शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

पुसद वनविभागाची जंगल सत्याग्रहींना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:36 IST

तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देस्मृतिस्थळावर अभिवादन : कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तत्कालीन इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह १० जुलै १९३० रोजी तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता. लोकनायक बापूजी अणे यांनी या सत्याग्रहातून इंग्रज सरकारचा विरोध केला होता. या घटनेला आज ९० वर्षे पूर्ण झाली. त्याप्रीत्यर्थ शुक्रवारी वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे जंगल सत्याग्रहींना आदरांजली अर्पण करण्यात आली.बेलगव्हाण घाटातील जंगलातील स्मृतीस्थळी पुसद वन विभाग व लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीतर्फे शुक्रवारी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे यांनी लोकनायक अणे यांच्या जंगल सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहायक वनसंरक्षक विश्वास करे, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत, आनंद धोत्रे, पी.पी. गंगाखेडे, वसंतराव पाटील कान्हेकर, प्रा. नारायण क्षीरसागर, राजेश आसेगावकर, संभाजी टेटर, मनीष जाधव, ज्ञानेश्वर तडसे, विनोद जिल्हेवार, अविनाश पोळकट, विजय उबाळे, भाऊ मुडाणकर, सुनील गुद्धटवार, रवी देशपांडे, प्रा. दिनकर गुल्हाने, अनिल चेंडकाळे, संजय कोरटकर, सौरभ कोरटकर आदी उपस्थित होते.उपवनसंरक्षक मुंढे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील अणे यांच्या योगदानाची माहिती दिली. तसेच स्मृतीस्थळ विकासाबाबतचा आढावा सादर केला. प्रथम सर्वांनी स्मृती स्थळावर पुष्पमाला अर्पण करुन सत्याग्रहींना आदरांजली वाहिली. यावेळी शासनाच्या कुरण विकास योजनेला लोकनायक बापूजी अणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. वनरक्षक भाऊ बेले, भाऊ लहाडगे, भाऊ राठोड, पवने, खान आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग