शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांविरुद्ध तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या ५४९ तक्रारी : दहा हजार हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस बियाणे आणि अपुरा पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्राला दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे उगवलेच नाही याच्या ५४९ तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. तक्रारीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उमरखेड तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी आहेत.३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.सदोष बियाणे असल्याने उगविलेच नाही. दमदार पाऊस होऊनही केवळ बियाण्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही कंपन्याच्या सर्टीफाईड बियाण्यात कचरा, खडे, गोटे, आणि कीड लागले दाणे आढळून आले. राज्य बियाणे गुणवत्ता नियंत्रण विभागाने निकृष्ट बियाण्याला मान्यता दिली कशी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उगवण शक्ती नसलेले बियाणे कंपन्यानी शेतकऱ्यांच्या माथी मारले. पेरणी झाल्यावर लगेच पाऊस बरसल्याने बियाणे कंपन्यांचा बदमाशपणा उघड झाला आहे.आता शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर कृषी विभागाने पेरणी झालेल्या शेतातील बियाण्याचे पंचनामे सुरू केले आहे. याशिवाय जिल्हयात प्राप्त झालेल्या बियाणे कंपन्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच कृषी विभाग सदोष बियाणे विकणाऱ्या कंपन्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलणार आहे. मात्र या शासकीय सोपस्कारातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही. असा पूर्वानुभव असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कंपन्या न्यायालयीन प्रक्रियेत दिवस काढतात. शेतकऱ्यांला आर्थिक फटका सोसून दुबार पेरणीची तयारी करावीच लागते.महाबीज देणार दुबार पेरणीला बियाणे१२ कंपन्याचे बियाणे उगवले नाही अशा आहेत. यामध्ये महाबिज कंपनीने त्यांच्या बियण्यासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली आहे. अशा तक्रारीत शेतकºयांना सोयाबीनची पर्यायी बियाणे तत्काळ देण्याचे आदशे महाबीजचे अपर सचिव उमेश चांदिवडे यांनी काढले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीMahabeejमहाबीज