शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

पुसद, उमरखेड विभागात पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला फुटले कोंब : शेतकरी संकटात, नदी-नाल्यांना पूर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद /उमरखेड : गेल्या काही दिवसांपासून पुसद आणि उमरखेड उपविभागात पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाने शेतकऱ्यांना संकटाच्या खाईतच लोटले. पुसद उपविभागात दोन दिवसात ३४ मिमी पाऊस कोसळला. उमरखेड उपविभागातही संततधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहे.पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली सापडली आहे. पुसद तालुक्यात ब्राह्मणगाव, गौळ खु., वरूड, बोरी खु., जांबबाजार, शेंबाळपिंपरी, बेलोरा, खंडाळा आणि पुसद सर्कलमध्ये सातत्याने पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सोबतच पावसाची रिपरिपही सुरू होती. पुसद आणि दिग्रस तालुक्यातील शेती पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनला जागीच कोंब फुटले आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी संभाजीराव टेटर यांनी केली आहे. आमदार इंद्रनील नाईक यांनीही कृषी विभागाकडे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सर्व मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.उमरखेड तालुक्यातही पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले. पैनगंगा नदी काठावरील ५५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नदी काठावरील शेकडो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली सापडली आहे.सोयाबीनला जागीच कोंब फुटत असल्याने शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहे. आमदार नामदेव ससाने यांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन उमरखेड व महागाव तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. तसेच शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.दिग्रस आणि महागाव तालुक्यात नुकसानपुसद आणि उमरखेड उपविभागातील दिग्रस आणि महागाव तालुक्यातही शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी देशोधडीला लागत आहे. अनेकांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांकडे आपबिती कथन केली. काही शेतकºयांनी कृषी अधिकाºयांना सडलेले सोयाबीन दाखवून तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली.

टॅग्स :agricultureशेती