात इमारती किती, त्यात कम्पाउंड किती, त्यात झाडे किती, विहिरी किती, विंधन विहिरी किती अशी माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही माहिती केवळ तीन दिवसात कशी गोळा होणार, असा प्रश्न कर्मचाºयांनी बैठकीत उपस्थित केला.