शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

‘एक टॅँकर माझ्या नावाने’च्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:11 IST

शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदिलासा : आंबेडकरी साहित्य व कला अकादमी, ‘नाग’चा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नाग) संघटनेने समाजातील दात्यांना आवाहन करून ‘एक टॅँकर माझ्या नावाने’ या उपक्रमाची सुरुवात केली. याला शहरातील आणि विदेशात स्थिरावलेल्या समाजबांधवांनी सढळ हाताने मदत केली. यातून गरीब वस्तीमध्ये दिवसाला चार हजार लिटर शुद्ध पाणी वितरित केले जात आहे.हा उपक्रम सुरू करण्यासाठी सुरुवातील अकादमीच्या सदस्यांनी स्वत:च्या खिशातून वर्गणी दिली. या उपक्रमातील सेवाभाव पाहून अनेकांनी स्वेच्छेने शक्य होईल ती रक्कम या कामात दिली. अकादमी व ‘नाग’ संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनीसुद्धा देणगी दात्याच्या नावे टॅँकरवर बॅनर लावून पाणी वाटप सुरू केले. रोजमजुरीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडणाऱ्यांना टंचाईत शाश्वत पुरवठा केला जात आहे. पाटीपुरा, सम्राट अशोक चौक ते आंबेडकर चौक वस्ती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, नेताजीनगर या भागात रोटेशन पद्धतीने शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येत आहे.हा उपक्रम आनंद गायकवाड, गोपींचद कांबळे, कवडूजी नगराळे, डॉ.सुभाष जमधाडे, डॉ.साहेबराव कदम, प्रा.अ‍ॅड.संदीप नगराळे, अभियंता संजय मानकर, संजय ढोले यांच्यासह ‘नाग’ संघटनेचे रितेश मून, राहुल बनसोड, मंगला जाधव, शोभा हनवते, भारत थुल निस्वार्थ भावनेने राबवित आहेत. आनंद गायाकवाड व मालती गायकवाड या दाम्पत्यांनी तर पाणी वाटपाच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई