शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

मालमत्तेच्या गुन्ह्यांना ब्रेक, शरीरासंबंधीचे गुन्हे वाढले

By admin | Updated: October 28, 2015 02:47 IST

यवतमाळ शहरातील ‘प्रॉपर्टी आॅफेन्सेस’ला ब्रेक लागला असून अचानक ‘बॉडी आॅफेन्सेस’च्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने येथील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे.

कायदा व सुव्यवस्था बिघडली : यवतमाळ शहरात खुनांची मालिका यवतमाळ : यवतमाळ शहरातील ‘प्रॉपर्टी आॅफेन्सेस’ला ब्रेक लागला असून अचानक ‘बॉडी आॅफेन्सेस’च्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने येथील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. एकट्या शहरात गेल्या महिन्याभरात खुनाच्या आठ घटना पाठोपाठ घडल्या आहेत. यातील काही घटनांशी पोलिसांचा थेट संबंध येत नसला तरी गुन्हा घडल्यानंतर त्यातील आरोपी शोधण्यातही त्यांना यश आलेले नाही. येथील मच्छी पूल परिसरात घडलेल्या तिहेरी खुनाच्या घटनेने पोलिसांची कार्यतत्परता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी तत्काळ यवतमाळ गाठून सुमारे चार तास कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन शरीरासंबंधीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचे आणि घडलेल्या गुन्ह्यांमध्ये डिटेक्शन करण्याचे निर्देश दिले. या तिहेरी हत्याकांडाच्या निमित्ताने यवतमाळ शहरात गेल्या महिनाभरात घडलेल्या खुनाच्या अन्य घटनांची प्रकरणेही वर आली आहेत. त्यावर नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली असून भीतीचे वातावरणही पहायला मिळत आहे. महिनाभरात तब्बल आठ खून झाले. यातील पाच खून एकट्या यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यातील काही खुनातील आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. यवतमाळ शहरात सण-उत्सवापूर्वी मालमत्तेसंबंधीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत होते. शहरात अनेक भागात घरफोडीच्या घटना घडल्या. त्यात लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. भरदिवसा पादचारी महिलांचे मंगळसूत्र हिसकण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे पोलिसांनी चोरी-घरफोडीमधील अट्टल गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत केले होते. या काळात सर्वत्र आणि रात्री उशिरापर्यंत गर्दी राहत असल्याने चोरट्यांना आपले काम फत्ते करणे कठीण झाले. या गर्दीमुळेच की काय गेल्या काही दिवसात शहरात चोरी-घरफोडीच्या घटना नियंत्रणात आल्या. त्याला चांगलाच ब्रेक लागला. त्यामुळे पोलीस या तपासातून काहीसे रिलॅक्स होते. त्यांच्यावर बंदोबस्ताचा ताण मात्र कायम होता. चोऱ्या-घरफोड्या थांबल्या असताना अचानक शरीरासंबंधीच्या अर्थात रक्तपाताच्या घटनांची मालिका सुरू झाली. एकापाठोपाठ खुनाच्या आठ घटनांना पोलिसांना सामोरे जावे लागले. खुनाच्या या घटनांनी पोलीसही हादरले आहे. एका खुनाचा छडा लागण्यापूर्वीच दुसरा खून घडत असल्याने पोलिसांची तारेवरची कसरत होत आहे. खुनाच्या या घटनांनी संंबंधित पोलीस ठाण्यातील यंत्रणेच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न चिन्ह लावले जात आहे. खुनाचे हे लोण ग्रामीण भागातही पोहोचण्याची भीती आहे. तिहेरी हत्याकांडाच्या घटनेला वेगळे वळण मिळू नये या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना महानिरीक्षकांनी केल्या. (जिल्हा प्रतिनिधी)