शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, उमरखेड विभागात पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला फुटले कोंब : शेतकरी संकटात, नदी-नाल्यांना पूर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद /उमरखेड : गेल्या काही दिवसांपासून पुसद आणि उमरखेड उपविभागात पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाने शेतकऱ्यांना संकटाच्या खाईतच लोटले. पुसद उपविभागात दोन दिवसात ३४ मिमी पाऊस कोसळला. उमरखेड उपविभागातही संततधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहे.पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली सापडली आहे. पुसद तालुक्यात ब्राह्मणगाव, गौळ खु., वरूड, बोरी खु., जांबबाजार, शेंबाळपिंपरी, बेलोरा, खंडाळा आणि पुसद सर्कलमध्ये सातत्याने पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सोबतच पावसाची रिपरिपही सुरू होती. पुसद आणि दिग्रस तालुक्यातील शेती पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनला जागीच कोंब फुटले आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी संभाजीराव टेटर यांनी केली आहे. आमदार इंद्रनील नाईक यांनीही कृषी विभागाकडे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सर्व मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.उमरखेड तालुक्यातही पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले. पैनगंगा नदी काठावरील ५५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नदी काठावरील शेकडो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली सापडली आहे.सोयाबीनला जागीच कोंब फुटत असल्याने शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहे. आमदार नामदेव ससाने यांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन उमरखेड व महागाव तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. तसेच शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.दिग्रस आणि महागाव तालुक्यात नुकसानपुसद आणि उमरखेड उपविभागातील दिग्रस आणि महागाव तालुक्यातही शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी देशोधडीला लागत आहे. अनेकांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांकडे आपबिती कथन केली. काही शेतकºयांनी कृषी अधिकाºयांना सडलेले सोयाबीन दाखवून तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली.

टॅग्स :agricultureशेती