शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

‘टिपेश्वर’च्या हद्दवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघांच्या उत्पत्तीसाठी सर्वाधिक पोषक मानले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी येथे नव्या वाघांची भर पडते.

ठळक मुद्दे१८ वाघांच्या अस्तित्वाची नोंद : मेळघाट कनेक्शन महिनाभर लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाघांचे अस्तित्व, शिकारी, हमखास व्याघ्र दर्शन यामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या टिपेश्वर अभयारण्याची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव वन्यजीव विभागाच्या विचाराधीन आहे.पांढरकवडा वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये गेल्या वर्षीच्या व्याघ्र गणनेत १८ पट्टेदार वाघांची नोंद करण्यात आली होती. त्यात काही बछड्यांचाही समावेश आहे. टिपेश्वर अभयारण्य १४८ चौरस किलो मीटर क्षेत्रात व्यापले आहे. हे अभयारण्य वाघांच्या उत्पत्तीसाठी सर्वाधिक पोषक मानले जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी येथे नव्या वाघांची भर पडते. वाघांची वाढती संख्या लक्षात घेता टिपेश्वर अभयारण्याचे क्षेत्र कमी पडते आहे. त्यामुळे हे वाघ अभयारण्याबाहेर येतात. गावात व शेतशिवारात त्यांचा शिरकाव होतो. त्यातूनच मानवी व पाळीव जनावरांच्या शिकारी वाढतात. शेतकरी-शेतमजुरांना शेतात जाणेही धोकादायक ठरते. त्यातून जनक्षोभ निर्माण होण्याची भीती असते.उपरोक्त बाबी विचारात घेऊन टिपेश्वर अभयारण्याचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा प्रस्ताव पांढरकवडा वन्यजीव विभागाच्या विचाराधीन आहे. पारवा वनपरिक्षेत्रातील पारवा, कुर्ली, किन्ही हा परिसर या व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट केला जाऊ शकतो. आणखी काही गावे अभयारण्याला जोडता येतील का या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय?ही गावे समाविष्ट केल्यास गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचे काय?, ते सहजासहजी त्यासाठी तयार होतील का?, त्यांना किती मोबदला द्यावा लागेल या दृष्टीनेही माहिती गोळा केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यांचीही अशीच हद्दवाढ केली गेली. त्याच धर्तीवर आता टिपेश्वरमध्ये हद्दवाढीचा प्रयोग राबविला जाणार आहे.हिशेबाची जुळवाजुळवटिपेश्वर अभयारण्यपूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. आता तेथून काढून त्याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाशी जोडण्यात आले आहे. परंतु या कनेक्टीव्हीटीला ३१ मार्चपर्यंत लांबणीवर टाकले गेले आहे. हिशेबाची जुळवाजुळव हे प्रमुख कारण त्यासाठी सांगितले जाते.वाघाचे अभयारण्याबाहेर निघणे धोकादायकवाघांची संख्या अधिक व अभयारण्याचे कार्यक्षेत्र कमी यामुळे वाघ अभयारण्याबाहेर निघतात. ही बाब त्यांच्यासाठी अधिक धोकादायक आहे. कारण परप्रांतीय शिकाऱ्यांची या अभयारण्यावर व तेथील वाघांवर सतत नजर असते. वाघांनी अभयारण्याबाहेर निघणे गावकऱ्यांसाठीही तेवढेच धोकादायक आहे. या वाघांना अभयारण्यातच ठेवता यावे म्हणून अभयारण्याची हद्द आता वाढविली जाणार आहे.मंत्र्यांना हवा ‘टायगर प्रोजेक्ट’पांढरकवडामध्ये पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. या संबंधी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

टॅग्स :Tipeshwar Sancturyटिपेश्वर अभयारण्यTigerवाघ