शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाचत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

दीड लाख शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 21:38 IST

जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशीवर बोंडअळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमाच काढला नसल्याने त्यांना मदत मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपीक विम्याकडे पाठ : बोंडअळीचे नुकसान भरून निघणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशीवर बोंडअळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमाच काढला नसल्याने त्यांना मदत मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खरीप हंगामात नऊ लाख हेक्टरवर लागवड झाली. यात चार लाख ५६ हजार हेक्टरवर कपाशी होती. जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मात्र कपाशी पिकाला विम्याचे संरक्षण देण्यासाठी केवळ ६३ हजार शेतकरी पुढे आले. त्यांनी कापसाला संरक्षित करण्यासाठी १४ कोटी रूपयांचे प्रिमियम भरले. मात्र इतर दीड लाख शेतकऱ्यांना पिकाचा विमाच उतरविता आला नाही. यामुळे नुकसानीपोटी मिळणारी आठ हजारांची मदत त्यांना मिळणे दुरापास्त होणार आहे.दरम्यान, जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून तक्रारी मागविण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील चार लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले आहे. तथापि जिल्ह्यातील केवळ ३७ हजार शेतकऱ्यांनीच याबाबत जी आणि एच फॉर्ममध्ये तक्रारी दाखल केल्या. इतर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. मात्र त्यांनी तक्रारीच दाखल केल्या नाहीत. काह शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. मात्र त्यासोबत बियाणे खरेदीची पावती जोडली नाही. काहींनी जी आणि एच फॉर्ममध्ये तक्रारी केल्या नाहीत. असे शेकतरी आता मदतीसाठी अपात्र ठरण्याचा धोका आहे.बियाणे खरेदीच्या पावत्याच नाहीतबोंडअळीने नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. कपाशीच्या वाणाला दोष देत आहेत. मात्र बियाणे कंपन्या न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. कंपन्या न्यायालयात गेल्यास शेतकरी अडचणीत येणार आहे. कारण अनेक शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदी केल्याचे पुरावे नाहीत. अनेकांनी पावत्या जपून ठेवल्या नाही. त्यामुळे त्यांना मदत मिळेल किंवा नाही, हे सांगणे कठीण झाले आहे.सर्वच क्षेत्रात नुकसान झाले. मात्र शेतकºयांच्या मोजक्याच तक्रारी आल्या आहेत. शेतकºयांनी जी आणि एच फॉर्ममध्ये नुकसानीच्या तक्रारी दाखल कराव्या. त्यासाठी कोणतीही मुदत नाही. विमा न उतरविणाºया शेतकºयांबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- किशोर तिवारीअध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन