शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘टिपेश्वर’च्या हद्दवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघांच्या उत्पत्तीसाठी सर्वाधिक पोषक मानले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी येथे नव्या वाघांची भर पडते.

ठळक मुद्दे१८ वाघांच्या अस्तित्वाची नोंद : मेळघाट कनेक्शन महिनाभर लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघांचे अस्तित्व, शिकारी, हमखास व्याघ्र दर्शन यामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या टिपेश्वर अभयारण्याची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव वन्यजीव विभागाच्या विचाराधीन आहे.पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघांच्या उत्पत्तीसाठी सर्वाधिक पोषक मानले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी येथे नव्या वाघांची भर पडते. वाघांची वाढती संख्या लक्षात घेता टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र कमी पडते आहे. त्यामुळे हे वाघ अभयारण्याबाहेर येतात. गावात व शेतशिवारात त्यांचा शिरकाव होतो. त्यातूनच मानवी व पाळीव जनावरांच्या शिकारी वाढतात. शेतकरी-शेतमजुरांना शेतात जाणेही धोकादायक ठरते. त्यातून जनक्षोभ निर्माण होण्याची भीती असते.उपरोक्त बाबी विचारात घेऊन टिपेश्वर अभयारण्याचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा प्रस्ताव पांढरकवडा वन्यजीव विभागाच्या विचाराधीन आहे. पारवा वनपरिक्षेत्रातील पारवा, कुर्ली, किन्ही हा परिसर या व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट केला जाऊ शकतो. आणखी काही गावे अभयारण्याला जोडता येतील का या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय?ही गावे समाविष्ट केल्यास गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय?, ते सहजासहजी त्यासाठी तयार होतील का?, त्यांना किती मोबदला द्यावा लागेल या दृष्टीनेही माहिती गोळा केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यांचीही अशीच हद्दवाढ केली गेली. त्याच धर्तीवर आता टिपेश्वरमध्ये हद्दवाढीचा प्रयोग राबविला जाणार आहे.हिशेबाची जुळवाजुळवटिपेश्वर अभयारण्यपूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. आता तेथून काढून त्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाशी जोडण्यात आले आहे. परंतु या कनेक्टीव्हीटीला ३१ मार्चपर्यंत लांबणीवर टाकले गेले आहे. हिशेबाची जुळवाजुळव हे प्रमुख कारण त्यासाठी सांगितले जाते.वाघाचे अभयारण्याबाहेर निघणे धोकादायकवाघांची संख्या अधिक व अभयारण्याचे कार्यक्षेत्र कमी यामुळे वाघ अभयारण्याबाहेर निघतात. ही बाब त्यांच्यासाठी अधिक धोकादायक आहे. कारण परप्रांतीय शिकाऱ्यांची या अभयारण्यावर व तेथील वाघांवर सतत नजर असते. वाघांनी अभयारण्याबाहेर निघणे गावकऱ्यांसाठीही तेवढेच धोकादायक आहे. या वाघांना अभयारण्यातच ठेवता यावे म्हणून अभयारण्याची हद्द आता वाढविली जाणार आहे.मंत्र्यांना हवा ‘टायगर प्रोजेक्ट’पांढरकवडामध्ये पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. या संबंधी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ