शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

जिल्ह्यात पावसाचे थैमान, तीन तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

सोमवारी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ११२.७ मिमी पाऊस बाभूळगाव तालुक्यात, ९३ मिमी पाऊस कळंब तालुक्यात तर ६५ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात कोसळला. यवतमाळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली असून बाभूळगाव, कळंब आणि केळापूर तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळापूरमध्ये ६५ मिमी, कळंबमध्ये ९३ मिमी तर बाभूळगाव तालुक्यात ११२.७ मिमी एवढा विक्रमी पाऊस कोसळला. इतर तालुक्यांतही पावसाचा जोर कायम होता. मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ११२.७ मिमी पाऊस बाभूळगाव तालुक्यात, ९३ मिमी पाऊस कळंब तालुक्यात तर ६५ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात कोसळला. यवतमाळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. येथे ४६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दारव्हा ४२.८, दिग्रस ६३.१, आर्णी ३९.२, नेर ५३.२, पुसद ६०.१, उमरखेड ५१.९, महागाव ४७, वणी ३९.४, मारेगाव ५८.५, झरी जामणी ५८.२, राळेगाव ४२.१ तर घाटंजी तालुक्यात २२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तुडुंब भरलेयवतमाळ : मागील चार दिवसात जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प तुडुंब झाले आहेत. अरुणावती बेंबळासह प्रमुख प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अरुणावतीचे पाच गेट १० सेंटीमीटरचे उघडून ६० क्यूबिकने पाणी सोडण्यात आले आहे, तर बेंबळाचे १६ दरवाजे ५० सेेंटीमीटरने उघडून प्रकल्पातून ८४८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बेंबळा जलाशयाची पाणी पातळी ३९८.७८ मीटर आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरला असून, १३७.२६ क्यूबिकने पाणी सोडण्यात येत आहे. अरुणावती प्रकल्पाची जलाशय पातळी ३३०.७५ मीटर आहे. या प्रकल्पात ९७.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बेंबळा प्रकल्पाची जलाशय पातळी २६७.९५ मीटर आहे. या प्रकल्पात ९८.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर गोकी, वाघाडी, नवरगाव, बोरगाव आणि सायखेडा १०० टक्के भरले आहेत. याबरोबरच अधरपूस प्रकल्पात ९५.३७ टक्के, अडाण प्रकल्पात ९३.९० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- बेंबळासह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेता नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. आजवर पूस प्रकल्प परिसरात ६५१, अरुणावती ९१८, बेंबळा ५६५, गोकी ६३७, अधरपूस ५७८, बोरगाव ६५०, तर अडाण प्रकल्प परिसरात ८८५ मिमी पाऊस झाला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर