शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्न

By admin | Updated: June 15, 2015 02:34 IST

टंचाईमुक्त शिवारासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे.

जलयुक्त शिवार योजना : पारवा परिसरात निकृष्ट कामांसोबतच उंचीही कमीपारवा : टंचाईमुक्त शिवारासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना हाती घेतली आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी नदी-नाल्यांवर बंधारे बांधले जात आहे. बहुतांश ठिकाणी प्राकलनाला डावलून आणि निकृष्ट साहित्य वापरून कामे होत असल्याने बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. परिसरात अनेक ठिकाणी निर्माणाधीन बंधाऱ्यांची ही स्थिती आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.परिसरातील विविध गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. नदी, नाले, विहिरी, हातपंप कोरडे पडतात. या स्थितीत नागरिकांना गावापासून दूर अंतरावर असलेल्या स्रोतांवर पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. उन्हाचे चटके झेलत आणि मजुरी बुडवून पाण्यासाठी भटकावे लागते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या येरझारा सुरू असतात. ही परिस्थिती दूर व्हावी यासाठी नदी-नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधले जात आहेत. जलस्रोतांची पातळी वाढण्यासोबतच जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आदी या मागील उद्देश आहे. मात्र कंत्राटदारांकडून या महत्त्वाकांक्षी योजनेला खिंडार पाडले जात आहे. बंधाऱ्याच्या बांधकामासाठी रेती गाळली जात नाही, नाल्याची वापरण्यात येते. सिमेंटचा उपयोग अतिशय कमी केला जातो. गज आणि गिट्टी प्राकलनानुसार घेतली जात नाही. बांधकाम झाल्यानंतर त्यावर पाण्याचा मारा अपवादानेच होतो. या सर्व बाबींमुळे बंधाऱ्याची कामे निकृष्ट होत आहे. याशिवाय नाल्यांवर बांधण्यात आलेले बंधारे जमिनीच्या समतल आहे. जास्तीत जास्त पाणी अडले जावे, हा उद्देश असला तरी अनेक ठिकाणी केवळ एक ते दीड फूट उंची घेवून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडणे अशक्य आहे. वास्तविक चार ते पाच फूट उंची किंवा नदी अथवा नाल्याच्या पात्राची खोली वाढवून तेथे बंधारा होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु ही दक्षता कुठेही घेण्यात आलेली नाही. पुराचे पाणी बंधाऱ्यावरून वाहून जाणार आहे. त्यामुळे अतिशय कमी पाणी त्याठिकाणी अडविले जाईल. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच हे बंधारे कोरडे पडतील, अशी स्थिती आजची आहे. या कामांविषयी नागरिकांनी काही सूचना केल्यानंतरही संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नाही. कंत्राटदाराने मजुरांच्या भरवशावर काम सोडून दिले. त्यांनी कुठलेही नियम पाळले नाही. आता मात्र या बंधाऱ्यांच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट कामांमुळे ते वाहून जाण्याची भीती आहे, तर दुसरीकडे उंची कमी असल्याने पाण्याची साठवण क्षमता नाममात्र असणार आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले बंधारे काही दिवसातच कुचकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारवा गावालगत दोन ठिकाणी सदर योजनेंतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांची स्थिती अशीच आहे. अनेकांच्या शेतातून गेलेल्या नाल्यावर बंधारे बांधण्यात आलेले आहे. संबंधित शेतकरीही पाणी अधिक साठविलेले असल्यास सिंचन करू शकत होते. मात्र आता ही आशाही धूसर झाली आहे. (वार्ताहर)