शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘सायको’ तरुणांंमुळे महिला त्रस्त

By admin | Updated: November 7, 2015 03:11 IST

काटोल रोडवरील एका उच्चभ्रू कॉलनीतील महिला मागील पाच महिन्यांपासून काही ‘सायको’ हल्लेखोर तरुणांच्या दहशतीत जगत आहेत.

पाच महिन्यांपासून दहशत : काटोल रोडवरील प्रकारजगदीश जोशी नागपूरकाटोल रोडवरील एका उच्चभ्रू कॉलनीतील महिला मागील पाच महिन्यांपासून काही ‘सायको’ हल्लेखोर तरुणांच्या दहशतीत जगत आहेत. या तरुणांनी रस्त्याने जाणाऱ्या महिलांना त्रासून सोडले आहे. पोलिसांकडूनही प्रभावी मदत न मिळाल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. एखादा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे महिलांसह कुटुंबीयही घाबरले आहेत. काटोल रोडवरील गिट्टीखदान परिसरात केटी नगर आणि जागृती कॉलनी आहे. एक किलोमीटर पसरलेल्या या परिसरातील महिला या तरुणांच्या त्रासामुळे त्रस्त आहेत. जून महिन्यापासून या घटनांना सुरुवात झाली. जागृती कॉलनीतील महिलेला एक ‘सायको’ तरुण धक्का देऊन फरार झाला. ‘चेन स्नॅचिंग’चा प्रयत्न केला असावा म्हणून महिलेने या घटनेकडे दुर्लक्ष केले. काही दिवसानंतर या महिलेला कॉलनीतील दुसऱ्या एका महिलेबाबतही तसाच प्रकार झाल्याचे माहीत झाले. महिन्याभरात अनेक महिला या प्रकारच्या हल्ल्याला बळी पडल्या. एकूणच हा सर्व प्रकार महिला व त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. ते अधिक लक्ष ठेवू लागले. त्यामुळे काही दिवस हल्लेखोर तरुणांचे येणे बंद झाले. महिनाभर शांत बसल्यानंतर ते युवक पुन्हा सक्रिय झाले. यावेळी त्यांनी केटी नगरातील महिलांना आपले लक्ष्य बनवायला सुरुवात केली. हे सायको तरुण एक दोन दिवसाआड असे प्रकार करतात. यात ते महिलांना धक्का देणे, त्यांची छेड काढणे, आपत्तीजनक व्यवहार करणे आदी प्रकार करीत असतात. २ नोव्हेंबर रोजी एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला अशाच घटनेला सामोरे जावे लागले. पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाहीनागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हे सायको तरुण पांढऱ्या रंगाच्या दुचाकी वाहनावर असतात. सायंकाळी ६ ते ८ वाजताच्या दरम्यान ते परिसरात फिरत असतात. चेन स्नॅचिंग करणाऱ्यांप्रमाणे ते लक्ष ठेवून असतात. एकटी-दुकटी महिला दिसली की ते आपत्तीजनक पद्धतीने धक्का देऊन फरार होतात. पूर्ण घटनक्रम पाच ते सहा सेकंदात घडतो. धक्का दिल्याने महिला घाबरतात. तसेच रात्रीची वेळ असल्याने दुचाकीचा नंबरही पाहता येत नाही. मागील तीन महिन्यात केटी नगरातील अनेक महिलांना या प्रकारच्या घटनांना सामोरे जवे लागले आहे. यासंदर्भात पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु पोलिसांनी याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. या तरुणांची दहशत वाढल्यामुळे आठवड्यापूर्वी केटी नगरातील नागरिक थेट पोलीस ठाण्यात आले. त्यांनी ठाणेदार अवधेश त्रिपाठी यांना केटी नगरात बोलावून चर्चा केली. त्रिपाठी यांनी त्यांना परिसरात गस्त वाढवण्यासंबंधी आश्वासन दिले. तसेच परिसरातील रस्त्यावर दोन बॅरीकेट्स लावले. यादरम्यानच हल्लेखोरांनी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा पोलीसांवरून विश्वास उडाला आहे. येथील नागरिक प्रचंड घाबरले आहेत. यासंदर्भात सहआयुक्त राजवर्धन यांनी सांगितले की, या घटनांना गांभीर्याने घेण्यात आले आहे. गिट्टीखदान पोलिसांना हल्लेखोरांना तातडीने शोधण्यात सांगण्यात आले आहे. या परिसराच्या नगरसेविका साधना बरडे यांनी सुद्धा या घटनांबाबत दुजोरा दिला आहे. परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. महिला दहशतीत आहेत. त्यांना सुरक्षा प्रदान करणे पोलिसांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महिलांचे एकटे फिरणे बंद लोकमतशी चर्चा करताना येथील पीडित महिलांनी सांगितले की, अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने महिलांनी घरातून एकटे बाहेर पडणेच बंद केले आहे. सायंकाळच्या वेळी बाहेर जायचेच असेल तर कुटुंबातील सदस्य किंवा शेजारच्यांना सोबत घेऊन जातात. त्यांनी तरुण मुलींनाही सांभाळून राहण्यास सांगितले आहे. काही दिवसांपासून दुपारच्या वेळीसुद्धा अशा घटना घडत आहेत. एका महिलेच्या मोलकरणीवरही अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला. येथील महिला प्रचंड संतापलेल्या असून सायको हल्लेखोर हाती लागल्यास अक्कू यादव सारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.