शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वादळी पावसात रबी उद्ध्वस्त

By admin | Updated: February 13, 2015 01:57 IST

खरीप हंगामाच्या प्रारंभापासून सुरू असलेली निसर्ग प्रकोपाची मालिका थांबायला तयार नाही. मंगळवारी रात्री पुन्हा महागाव तालुक्याला निसर्ग प्रकोपाचा तडाखा बसला.

महागाव : खरीप हंगामाच्या प्रारंभापासून सुरू असलेली निसर्ग प्रकोपाची मालिका थांबायला तयार नाही. मंगळवारी रात्री पुन्हा महागाव तालुक्याला निसर्ग प्रकोपाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस आणि वादळाने तब्बल अडीच हजार हेक्टरवरील गहू आणि रबी ज्वारीचे नुकसान झाले. शेवटची आशाही मावळल्याने शेतकरी आता हतबल झाल्याचे दिसत आहे. एवढे मोठे नुकसान होऊनही प्रशासनाने मात्र अद्यापही दखल घेतल्याचे दिसत नाही.महागाव तालुक्यात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात ओंब्यावर आलेला गहू पूर्णत: झोपला. तर रबीतील हुरड्यावर आलेली ज्वारीही भूईसपाट झाली. महागाव तालुक्यात यावर्षी कृषी विभागानुसार चार हजार हेक्टर गहू तर एक हजार हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्यात आली होती. मंगळवारच्या पावसात दोन हजार हेक्टरवरील गहू आणि ५०० हेक्टरवरील ज्वारीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोणत्याही शेतात नजर टाकली तरी आडवा झोपलेला गहू दिसून येतो. हाताशी आलेला गहूही निसर्ग प्रकोपात उद्ध्वस्त झाला आहे. यंदा तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रबी ज्वारीची लागवड केली होती. यातून वैरणाचा प्रश्नही सुटणार होता. परंतु हुरड्याव आलेल्या ज्वारीलाही मोठा तडाखा बसला. खडका, हिवरा, लेवा, गुंज, माळकिन्ही, शिरपूर, करंजी, पोहंडूळ, महागाव, मुडाणा, फुलसावंगी यासह प्रत्येक गावात मोठे नुकसान झाले आहे. नुकसान होऊन दोन दिवस झाले तरी प्रशासनाचा कोणताही अधिकारी, कर्मचारी सर्वेक्षणासाठी तालुक्यात आला नाही. हतबल झालेले शेतकरी तहसील आणि कृषी विभागात माहिती देण्यासाठी जात आहे. परंतु त्यांचे कुणी ऐकायला तयार नाही. त्यामुळे या अवकाळी पावसात तालुक्यात नेमके किती नुकसान झाले हे कळायला मार्ग नाही. यावर्षी अपुऱ्या पावसाने सोयाबीन आणि कपाशी उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांची आशा रबी पिकावर होती. मात्र या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पुन्हा एकदा पाणी फेरले. (तालुका प्रतिनिधी) आंब्याचा मोहर गळलादिग्रस : यावर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याला मोहर आला होता. मोहराने आंब्याचे पानही दिसत नव्हते. परंतु मंगळवारी झालेल्या अकाली पाऊस आणि वादळाने आंब्याचा मोहर गळून पडला आहे. तसेच संत्रा आणि लिंबू पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. माळपठारावर वादळाचे तांडवबेलोरा : पुसद तालुक्यातील माळपठारावर मंगळवारी रात्री जोरदार वादळ झाले. या वादळाच्या तांडवात गहू, हरभरा आणि तूर पिकाचे नुकसान झाले. रात्री ११ ते २ वाजेपर्यंत सारखे वादळ आणि पाऊस सुरू होता. बेलोरा, पांढुर्णा, मांजरजवळा, रोहडा, कुंभारी, आमटी, मोप, शिवणी, होरकड या गावात मोठे नुकसान झाले आहे.