शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची मालमत्ता मातीमोल

By admin | Updated: June 29, 2015 00:19 IST

सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने लाखो रूपये खर्च करून इमारती बांधल्या.

सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने लाखो रूपये खर्च करून इमारती बांधल्या. आज या इमारतीची आणि जागेची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. असे असले तरी या मोक्याच्या जागेवर असलेल्या शासकीय इमारती खंडर झाल्या आहेत. जिल्हा मुख्यालयी अशा एक दोन नव्हे तर १० इमारती आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामधील काही इमारती सुस्थितीत आहेत. तर काही इमारती अखेरच्या घटका मोजताहेत. जनसामान्याला सेवा पुरविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहे. त्यातून सरकारी जागेवर विविध इमारती उभ्या झाल्या आहेत. विशिष्ट कालावधी नंतर इमारतीची जागा अपुरी पडते म्हणून नव्याने दुसरी इमारत बांधण्यात आली. परंतु जुन्या इमारतीचा कुठलाही उपयोग करण्यात आला नाही. या ठिकाणी मोठे कुलूप ठोकले गेले. वर्षानुवर्ष या इमारतीकडे कुणी फिरकले नाही. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. या ठिकाणची दारे, खिडक्या, ग्रील, फरशी, टिनपत्रे आणि कवेलू चोरून नेले. परिसरात काटेरी झुडपं वाढली आहेत. या जागेवर आता चोरट्यांनी ताबा मिळविला आहे. भरदिवसा या ठिकाणी जुगार अड्डे चालतात. रात्रीच्या वेळी दारूड्यांचा धुमाकूळ असतो. सध्या या परिसराचा वापर केवळ कचरा टाकण्यासाठी होत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यवतमाळच्या पूनम चौकामध्ये जुने स्त्री रूग्णालय होते. साधारणत: एक एकरापेक्षाही अधिक जागेत त्याचे बांधकाम करण्यात आले होते. शासनाला ही जागा दान स्वरूपात मिळाली आहे. याचा वापर केवळ वैद्यकीय सेवांसाठी करण्यात यावा. अन्यथा ही जागा मूळ मालकाला परत जाईल असा हा करार आहे. यामुळे स्त्री रूग्णालयाचे स्थानांतरण झाल्यानंतर ही जागा खितपत पडली. मात्र त्याचा नव्याने वापर करण्यासाठी शल्य चिकित्सक अथवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कुठल्याही उपाययोजना प्रशासनाला सूचविल्या नाही. यातुन कोट्यवधी रूपयांची जागा बेवारस झाली आहे. येथे लाखो रूपये खर्च करून उभारलेली इमारत खंडर झाली आहे.नगरपरिषदेच्या इमारती लगत जुनी दुमजली इमारत आहे. सर्व कार्यालय नवीन इमारतीमध्ये स्थानांतरित झाले. मात्र जुन्या इमारतीचा वरचा मजला बंद अवस्थेत पडला आहे. आजपर्यंत त्याचा कुठलाही वापर नगर परिषदेने केला नाही. ही इमारत सुस्थितीत असली तरी अडगळीची ठरत आहे. दत्त चौकातील मुख्य मार्गावर असलेले टीबी रुग्णालय विस्तीर्ण जागेत व्यापाले आहे. टीबी रुग्णालय परिसरात कर्मचारी वसाहत आणि शासकीय कार्यालय आहेत. यातील टीबी रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानांतरित झाले आहे. ही इमारत सुस्थित आहे, असे असलेतरी या जागेसह इमारतीचा कुठलाही उपयोग केला जात नाही. यवतमाळ ते गोदनी मार्गावर उद्योग भवनाची इमारत होती. ही जागा अपुरी पडते म्हणून येथील कार्यालय दारव्हा मार्गावर उद्योगभवनमध्ये स्थानांतरित झाले. जुनी इमारत आज तशीच पडून आहे. वाघापूर मार्गावर कृत्रिम रेतन केंद्राची इमारत, कृषी विज्ञान केंद्रा लगतच्या कुकु टपालन केंद्राची अवस्था अशीच बिकट झाली आहे. या ठिकाणची कर्मचारी वसाहत मोडकळीस आले आहेत. या सर्व ठिकाणी दारूडे, चोरटे आणि जुगाऱ्यांचा वावर असतो.