आरोग्य विभाग : प्रतिबंधात्मक उपाय योजावेयवतमाळ : राज्यात जास्त ऊन तापणाऱ्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातील पुसद, वणी या भागातील तापमान उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त असते. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. त्यामुळे उष्णतेत अधिक वाढ होवून उन लागणे किंवा उष्माघात होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्माघाताची शक्यता असते. त्वचा कोरडी पडणे, शरीराच्या तापमानात वाढ होणे. चक्कर, थकवा, डोकेदुखी, वांती, छातीत धडधडणे, गोळे दाटणे, अशक्तपणा, निरुत्साह, बेचैनी, बेशुद्धी, शरीरातील क्षार कमी होणे, डोळ्यापुढे अंधारी येणे ही साधारणत: उष्माघाताची लक्षणे दिसून येतात. उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे कधीही चांगले. यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे व सैल कपडे वापरावे, शक्यतो उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, उन्हात घराबाहेर निघताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधावा, डोळ्यावर गॉगल वापरावा, उन लागल्यास लिंबू शरबत, कैरीचे पन्हे किंवा साखर पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, थंड पाण्याणे संपूर्ण अंग पुसून काढावे, श्रमिक वर्गाने शक्यतो दुपारच्या आत त्यांची कामे आटोपून घ्यावी, लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींनी उन्हात जाणे टाळावे. उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)उष्माघात टाळावाजून महिना सुरू झाला असला तरी अद्याप उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही. त्यामुळे उष्माघाताची लक्षणे जाणून घ्यावी, शक्यतो उन्हात जाणे टाळावे. उष्णाघातावर प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेच्या आहेत.
उन्हापासून संरक्षण करा
By admin | Updated: June 3, 2015 00:05 IST