शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

खरिपासाठी बियाणे, खते तत्काळ पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:22 IST

जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तत्काळ करावे, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचना : नऊ लाख १० हजार हेक्टरवर नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तत्काळ करावे, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागातर्फे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.कृषी विभागाच्या योजना केवळ कागदावर ठेवू नका. शेतकऱ्यांना हंगामात बियाणे व खतांची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घ्या. माती परिक्षणासंदर्भात जमिनीचा पोत पाहून शेतकºयांना मार्गदर्शन करा. जलयुक्त शिवार, धडक सिंचन, शेततळ्यांमुळे शेतकºयांना लाभ झाला आहे. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृषी विभागाने अधिक जोमाने काम करावे, असे ना. येरावार यांनी सांगितले. पीक विमा योजनेत सर्व शेतकºयांना सहभागी करण्याचे प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.जिल्ह्यात २०१९-२० मध्ये नऊ लाख १० हजार ५०५ हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोयाबीन दोन लाख ७७ हजार ८४२ हेक्टरवर, कापूस चार लाख ५८ हजार ८५६ हेक्टर, तूर एक लाख ३१ हजार १९१ हेक्टर, ज्वारी १५ हजार ८७५ हेक्टर, उडीद ७०३४ हेक्टर, मूग ८६६८ हेक्टर, मका २२० हेक्टर आणि इतर पिके १० हजार ८९१ हेक्टर यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोयाबीनची मागणी एक लाख ५६ हजार २८६ क्विंटल आहे. आतापर्यंत ७५ हजार क्विंटल उपलब्ध झाले आहे. कपाशीच्या २५ लाख ४४ हजार १११ पॅकेटची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एकूण खतांची मागणी एक लाख ९८ हजार ७०७ मेट्रीक टन आहे. यापैकी आजघडीला एक लाख ३३ हजार ८६४ मेट्रीक टन खतांची उपलब्धता झाली आहे. यात युरिया, एमओपी, एसएसपी, कॉम्प्लेक्स, एनपीकेएस या खतांचा समावेश आहे.तक्रार नियंत्रण कक्षजिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर तक्रार नियंत्रण कक्ष उघडण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या योजनांवर आधारीत घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रवीण जाधव आणि काशीराम राठोड यांना जमिनीची आरोग्यपत्रिका पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली.