शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

खरिपासाठी बियाणे, खते तत्काळ पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:22 IST

जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तत्काळ करावे, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सूचना : नऊ लाख १० हजार हेक्टरवर नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारीत आहे. निसर्ग, पाणी आदी गोष्टी आपल्या हाती नसल्या तरी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाचा भर असला पाहिजे. खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने तत्काळ करावे, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागातर्फे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.कृषी विभागाच्या योजना केवळ कागदावर ठेवू नका. शेतकऱ्यांना हंगामात बियाणे व खतांची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घ्या. माती परिक्षणासंदर्भात जमिनीचा पोत पाहून शेतकºयांना मार्गदर्शन करा. जलयुक्त शिवार, धडक सिंचन, शेततळ्यांमुळे शेतकºयांना लाभ झाला आहे. या गोष्टींमध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृषी विभागाने अधिक जोमाने काम करावे, असे ना. येरावार यांनी सांगितले. पीक विमा योजनेत सर्व शेतकºयांना सहभागी करण्याचे प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.जिल्ह्यात २०१९-२० मध्ये नऊ लाख १० हजार ५०५ हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोयाबीन दोन लाख ७७ हजार ८४२ हेक्टरवर, कापूस चार लाख ५८ हजार ८५६ हेक्टर, तूर एक लाख ३१ हजार १९१ हेक्टर, ज्वारी १५ हजार ८७५ हेक्टर, उडीद ७०३४ हेक्टर, मूग ८६६८ हेक्टर, मका २२० हेक्टर आणि इतर पिके १० हजार ८९१ हेक्टर यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सोयाबीनची मागणी एक लाख ५६ हजार २८६ क्विंटल आहे. आतापर्यंत ७५ हजार क्विंटल उपलब्ध झाले आहे. कपाशीच्या २५ लाख ४४ हजार १११ पॅकेटची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी एकूण खतांची मागणी एक लाख ९८ हजार ७०७ मेट्रीक टन आहे. यापैकी आजघडीला एक लाख ३३ हजार ८६४ मेट्रीक टन खतांची उपलब्धता झाली आहे. यात युरिया, एमओपी, एसएसपी, कॉम्प्लेक्स, एनपीकेएस या खतांचा समावेश आहे.तक्रार नियंत्रण कक्षजिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर तक्रार नियंत्रण कक्ष उघडण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाच्या योजनांवर आधारीत घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रवीण जाधव आणि काशीराम राठोड यांना जमिनीची आरोग्यपत्रिका पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली.