शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात पावसाचे थैमान, तीन तालुक्यांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

सोमवारी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ११२.७ मिमी पाऊस बाभूळगाव तालुक्यात, ९३ मिमी पाऊस कळंब तालुक्यात तर ६५ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात कोसळला. यवतमाळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली असून बाभूळगाव, कळंब आणि केळापूर तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळापूरमध्ये ६५ मिमी, कळंबमध्ये ९३ मिमी तर बाभूळगाव तालुक्यात ११२.७ मिमी एवढा विक्रमी पाऊस कोसळला. इतर तालुक्यांतही पावसाचा जोर कायम होता. मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ११२.७ मिमी पाऊस बाभूळगाव तालुक्यात, ९३ मिमी पाऊस कळंब तालुक्यात तर ६५ मिमी पाऊस केळापूर तालुक्यात कोसळला. यवतमाळ तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. येथे ४६.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दारव्हा ४२.८, दिग्रस ६३.१, आर्णी ३९.२, नेर ५३.२, पुसद ६०.१, उमरखेड ५१.९, महागाव ४७, वणी ३९.४, मारेगाव ५८.५, झरी जामणी ५८.२, राळेगाव ४२.१ तर घाटंजी तालुक्यात २२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.  

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प तुडुंब भरलेयवतमाळ : मागील चार दिवसात जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प तुडुंब झाले आहेत. अरुणावती बेंबळासह प्रमुख प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अरुणावतीचे पाच गेट १० सेंटीमीटरचे उघडून ६० क्यूबिकने पाणी सोडण्यात आले आहे, तर बेंबळाचे १६ दरवाजे ५० सेेंटीमीटरने उघडून प्रकल्पातून ८४८ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बेंबळा जलाशयाची पाणी पातळी ३९८.७८ मीटर आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरला असून, १३७.२६ क्यूबिकने पाणी सोडण्यात येत आहे. अरुणावती प्रकल्पाची जलाशय पातळी ३३०.७५ मीटर आहे. या प्रकल्पात ९७.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बेंबळा प्रकल्पाची जलाशय पातळी २६७.९५ मीटर आहे. या प्रकल्पात ९८.३४ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर गोकी, वाघाडी, नवरगाव, बोरगाव आणि सायखेडा १०० टक्के भरले आहेत. याबरोबरच अधरपूस प्रकल्पात ९५.३७ टक्के, अडाण प्रकल्पात ९३.९० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- बेंबळासह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेता नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. आजवर पूस प्रकल्प परिसरात ६५१, अरुणावती ९१८, बेंबळा ५६५, गोकी ६३७, अधरपूस ५७८, बोरगाव ६५०, तर अडाण प्रकल्प परिसरात ८८५ मिमी पाऊस झाला आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर