शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

विठ्ठलवाडीतील प्रश्न सीओंच्या दरबारात

By admin | Updated: May 7, 2016 02:29 IST

स्थानिक विठ्ठलवाडी परिसरातील विविध प्रश्न शहर शिवसेनेने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मांडले. सडका भाजीपाला आणि अस्वच्छतेमुळे होणारा त्रास यातून मुक्तता करावी,

घाणीचे साम्राज्य : नगरसेवकांचेही दुर्लक्ष असल्याचा आरोपयवतमाळ : स्थानिक विठ्ठलवाडी परिसरातील विविध प्रश्न शहर शिवसेनेने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मांडले. सडका भाजीपाला आणि अस्वच्छतेमुळे होणारा त्रास यातून मुक्तता करावी, अशी मागणी प्रामुख्याने यावेळी करण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख पराग पिंगळे आणि उपशहर प्रमुख पिंटू बांगर यांच्या पुढाकारात मुख्याधिकारी सुदाम धुपे यांना निवेदन देण्यात आले. या भागाशी संबंधित नगरसेवक समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आठवडी बाजारातील भाजी मंडई विठ्ठलवाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थलांतरित करण्यात आली. मात्र त्यादृष्टीने या भागात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. भाजी मंडईत शिल्लक राहिलेला भाजीपाला आणि केरकचरा नागरी वस्तीतच फेकून दिला जातो. शिवाय या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसल्याने उघड्यावरच विधी उरकविला जातो. या दोनही प्रकारामुळे घाण आणि दुर्गंधीचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. भाजीपाला आणि कचरा टाकण्यासाठी ट्रॉली आणि स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचवेळी मुख्याधिकारी धुपे यांनी बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर यांच्याशी चर्चा केली. निवेदन देताना शिवसेना उपशहर प्रमुख राजेश कोहरे, अतुल कुमटकर, जयराज बहादुरे, विजय सावरकर, प्रेमलाल चावरे, किशोर पवार, श्रीखंडे, देशमुख, सानप, मयूर कारंजकर, अमित खंडारे, जुनघरे, अशोक राका, मदन भोयर, भैया ठाकूर, टिंकू कदम, कारंजकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)