शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

पुसद, उमरखेड विभागात पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देसोयाबीनला फुटले कोंब : शेतकरी संकटात, नदी-नाल्यांना पूर

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद /उमरखेड : गेल्या काही दिवसांपासून पुसद आणि उमरखेड उपविभागात पावसाचा कहर सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाने शेतकऱ्यांना संकटाच्या खाईतच लोटले. पुसद उपविभागात दोन दिवसात ३४ मिमी पाऊस कोसळला. उमरखेड उपविभागातही संततधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहे.पुसद उपविभागात गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. गेल्या दोन दिवसात ३४.६२ मिमी पाऊस कोसळला. तालुक्यात आतापर्यंत तब्बल ७७३.५२ मिमी पावसाची नोंद झाली. शहर व तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पूस धरण, वेणी धरण आणि इसापूर धरण १०० टक्के भरले आहे. तिन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली सापडली आहे. पुसद तालुक्यात ब्राह्मणगाव, गौळ खु., वरूड, बोरी खु., जांबबाजार, शेंबाळपिंपरी, बेलोरा, खंडाळा आणि पुसद सर्कलमध्ये सातत्याने पाऊस कोसळत आहे. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सोबतच पावसाची रिपरिपही सुरू होती. पुसद आणि दिग्रस तालुक्यातील शेती पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनला जागीच कोंब फुटले आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी संभाजीराव टेटर यांनी केली आहे. आमदार इंद्रनील नाईक यांनीही कृषी विभागाकडे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली. तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सर्व मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.उमरखेड तालुक्यातही पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले. पैनगंगा नदी काठावरील ५५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नदी काठावरील शेकडो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली सापडली आहे.सोयाबीनला जागीच कोंब फुटत असल्याने शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले आहे. आमदार नामदेव ससाने यांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन उमरखेड व महागाव तालुक्यातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. तसेच शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.दिग्रस आणि महागाव तालुक्यात नुकसानपुसद आणि उमरखेड उपविभागातील दिग्रस आणि महागाव तालुक्यातही शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी देशोधडीला लागत आहे. अनेकांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांकडे आपबिती कथन केली. काही शेतकºयांनी कृषी अधिकाºयांना सडलेले सोयाबीन दाखवून तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली.

टॅग्स :agricultureशेती