शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

वणी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यात पाऊस

By admin | Updated: June 22, 2015 02:11 IST

वणी आणि मारेगाव तालुक्यात गेल्या २० तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे.

वणी/मारेगाव : वणी आणि मारेगाव तालुक्यात गेल्या २० तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दोनही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत मारेगाव तालुक्यात ६३, तर वणी तालुक्यात तब्बल ७२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे सोयाबीन बियाणे जमिनीत दबण्याची शक्यता वाढली आहे.शनिवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या दोनही तालुक्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. यावेळी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासूनच दोनही तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. वणी तालुक्यात शनिवारी रात्रभर आणि रविवार पुन्हा पहाटेपासून पाऊस सुरू झाला. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. त्यामुळे शहरासह तालुक्यातील जीनजीवनावर त्याचा परिणाम झाला. तथापि रविवारी सुटी असल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.वणी तालुक्यात कपाशीची बहुतांश पेरणी आटोपली आहे. आता काही शेतकऱ्यांनी सोयाबिनची पेरणी सुरू केली आहे. मात्र शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे जमिनीतील सोयाबीन बियाणे आता दबण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. यावर्षी समाधानकारक पावसामुळे कपाशीची पेरणी व्यवस्थित झाली. त्यामुळे बळीराजा समाधानी दिसत होता. मात्र शनिवारी सायंकाळापसून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे भाव उमटू लागले आहेत.वणी तालुक्यात संततधार पावसाने १६ घरांची, तर एका गोठ्याची अशंत: पडझड झाली. त्यात शिंदोला परिसरातील चनाखा येथील पाच घरे आणि एका गोठ्याची पडझड झाली. राजूर कॉलरी येथील चार घरे, भांदेवाडा येथील तीन घरे, भालर परिसरातील बेसा येथील तीन घरांचीही अंशत: पडझड झाली आहे. याशिवाय कुठेही नुकसान झाले नाही. मात्र बहुतांश शेतात आता पावसाचे पाणी शिरले आहे. त्यातच पाऊस सुरू असल्याने रविारी शेतकऱ्यांना शेतात जाणेही जमले नाही. त्यामुळे शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकरी कासावीस झाले आहेत. मारेगाव तालुक्यातही शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर आणि रविवारी दिवसभर सुरूच होता. या पावसामुळे कपाशी, सोयाबिनचे बियाणे दबण्याची भिती वर्तविली जात आहे. सोबतच अुकंरलेली दोन पानांची कपाशीची झाडे संततधार पावसाने धोक्यात सापडली आहे. गेल्या आठवडाभर मारेगाव तालुक्यात जवळपास दररोज पाऊस कोसळत आहे. २० जूनला सायंकाळी ६ वाजता तालुक्यात पावसाला सुरूवात झाली. दुसऱ्या दिवशी रविवारीही संततधार पाऊस सुरूच आहे. संततधार पावसामुळे शेतात व इतरत्र पाणीच पाणी साचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून अुकंरलेले बियाणे पाण्यात सापडल्याने ते सडून मरण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकरी कपाशीची पेरणी झाल्यानंतर सोयाबिनची पेरणी करतात. सध्या सर्वत्र सोयाबिनची पेरणी सुरू होती. पेरणी केलेल्या सोयाबिनवर संततधार पाऊस झाल्याने पेरलेले बियाणे जमिनीतच दबण्याची भितीही निर्माण झाली आहे. संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील कोरडे पडलेले नाले, विहीर यांच्या पाणी पातळीत मात्र वाढ झाली आहे. पांढरकवडा तालुक्यात जोरदार पाऊस बरसलातालुक्यात शनिवारपासून जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहे. आजपर्यंत तालुक्यात तब्बल १८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी तालुक्यातील खुनी व पैनगंगा या नद्या दुथडी भरून वाहात होत्या. पीक पेरणीस अनुकूल ठरलेल्या या पावसामुळे बळीराजा समाधानी आहे. तालुक्यात वेळीच वरूण राजाचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. आणखी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, ते शेतकरीही पेरणी उरकण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी तालुक्यात ८९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या १७ जूनला रात्री २५ मिलीमीटर पाऊस झाला. इतर दिवशी रात्री तुरळक पावसाची नोंद झाली आहे. झरी तालुक्यात १४८ मिलीमीटरझरी - शनिवारी मध्यरात्री तालुक्यात पावसाला तालुक्यात सुरूवात झाली. हा पाऊस रविवारी सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरूच होता. तालुक्यात आजपर्यंत १४८ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जोरदार पावसामुळे तेलंगणा व महाराष्ट्राच्या सिमेजवळून वाहणारी पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी रात्रीपासूनच पावसामुळे वीज गुल झाली होती. ती रविवारीही परतली नव्हती. वृत्तलिहिस्तोवर वीज परतली नसल्याने तालुक्यातील ग्रामस्थ संतापले होते. (लोकमत चमू)