शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

वणी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यात पाऊस

By admin | Updated: June 22, 2015 02:11 IST

वणी आणि मारेगाव तालुक्यात गेल्या २० तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे.

वणी/मारेगाव : वणी आणि मारेगाव तालुक्यात गेल्या २० तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दोनही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत मारेगाव तालुक्यात ६३, तर वणी तालुक्यात तब्बल ७२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे सोयाबीन बियाणे जमिनीत दबण्याची शक्यता वाढली आहे.शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या दोनही तालुक्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. यावेळी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासूनच दोनही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. वणी तालुक्यात शनिवारी रात्रभर आणि रविवार पुन्हा पहाटेपासून पाऊस सुरू झाला. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे शहरासह तालुक्यातील जीनजीवनावर त्याचा परिणाम झाला. तथापि रविवारी सुटी असल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.वणी तालुक्यात कपाशीची बहुतांश पेरणी आटोपली आहे. आता काही शेतकऱ्यांनी सोयाबिनची पेरणी सुरू केली आहे. मात्र शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जमिनीतील सोयाबीन बियाणे आता दबण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी समाधानकारक पावसामुळे कपाशीची पेरणी व्यवस्थित झाली. त्यामुळे बळीराजा समाधानी दिसत होता. मात्र शनिवारी सायंकाळापसून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे भाव उमटू लागले आहेत.वणी तालुक्यात संततधार पावसाने १६ घरांची, तर एका गोठ्याची अशंत: पडझड झाली. त्यात शिंदोला परिसरातील चनाखा येथील पाच घरे आणि एका गोठ्याची पडझड झाली. राजूर कॉलरी येथील चार घरे, भांदेवाडा येथील तीन घरे, भालर परिसरातील बेसा येथील तीन घरांचीही अंशत: पडझड झाली आहे. याशिवाय कुठेही नुकसान झाले नाही. मात्र बहुतांश शेतात आता पावसाचे पाणी शिरले आहे. त्यातच पाऊस सुरू असल्याने रविारी शेतकऱ्यांना शेतात जाणेही जमले नाही. त्यामुळे शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी कासावीस झाले आहेत. मारेगाव तालुक्यातही शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर आणि रविवारी दिवसभर सुरूच होता. या पावसामुळे कपाशी, सोयाबिनचे बियाणे दबण्याची भिती वर्तविली जात आहे. सोबतच अुकंरलेली दोन पानांची कपाशीची झाडे संततधार पावसाने धोक्यात सापडली आहे. गेल्या आठवडाभर मारेगाव तालुक्यात जवळपास दररोज पाऊस कोसळत आहे. २० जूनला सायंकाळी ६ वाजता तालुक्यात पावसाला सुरूवात झाली. दुसऱ्या दिवशी रविवारीही संततधार पाऊस सुरूच आहे. संततधार पावसामुळे शेतात व इतरत्र पाणीच पाणी साचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अुकंरलेले बियाणे पाण्यात सापडल्याने ते सडून मरण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकरी कपाशीची पेरणी झाल्यानंतर सोयाबिनची पेरणी करतात. सध्या सर्वत्र सोयाबिनची पेरणी सुरू होती. पेरणी केलेल्या सोयाबिनवर संततधार पाऊस झाल्याने पेरलेले बियाणे जमिनीतच दबण्याची भितीही निर्माण झाली आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील कोरडे पडलेले नाले, विहीर यांच्या पाणी पातळीत मात्र वाढ झाली आहे. पांढरकवडा तालुक्यात जोरदार पाऊस बरसलातालुक्यात शनिवारपासून जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहे. आजपर्यंत तालुक्यात तब्बल १८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी तालुक्यातील खुनी व पैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहात होत्या. पीक पेरणीस अनुकूल ठरलेल्या या पावसामुळे बळीराजा समाधानी आहे. तालुक्यात वेळीच वरूण राजाचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. आणखी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, ते शेतकरीही पेरणी उरकण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी तालुक्यात ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या १७ जूनला रात्री २५ मिलीमीटर पाऊस झाला. इतर दिवशी रात्री तुरळक पावसाची नोंद झाली आहे. झरी तालुक्यात १४८ मिलीमीटरझरी - शनिवारी मध्यरात्री तालुक्यात पावसाला तालुक्यात सुरूवात झाली. हा पाऊस रविवारी सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरूच होता. तालुक्यात आजपर्यंत १४८ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे तेलंगणा व महाराष्ट्राच्या सिमेजवळून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी रात्रीपासूनच पावसामुळे वीज गुल झाली होती. ती रविवारीही परतली नव्हती. वृत्तलिहिस्तोवर वीज परतली नसल्याने तालुक्यातील ग्रामस्थ संतापले होते. (लोकमत चमू)