शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्न

By admin | Updated: June 15, 2015 02:34 IST

टंचाईमुक्त शिवारासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे.

जलयुक्त शिवार योजना : पारवा परिसरात निकृष्ट कामांसोबतच उंचीही कमीपारवा : टंचाईमुक्त शिवारासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर बंधारे बांधले जात आहे. बहुतांश ठिकाणी प्राकलनाला डावलून आणि निकृष्ट साहित्य वापरून कामे होत असल्याने बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. परिसरात अनेक ठिकाणी निर्माणाधीन बंधाऱ्यांची ही स्थिती आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.परिसरातील विविध गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. नदी, नाले, विहिरी, हातपंप कोरडे पडतात. या स्थितीत नागरिकांना गावापासून दूर अंतरावर असलेल्या स्रोतांवर पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. उन्हाचे चटके झेलत आणि मजुरी बुडवून पाण्यासाठी भटकावे लागते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या येरझारा सुरू असतात. ही परिस्थिती दूर व्हावी यासाठी नदी-नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधले जात आहेत. जलस्रोतांची पातळी वाढण्यासोबतच जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आदी या मागील उद्देश आहे. मात्र कंत्राटदारांकडून या महत्त्वाकांक्षी योजनेला खिंडार पाडले जात आहे. बंधाऱ्याच्या बांधकामासाठी रेती गाळली जात नाही, नाल्याची वापरण्यात येते. सिमेंटचा उपयोग अतिशय कमी केला जातो. गज आणि गिट्टी प्राकलनानुसार घेतली जात नाही. बांधकाम झाल्यानंतर त्यावर पाण्याचा मारा अपवादानेच होतो. या सर्व बाबींमुळे बंधाऱ्याची कामे निकृष्ट होत आहे. याशिवाय नाल्यांवर बांधण्यात आलेले बंधारे जमिनीच्या समतल आहे. जास्तीत जास्त पाणी अडले जावे, हा उद्देश असला तरी अनेक ठिकाणी केवळ एक ते दीड फूट उंची घेवून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडणे अशक्य आहे. वास्तविक चार ते पाच फूट उंची किंवा नदी अथवा नाल्याच्या पात्राची खोली वाढवून तेथे बंधारा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु ही दक्षता कुठेही घेण्यात आलेली नाही. पुराचे पाणी बंधाऱ्यावरून वाहून जाणार आहे. त्यामुळे अतिशय कमी पाणी त्याठिकाणी अडविले जाईल. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच हे बंधारे कोरडे पडतील, अशी स्थिती आजची आहे. या कामांविषयी नागरिकांनी काही सूचना केल्यानंतरही संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नाही. कंत्राटदाराने मजुरांच्या भरवशावर काम सोडून दिले. त्यांनी कुठलेही नियम पाळले नाही. आता मात्र या बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट कामांमुळे ते वाहून जाण्याची भीती आहे, तर दुसरीकडे उंची कमी असल्याने पाण्याची साठवण क्षमता नाममात्र असणार आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले बंधारे काही दिवसातच कुचकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारवा गावालगत दोन ठिकाणी सदर योजनेंतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांची स्थिती अशीच आहे. अनेकांच्या शेतातून गेलेल्या नाल्यावर बंधारे बांधण्यात आलेले आहे. संबंधित शेतकरीही पाणी अधिक साठविलेले असल्यास सिंचन करू शकत होते. मात्र आता ही आशाही धूसर झाली आहे. (वार्ताहर)