शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुसद तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:41 IST

तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तथापि तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही शेततळ्याच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देअनेक शेतकरी प्रतीक्षेत : यावर्षी अडीच कोटींचा निधी मंजूर

ऑनलाईन लोकमतपुसद : तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तथापि तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही शेततळ्याच्या प्रतीक्षेत आहे.मागेल त्याला शेततळे या योजनेनुसार शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. यातून शेतकऱ्यांना शास्वत सिंचनाची सुविधा प्राप्त होते. त्यांना दुबार पीक घेणेही शक्य होते. खरीप आणि रबी हंगामात पीक घेऊन शेतकऱ्यांना आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ करता येते. हीच बाब हेरुन शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. २०१७-१८ साठी पुसद तालुक्याला जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेततळ्यांसाठी दोन कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला.तालुक्यातील ६३ गावांमध्ये ८५० शेततळे पूर्ण झाले. मात्र अनेक गावांमध्ये कागदोपत्री शेततळे पूर्ण करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. दर १५ दिवसांनी कृषी विभाग आॅनलाईन मागणीनुसार शेततळ्यांसाठी लाभार्थ्यांची निवड करते. अंदाजपत्रक तयार करून उपविभागीय अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जाते. काम पूर्ण झाल्यावर अनुदान दिले जाते. मात्र ज्या शेतकऱ्याच्या नावावर केवळ ०.६० हेक्टर जमीन आहेत. त्यांनाच योजनेचा लाभ दिला जातो. यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य दिले जाते. ५० हजारांच्या अनुदानातून हे शेततळे पूर्ण करावे लागते.जलयुक्तशिवार अभियानांतर्गत तालुक्यात २०१७-१८ मध्ये खैरखेडा येथे सर्वाधिक ४८ शेततळे मंजूर झाले आहे. तथापि अनेक गावांमध्ये कागदोपत्रीच शेततळे पूर्ण झाल्याची ओरड सुरू आहे.अनुदान कमी असल्याची ओरडएक शेततळे पूर्ण करण्यासाठी किमान लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र शासनाकडून केवळ ५० हजारांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे अनुदान कमी असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभाग मात्र एवढ्याच अनुदानात शेततळे पूर्ण होत असल्याचा दावा करीत आहे. दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रकाश नाईक, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.