शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी प्रकल्पाला पुरेसा निधी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:50 IST

तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली.

ठळक मुद्देमंत्र्यांची ग्वाही : प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांना भेटले

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली.अमरावती येथे आढावा बैठकीकरिता आले असता महाजन यांची शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीधर मोहोड यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. तालुक्यातील डोल्हारी गावाजवळ हा प्रकल्प होत असून निधीअभावी काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्प तसेच बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीचे भूसंपादन किंवा खरेदी व गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकल्पात आज ना उद्या शेती व घर जाणारच या भावनेने नागरिक, गावांचा विकास खुंटला आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्याने शेती विकता येत नाही, संपादित किंवा खरेदीही करता येत नाही. त्यामुळे गावकरी दोन्हीकडून अडकले आहे.प्रकल्पाच्या विलंबामुळे गावात राजकारण होत असून काही वेगवेगळ्या मार्गाने खोट्या तक्रारी करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कोणत्याही तक्रारीचा विचार न करता बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीची खरेदी, बहुमताने निवडलेल्या जागेवर बुडीत गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रकल्प बळीराजा चेतना अभियानात समाविष्ट करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच प्रकल्प व बुडीत गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची हमी दिली.शिष्टमंडळात श्रीधर मोहोड, विजयाताई सांगळे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पंडित आंबेकर, फुबगावच्या सरपंच विमल बोरकर, उपसरपंच राजेश राठोड, घनापूरच्या सरपंच जयमाला जामकर, नखेगावचे सरपंच संतोष खडसे, फुबगावचे सुशांत इंगोले, डॉ.दिलीप साव, सावकार राठोड, संजय देशमुख, मोहन राठोड, बबन पवार, नीळकंठ बोरकर, भीमराव भोयर, गजानन गाढवे, युवराज नंदागवळी, घनापूरचे निरंजन काळे, संतोष गावंडे, गोपाळ गावंडे, नखेगावचे राजू गोरडे, उदापूरचे रमेश भोयर, शरद सांगळे, उमेश पेंडेकर, दिनेश सांगळे, प्रदीप गीते, तळेगावचे सलीम भाई, अजय राठोड, प्रभूदास गावंडे आदींचा समावेश होता.