शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

टाकळी प्रकल्पाला पुरेसा निधी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:50 IST

तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली.

ठळक मुद्देमंत्र्यांची ग्वाही : प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांना भेटले

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली.अमरावती येथे आढावा बैठकीकरिता आले असता महाजन यांची शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीधर मोहोड यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. तालुक्यातील डोल्हारी गावाजवळ हा प्रकल्प होत असून निधीअभावी काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्प तसेच बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीचे भूसंपादन किंवा खरेदी व गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकल्पात आज ना उद्या शेती व घर जाणारच या भावनेने नागरिक, गावांचा विकास खुंटला आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्याने शेती विकता येत नाही, संपादित किंवा खरेदीही करता येत नाही. त्यामुळे गावकरी दोन्हीकडून अडकले आहे.प्रकल्पाच्या विलंबामुळे गावात राजकारण होत असून काही वेगवेगळ्या मार्गाने खोट्या तक्रारी करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कोणत्याही तक्रारीचा विचार न करता बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीची खरेदी, बहुमताने निवडलेल्या जागेवर बुडीत गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रकल्प बळीराजा चेतना अभियानात समाविष्ट करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच प्रकल्प व बुडीत गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची हमी दिली.शिष्टमंडळात श्रीधर मोहोड, विजयाताई सांगळे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पंडित आंबेकर, फुबगावच्या सरपंच विमल बोरकर, उपसरपंच राजेश राठोड, घनापूरच्या सरपंच जयमाला जामकर, नखेगावचे सरपंच संतोष खडसे, फुबगावचे सुशांत इंगोले, डॉ.दिलीप साव, सावकार राठोड, संजय देशमुख, मोहन राठोड, बबन पवार, नीळकंठ बोरकर, भीमराव भोयर, गजानन गाढवे, युवराज नंदागवळी, घनापूरचे निरंजन काळे, संतोष गावंडे, गोपाळ गावंडे, नखेगावचे राजू गोरडे, उदापूरचे रमेश भोयर, शरद सांगळे, उमेश पेंडेकर, दिनेश सांगळे, प्रदीप गीते, तळेगावचे सलीम भाई, अजय राठोड, प्रभूदास गावंडे आदींचा समावेश होता.