शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

नाफेडच्या तूर खरेदी मुदतवाढीवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: April 17, 2017 00:29 IST

शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा असताना सरकार केवळ त्या सोडविण्याचा देखावा निर्माण करीत आहे.

चुकारे नाही : शेतकऱ्यांचा विश्वास उडाला यवतमाळ : शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा असताना सरकार केवळ त्या सोडविण्याचा देखावा निर्माण करीत आहे. आता तूर खरेदीची मुदत सात दिवसांनी वाढविण्याचे तोंडी आदेश आहे. मात्र आधीची आश्वासने हवेत विरल्याने शेतकऱ्यांचा या मुदतवाढीवरही विश्वास उडाला आहे. शेतकऱ्यांना आधारभूत दर मिळावे म्हणून तूर खरेदीसाठी हमी केंद्र सुरू करण्यात आले. हे केंद्र केवळ बुजगावणे ठरले. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झालाच नाही. त्यांनी आपली तूर केंद्रावर नेली. मात्र त्यांच्यापेक्षा व्यापाऱ्यांचीच तूर मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. काही केंद्रांवर असा शेतमाल जप्तही झाला. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. या-ना त्या कारणाने हे केंद्र सतत बंद होते. शेवटच्या क्षणाला केंद्र खुले झाले. तेव्हा केंद्राची मुदत संपली. ते बंद करण्याच्या सूचना धडकल्या. शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करू असे आश्वासन शेतकऱ्यांना मिळाले. प्रत्यक्षात मधेच खरेदी बंद झाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सरकारच्या शब्दावरील विश्वासच उडाला आहे. त्यातच महिनाभरापासून चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. (शहर वार्ताहर) बारदाना पोहोचलाच नाहीमार्च महिन्यात बारदाना घेऊन निघालेले चार ट्रक अद्याप पोहचले नाही. तत्काळ चुकारे देण्याची घोषणाही हवेत विरली. नाफेडचे केंद्र वाढण्याची ग्वाहीसुद्धा खोटी ठरली. उलट काही केंद्र बंद पडले. आता सात दिवसांची मुदतवाढ मिळाल्याचे सांगण्यात येते. मात्र लेखी पत्र नाही. उपाययोजना करायला तयार नाही. त्यामुळे चोहोबाजूंनी शेतकरी संकटात सापडले आहे.