शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

डझनावर पुरावे, तरीही कारवाई शून्य

By admin | Updated: February 5, 2016 01:57 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून दारिद्र्य रेषेखालील आदिवासी व अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांकरिता विशेष घटक योजना राबविली जाते.

विशेष घटक योजना : समिती अध्यक्षांकडूनच पाठराखण यवतमाळ : जिल्हा परिषद कृषी विभागाकडून दारिद्र्य रेषेखालील आदिवासी व अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांकरिता विशेष घटक योजना राबविली जाते. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे डझनावर पुरावे योजनेच्या समिती अध्यक्षांकडे दिले आहे. मात्र त्यानंतरही कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचा प्रकार सुरू आहे. विशेष घटक योजनेतून अनुसूचित जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील २५ हजार रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्या तर अनुसूचित जातीच्या ५० हजार वार्षिक उत्पन्न मर्यादा असलेल्या दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्याला लाभ दिला जातो. या योजनेत ४९ हजार ९१५ रुपयांची मदत वस्तू स्वरूपात केली जाते. यात बैलगाडी, बैलजोडी आणि इतर कृषी अवजारांचा समावेश आहे. जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये तीन कोटी २० लाख रुपये १६ पंचायत समितीच्या माध्यमातून वाटण्यात आले. या योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची अनेक प्रकरणे पुराव्यानिशी उघड झाली आहे. यवतमाळ पंचायत समितीतील विशेष घटक योजनेच्या कृषी अधिकाऱ्यांनी बोगस लाभार्थी निवड केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. चक्क शिष्यवृत्ती आणि कर्जासाठी घेतलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यावर लाभ देण्यात आला आहे. उत्पन्नाच्या दाखल्यात खोडतोड करून उत्पन्न मर्यादा कमी दाखविण्यात आले आहे. २०१० पासून यवतमाळ पंचायत समितीने केवळ १० गावातील शेतकऱ्यांनाच विशेष घटक योजनेचा लाभ दिला आहे. तालुक्यात १४६ गावे असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लेखा परीक्षणातही योजनेत अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे नाव दारिद्र्य रेषेच्या यादीत नाही. घोडखिंडी, बारड, बोरजई, सावरगड, किन्ही, कीटा, तिवसा, वारज, पिंपरी बु., जवळा इजारा येथेच ही योजना जिरविली. तक्रार करून लोटले पाच महिने समितीचे पदसिद्ध अध्यक्ष अपर मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांच्याकडे तक्रार करुन पाच महिन्याचा कालावधी लोटला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)