शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 21:38 IST

जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशीवर बोंडअळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमाच काढला नसल्याने त्यांना मदत मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपीक विम्याकडे पाठ : बोंडअळीचे नुकसान भरून निघणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशीवर बोंडअळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमाच काढला नसल्याने त्यांना मदत मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.खरीप हंगामात नऊ लाख हेक्टरवर लागवड झाली. यात चार लाख ५६ हजार हेक्टरवर कपाशी होती. जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मात्र कपाशी पिकाला विम्याचे संरक्षण देण्यासाठी केवळ ६३ हजार शेतकरी पुढे आले. त्यांनी कापसाला संरक्षित करण्यासाठी १४ कोटी रूपयांचे प्रिमियम भरले. मात्र इतर दीड लाख शेतकऱ्यांना पिकाचा विमाच उतरविता आला नाही. यामुळे नुकसानीपोटी मिळणारी आठ हजारांची मदत त्यांना मिळणे दुरापास्त होणार आहे.दरम्यान, जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून तक्रारी मागविण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील चार लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित झाले आहे. तथापि जिल्ह्यातील केवळ ३७ हजार शेतकऱ्यांनीच याबाबत जी आणि एच फॉर्ममध्ये तक्रारी दाखल केल्या. इतर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. मात्र त्यांनी तक्रारीच दाखल केल्या नाहीत. काह शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. मात्र त्यासोबत बियाणे खरेदीची पावती जोडली नाही. काहींनी जी आणि एच फॉर्ममध्ये तक्रारी केल्या नाहीत. असे शेकतरी आता मदतीसाठी अपात्र ठरण्याचा धोका आहे.बियाणे खरेदीच्या पावत्याच नाहीतबोंडअळीने नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. कपाशीच्या वाणाला दोष देत आहेत. मात्र बियाणे कंपन्या न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. कंपन्या न्यायालयात गेल्यास शेतकरी अडचणीत येणार आहे. कारण अनेक शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदी केल्याचे पुरावे नाहीत. अनेकांनी पावत्या जपून ठेवल्या नाही. त्यामुळे त्यांना मदत मिळेल किंवा नाही, हे सांगणे कठीण झाले आहे.सर्वच क्षेत्रात नुकसान झाले. मात्र शेतकºयांच्या मोजक्याच तक्रारी आल्या आहेत. शेतकºयांनी जी आणि एच फॉर्ममध्ये नुकसानीच्या तक्रारी दाखल कराव्या. त्यासाठी कोणतीही मुदत नाही. विमा न उतरविणाºया शेतकºयांबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.- किशोर तिवारीअध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन