शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

एसटी विलीनीकरणाचा प्रश्न कोरोनाने ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे एसटीची चाके थांबली आहे. उत्पन्नाचा स्रोत आटला आहे. मार्च २०२० च्या वेतनापासून कर्मचाऱ्यांना आर्थिक झटके दिले जात आहे. २५ टक्के, ५० टक्के आणि १०० टक्के पगार काही महिन्यात झाला नाही. सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून दोन फूल, एक हाफ आणि एक वनफोर्थ असा पगार घ्यायचा आहे.

ठळक मुद्देसमस्या वाढल्या : आर्थिक कोंडी, पगाराचा पाच महिन्यांपासून ब्रेकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे ही मागणी कोरोनामुळे पुन्हा ऐरणीवर आली आहे. मागील पाच महिन्यांपासून वेतनातील अनियमिततेमुळे ही मागणी आता जोरदारपणे रेटून धरण्यात आली आहे. विभागपातळीवर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मंत्र्यांना निवेदन देण्याची मोहीम हाती घेतली आहे.लॉकडाऊनमुळे एसटीची चाके थांबली आहे. उत्पन्नाचा स्रोत आटला आहे. मार्च २०२० च्या वेतनापासून कर्मचाऱ्यांना आर्थिक झटके दिले जात आहे. २५ टक्के, ५० टक्के आणि १०० टक्के पगार काही महिन्यात झाला नाही. सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून दोन फूल, एक हाफ आणि एक वनफोर्थ असा पगार घ्यायचा आहे.महामंडळातील बरेच कर्मचारी २० हजार रुपयांच्या आत पगार घेणारे आहेत. एवढ्या कमी पगारावरही त्यांनी गरजेपोटी कर्ज उचलले आहे. विविध प्रकारच्या कपाती होवून महिनाभराचा खर्च भागविता येईल एवढीही रक्कम त्यांच्या हाती पडत नाही. ५० टक्के पगारातून काही कर्मचाऱ्यांच्या हाती तर दोन ते अडीच हजार रुपये आले. एसटीची आर्थिक स्थिती डळमळीत असल्यानेच हा प्रकार होत आहे. त्यामुळेच लालपरीचे शासनात विलिनीकरण करावे, अशी मागणी रेटली जात आहे. या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा गेली अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू आहे.महामंडळाचे शासनात विलीनीकरण झाल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहे. वेतनात नियमितता राहील. अंशदान, उपदानाच्या रकमा मिळण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. शिवाय आज कोरोनामुळे निर्माण झालेल्या मंदीच्या काळातही नोकरीची पूर्ण हमी राहील. आज एसटी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले जात आहे. रोजंदार गट-१ च्या कर्मचाºयांची सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. हे सर्व धोके शासनात विलिनीकरण झाल्यास निर्माण होणार नाही, असे सांगितले जाते.या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आता आपला लढा तीव्र केला आहे. मंत्र्यांना निवेदन दिले जात आहे. संघटनांच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.भविष्य निर्वाह निधीसाठी प्रतीक्षाखूप अडचणीच्या काळातच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा वापर करतात. एसटी महामंडळातही हीच पद्धत रूढ आहे. मात्र एसटीमध्ये काही ठिकाणी ही रक्कम मिळविण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. पैसा उपलब्ध राहात नसल्याने कर्मचाऱ्यांना संबंधितांकडे वारंवार विचारणा करावी लागते. भविष्य निर्वाह निधीचा व्यवहार सांभाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात स्वतंत्र व्यवस्थापन आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक