शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पुसद तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:41 IST

तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तथापि तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही शेततळ्याच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देअनेक शेतकरी प्रतीक्षेत : यावर्षी अडीच कोटींचा निधी मंजूर

ऑनलाईन लोकमतपुसद : तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तथापि तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही शेततळ्याच्या प्रतीक्षेत आहे.मागेल त्याला शेततळे या योजनेनुसार शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. यातून शेतकऱ्यांना शास्वत सिंचनाची सुविधा प्राप्त होते. त्यांना दुबार पीक घेणेही शक्य होते. खरीप आणि रबी हंगामात पीक घेऊन शेतकऱ्यांना आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ करता येते. हीच बाब हेरुन शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. २०१७-१८ साठी पुसद तालुक्याला जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेततळ्यांसाठी दोन कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला.तालुक्यातील ६३ गावांमध्ये ८५० शेततळे पूर्ण झाले. मात्र अनेक गावांमध्ये कागदोपत्री शेततळे पूर्ण करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. दर १५ दिवसांनी कृषी विभाग आॅनलाईन मागणीनुसार शेततळ्यांसाठी लाभार्थ्यांची निवड करते. अंदाजपत्रक तयार करून उपविभागीय अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जाते. काम पूर्ण झाल्यावर अनुदान दिले जाते. मात्र ज्या शेतकऱ्याच्या नावावर केवळ ०.६० हेक्टर जमीन आहेत. त्यांनाच योजनेचा लाभ दिला जातो. यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य दिले जाते. ५० हजारांच्या अनुदानातून हे शेततळे पूर्ण करावे लागते.जलयुक्तशिवार अभियानांतर्गत तालुक्यात २०१७-१८ मध्ये खैरखेडा येथे सर्वाधिक ४८ शेततळे मंजूर झाले आहे. तथापि अनेक गावांमध्ये कागदोपत्रीच शेततळे पूर्ण झाल्याची ओरड सुरू आहे.अनुदान कमी असल्याची ओरडएक शेततळे पूर्ण करण्यासाठी किमान लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र शासनाकडून केवळ ५० हजारांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे अनुदान कमी असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभाग मात्र एवढ्याच अनुदानात शेततळे पूर्ण होत असल्याचा दावा करीत आहे. दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रकाश नाईक, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.