शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

बियाण्यांविरुद्ध तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.

ठळक मुद्देसोयाबीनच्या ५४९ तक्रारी : दहा हजार हेक्टरवर दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस बियाणे आणि अपुरा पाऊस यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्राला दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे उगवलेच नाही याच्या ५४९ तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. तक्रारीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उमरखेड तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी आहेत.३१ मे रोजी जिल्ह्यात पाऊस बरसला. सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावली. ११, १२, १३ आणि १५ जूनला पाऊस बरसला. यानंतर पावसाने उघडीप दिली. यानंतर पेरणीच्या कामाला चांगलाच वेग आला. ७२ टक्के पेरण्या आटोपल्या. मात्र पेरणी केलेले सोयाबीनचे सर्टिफाईड बियाणे उगवलेच नाही. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांनी याची तक्रार केली आहे.सदोष बियाणे असल्याने उगविलेच नाही. दमदार पाऊस होऊनही केवळ बियाण्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही कंपन्याच्या सर्टीफाईड बियाण्यात कचरा, खडे, गोटे, आणि कीड लागले दाणे आढळून आले. राज्य बियाणे गुणवत्ता नियंत्रण विभागाने निकृष्ट बियाण्याला मान्यता दिली कशी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उगवण शक्ती नसलेले बियाणे कंपन्यानी शेतकऱ्यांच्या माथी मारले. पेरणी झाल्यावर लगेच पाऊस बरसल्याने बियाणे कंपन्यांचा बदमाशपणा उघड झाला आहे.आता शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर कृषी विभागाने पेरणी झालेल्या शेतातील बियाण्याचे पंचनामे सुरू केले आहे. याशिवाय जिल्हयात प्राप्त झालेल्या बियाणे कंपन्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. हा अहवाल मिळाल्यानंतरच कृषी विभाग सदोष बियाणे विकणाऱ्या कंपन्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलणार आहे. मात्र या शासकीय सोपस्कारातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही. असा पूर्वानुभव असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. कंपन्या न्यायालयीन प्रक्रियेत दिवस काढतात. शेतकऱ्यांला आर्थिक फटका सोसून दुबार पेरणीची तयारी करावीच लागते.महाबीज देणार दुबार पेरणीला बियाणे१२ कंपन्याचे बियाणे उगवले नाही अशा आहेत. यामध्ये महाबिज कंपनीने त्यांच्या बियण्यासंदर्भातील तक्रारीची दखल घेतली आहे. अशा तक्रारीत शेतकºयांना सोयाबीनची पर्यायी बियाणे तत्काळ देण्याचे आदशे महाबीजचे अपर सचिव उमेश चांदिवडे यांनी काढले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीMahabeejमहाबीज