शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

बियाण्यांविरुद्ध तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या ५४९ तक्रारी : दहा हजार हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस बियाणे आणि अपुरा पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्राला दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे उगवलेच नाही याच्या ५४९ तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. तक्रारीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उमरखेड तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी आहेत.३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.सदोष बियाणे असल्याने उगविलेच नाही. दमदार पाऊस होऊनही केवळ बियाण्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही कंपन्याच्या सर्टीफाईड बियाण्यात कचरा, खडे, गोटे, आणि कीड लागले दाणे आढळून आले. राज्य बियाणे गुणवत्ता नियंत्रण विभागाने निकृष्ट बियाण्याला मान्यता दिली कशी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उगवण शक्ती नसलेले बियाणे कंपन्यानी शेतकऱ्यांच्या माथी मारले. पेरणी झाल्यावर लगेच पाऊस बरसल्याने बियाणे कंपन्यांचा बदमाशपणा उघड झाला आहे.आता शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर कृषी विभागाने पेरणी झालेल्या शेतातील बियाण्याचे पंचनामे सुरू केले आहे. याशिवाय जिल्हयात प्राप्त झालेल्या बियाणे कंपन्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच कृषी विभाग सदोष बियाणे विकणाऱ्या कंपन्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलणार आहे. मात्र या शासकीय सोपस्कारातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही. असा पूर्वानुभव असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कंपन्या न्यायालयीन प्रक्रियेत दिवस काढतात. शेतकऱ्यांला आर्थिक फटका सोसून दुबार पेरणीची तयारी करावीच लागते.महाबीज देणार दुबार पेरणीला बियाणे१२ कंपन्याचे बियाणे उगवले नाही अशा आहेत. यामध्ये महाबिज कंपनीने त्यांच्या बियण्यासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली आहे. अशा तक्रारीत शेतकºयांना सोयाबीनची पर्यायी बियाणे तत्काळ देण्याचे आदशे महाबीजचे अपर सचिव उमेश चांदिवडे यांनी काढले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीMahabeejमहाबीज