शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

‘एक टॅँकर माझ्या नावाने’च्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 22:11 IST

शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देदिलासा : आंबेडकरी साहित्य व कला अकादमी, ‘नाग’चा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नाग) संघटनेने समाजातील दात्यांना आवाहन करून ‘एक टॅँकर माझ्या नावाने’ या उपक्रमाची सुरुवात केली. याला शहरातील आणि विदेशात स्थिरावलेल्या समाजबांधवांनी सढळ हाताने मदत केली. यातून गरीब वस्तीमध्ये दिवसाला चार हजार लिटर शुद्ध पाणी वितरित केले जात आहे.हा उपक्रम सुरू करण्यासाठी सुरुवातील अकादमीच्या सदस्यांनी स्वत:च्या खिशातून वर्गणी दिली. या उपक्रमातील सेवाभाव पाहून अनेकांनी स्वेच्छेने शक्य होईल ती रक्कम या कामात दिली. अकादमी व ‘नाग’ संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनीसुद्धा देणगी दात्याच्या नावे टॅँकरवर बॅनर लावून पाणी वाटप सुरू केले. रोजमजुरीसाठी सहकुटुंब घराबाहेर पडणाऱ्यांना टंचाईत शाश्वत पुरवठा केला जात आहे. पाटीपुरा, सम्राट अशोक चौक ते आंबेडकर चौक वस्ती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, नेताजीनगर या भागात रोटेशन पद्धतीने शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येत आहे.हा उपक्रम आनंद गायकवाड, गोपींचद कांबळे, कवडूजी नगराळे, डॉ.सुभाष जमधाडे, डॉ.साहेबराव कदम, प्रा.अ‍ॅड.संदीप नगराळे, अभियंता संजय मानकर, संजय ढोले यांच्यासह ‘नाग’ संघटनेचे रितेश मून, राहुल बनसोड, मंगला जाधव, शोभा हनवते, भारत थुल निस्वार्थ भावनेने राबवित आहेत. आनंद गायाकवाड व मालती गायकवाड या दाम्पत्यांनी तर पाणी वाटपाच्या कामात स्वत:ला झोकून दिले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई