शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकांचे क्षेत्र घटले

By admin | Updated: November 23, 2015 02:13 IST

मागील वर्षाच्या तुलनेत दारव्हा तालुक्यात रबी पिकांचा पेरा कमी झाला आहे. यंदा पर्जन्यमानसुद्धा कमी झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली ...

दारव्हा : मागील वर्षाच्या तुलनेत दारव्हा तालुक्यात रबी पिकांचा पेरा कमी झाला आहे. यंदा पर्जन्यमानसुद्धा कमी झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली परिणामामुळे शेतकऱ्यांनी विहिरीतील पातळीचा अंदाज घेवून रबी पिकांच्या पेरणीत कमी क्षेत्र गुंतविले आहे. मागील पंधरवाड्यापासून ढगाळी वातावरण होत असल्याने याचा परिणाम तूर पिकावर जाणवत आहे. बहुतांश शेतकरी तुरीवर किटकनाशकांच्या फवारणीत व्यस्त झाला आहे.यावर्षी पावसाळ्यात परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओल कमी होती. सोयाबीन पीक काढणी झाल्याबरोबर चना उत्पादक शेतकरी पेरणी करायचे. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे चन्याची उगवण योग्य होते. नंतर दोन पाण्याच्या पाळ्या दिल्या तरी पीक हाती येत होते. परंतु यंदा जमिनीत योग्य ओलावा नसल्याने व पाण्याची पातळीही कमी झाल्याने तालुक्यात रबीच्या पेऱ्यात घसरण झाली आहे. मागच्या वर्षी साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात रबी पिकाची पेरणी झाली होती. यावर्षी क्षेत्र कमी होवून नोव्हेंबर अखेरचा आठवडा आल्यावरही केवळ साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा व चारा पिके पेरली आहेत. अडत्तण नदीवर असलेल्या म्हसणी धरणात सध्या ४१ दलघमी एवढा साठा उपलब्ध आहे. तालुक्यात या अडाण प्रकल्पाचे कालवे आहेत. प्रकल्पापासून ३१ व्या किमीपर्यंत येत असलेल्या शेतकऱ्यांकरिता यावर्षी ओलिताकरिता पाच पाण्याच्या पाळ्यांसाठी पाणी सोडल्या जात आहे. तर ३२ ते ४१ व्या किमीसाठी हरभरा पिकाकरिता तीन पाण्याच्या पाळ्या होईल अशा रितीने पाणी सोडणार असल्याचे अडाण प्रकल्पाच्या सूत्रांनी सांगितले आहे. यासाठी प्रत्येक सातबाराधारकाला एक एकर गहू व एक एकर हरभरा पीक पेरा अशी मर्यादा ठरवून दिलेली आहे. अडाण प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर किमान दोन हजार हेक्अर क्षेत्र ओलित अपेक्षित आहे.विहिरीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज घेत काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या पिकांची पेरणी न करता सध्या शेतात उभ्या असलेल्या कापूस व तूर पिकाला ओलित करून उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने नियोजन करून ओलितास प्रारंभ केला आहे. त्यात बाजारात तूर डाळीचे भाव वाढल्याने यंदा तूर पिकालाही उत्तम भाव मिळतील या आशेने शेतकरी तूर पिकांची निगा घेताना दृष्टिपथास पडत आहे. सध्या तूर पीक फुलोरा व शेंगांच्या अवस्थेत आहे. ढगाळी वातावरणाने तुरीवर अळ्यांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्यावर योग्य कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी अशी माहिती तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)