शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:39 IST

महिनाभराची विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याला संततधार पावसाने झोडपले. यवतमाळ शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले. तर जिल्ह्यात अनेक खेड्यांमध्ये पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.

ठळक मुद्देवणीत अतिवृष्टी : आर्णी तालुक्याला जबर तडाखा, महामार्ग बंद, दारव्हा शहरात घुसला पूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिनाभराची विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्याला संततधार पावसाने झोडपले. यवतमाळ शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले. तर जिल्ह्यात अनेक खेड्यांमध्ये पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. अरुणावती, पूस, वाघाडी, अडाण, पैनगंगा, खुनी अशा सर्वच महत्वाच्या नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक अडली. तर उमरखेड, पुसद रोडही बंद आहे.बुधवारी मध्यरात्रीपासून धुव्वाधार पावसाला प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळपर्यंत अनेक तालुक्यांमध्ये पाऊस सुरूच होता. या पावसामुळे जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीत मोठी भर पडली. वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस बरसला आहे. गुरुवारी पूस, सायखेडा, बोरगाव असे एक मोठा तर दोन मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाले. त्याचवेळी वणी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. इतर प्रकल्पांमध्ये ५६.३१ टक्के जलसाठा झाला आहे. पाऊस कायम राहिल्यास लोअरपूस आणि नवरगाव प्रकल्पही ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.आर्णी तालुक्याला पावसाचा प्रचंड तडाखा बसला. शहरात सर्वत्र पावसाचे पाणी साचून नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले, बहुतांश गोदाम जमिनीपासून तळात असल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. अरुणावती नदीला प्रचंड पूर आल्यामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक दुपारनंतर ठप्प झाली. नदी-नाल्या काठावरील नागरिकांना नगरपरिषदेने सुरक्षित स्थळी हलविले. तालुक्यातील कोसदनी नाला दुथडी भरल्याने कोसदनी गावातही पाणी शिरले. तर माहूर रोडही बंद झाला. आर्णी तालुक्यात सावळी सदोबा गावात सर्वत्र पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी शिरुन नुकसान झाले. कवठाबाजार येथे पैनगंगेच्या पुराने घरांना तडाखा दिला.दारव्हा शहरात पावसाने मोठे नुकसान केले. साचलेल्या पाण्यामुळे महापूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे सर्वत्र धुके दाटले होते. दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव शिवारात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले. तर दोन घरांच्या भिंती पडल्या.उमरखेड तालुक्यात दहागाव नाल्याला आलेल्या पुरामुळे उमरखेड-पुसद रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पूस धरण ओव्हर फ्लो झाले असून गुरुवारी आठ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरण भरल्याने पुसदवासीयांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे.महागाव तालुक्यात पैनगंगा पुलावरून वाहू लागली. बाभूळगाव तालुक्यात धुव्वाधार पावसामुळे अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले होते. पांढरकवडा येथील खुनी नदी, घाटंजीतील वाघाडी नदीही दुथडी भरली आहे. दीर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर या महत्वाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र वांगे, पालक, सांभार, मेथी, टमाटर अशा भाजीपालावर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस