घाणीचे साम्राज्य : नगरसेवकांचेही दुर्लक्ष असल्याचा आरोपयवतमाळ : स्थानिक विठ्ठलवाडी परिसरातील विविध प्रश्न शहर शिवसेनेने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मांडले. सडका भाजीपाला आणि अस्वच्छतेमुळे होणारा त्रास यातून मुक्तता करावी, अशी मागणी प्रामुख्याने यावेळी करण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख पराग पिंगळे आणि उपशहर प्रमुख पिंटू बांगर यांच्या पुढाकारात मुख्याधिकारी सुदाम धुपे यांना निवेदन देण्यात आले. या भागाशी संबंधित नगरसेवक समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आठवडी बाजारातील भाजी मंडई विठ्ठलवाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थलांतरित करण्यात आली. मात्र त्यादृष्टीने या भागात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही. भाजी मंडईत शिल्लक राहिलेला भाजीपाला आणि केरकचरा नागरी वस्तीतच फेकून दिला जातो. शिवाय या ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी स्वच्छतागृहाची सोय नसल्याने उघड्यावरच विधी उरकविला जातो. या दोनही प्रकारामुळे घाण आणि दुर्गंधीचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. भाजीपाला आणि कचरा टाकण्यासाठी ट्रॉली आणि स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचवेळी मुख्याधिकारी धुपे यांनी बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर यांच्याशी चर्चा केली. निवेदन देताना शिवसेना उपशहर प्रमुख राजेश कोहरे, अतुल कुमटकर, जयराज बहादुरे, विजय सावरकर, प्रेमलाल चावरे, किशोर पवार, श्रीखंडे, देशमुख, सानप, मयूर कारंजकर, अमित खंडारे, जुनघरे, अशोक राका, मदन भोयर, भैया ठाकूर, टिंकू कदम, कारंजकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
विठ्ठलवाडीतील प्रश्न सीओंच्या दरबारात
By admin | Updated: May 7, 2016 02:29 IST